शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमध्ये पाणी बंद

By admin | Updated: September 17, 2015 23:10 IST

दोन तालुक्यातील ३९ गावांचा प्रश्न गंभीर : १४ कोटींचे वीज बिल थकित

कवठेमहांकाळ : ऐन गणेशोत्सवाच्या सणातच ३९ गावांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने तालुक्यात प्रशासनाच्या विरोधात तसेच ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सणासुदीच्या काळातच पिण्याचे पाणी बंद केल्याने नागरिकांनी या भोंगळ कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या तीन दिवसांपासून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांमध्ये पिण्याचे पाणी बंद झाल्याने पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. कवठेमहांकाळ, मणेराजुरी आणि विसापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा वीज बिल न भरल्याने तोडण्यात आला आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील ३९ गावांना पिण्याच्या पाण्यापासून गेले तीन दिवस वंचित राहावे लागले आहे. त्यातच गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने ऐन सणाच्या सुरुवातीलाच नागरिकांना पिण्याच्या पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागले आहे. कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीचे कारभारी व तालुका प्रशासन झोपा काढीत आहे काय?, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.औदुंबरमधून कृष्णा नदीतून कवठेमहांकाळ, मणेराजुरी, विसापूर या प्रादेशिक पाणी योजनांतून दोन तालुक्यातील ३९ गावांना पिण्याचे पाणी दिले जाते. या तीनही योजनांकडे वीज महावितरण कंपनीचे सुमारे चौदा कोटी रुपये वीज बिल येणे बाकी आहे. गेल्या चार महिन्यात प्रशासनाने या थकित बिलाचा एकही रुपाया भरला नसल्याने, वीज महावितरणने धडक मोहीम राबवित या योजनेचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे दि. १५ सप्टेंबरपासून तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.प्रत्येक महिन्याला या तीनही योजनांचे पंचवीस लाख रुपये वीज बिल येते. ग्रामपंचायतीला पाणीपट्टी गोळा करून पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे हे पैसे जमा करावे लागतात व तेथून ही वीज बिलाची रक्कम भरली जाते. परंतु आॅगस्ट महिन्यापासून पैसेच न दिल्याने अखेर, महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्यायला पाणी मिळणार का?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. (वार्ताहर)पाण्याचा प्रश्न ऐरणीवर  --कवठेमहांकाळ, मणेराजुरी व विसापूर प्रादेशिक पाणी योजनेचे थकित १४ कोटी वीज बिल न भरल्याने महावितरणने या योजनेचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.