शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कवठेमहांकाळमध्ये पाणी बंद

By admin | Updated: September 17, 2015 23:10 IST

दोन तालुक्यातील ३९ गावांचा प्रश्न गंभीर : १४ कोटींचे वीज बिल थकित

कवठेमहांकाळ : ऐन गणेशोत्सवाच्या सणातच ३९ गावांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने तालुक्यात प्रशासनाच्या विरोधात तसेच ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सणासुदीच्या काळातच पिण्याचे पाणी बंद केल्याने नागरिकांनी या भोंगळ कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या तीन दिवसांपासून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांमध्ये पिण्याचे पाणी बंद झाल्याने पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. कवठेमहांकाळ, मणेराजुरी आणि विसापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा वीज बिल न भरल्याने तोडण्यात आला आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील ३९ गावांना पिण्याच्या पाण्यापासून गेले तीन दिवस वंचित राहावे लागले आहे. त्यातच गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने ऐन सणाच्या सुरुवातीलाच नागरिकांना पिण्याच्या पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागले आहे. कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीचे कारभारी व तालुका प्रशासन झोपा काढीत आहे काय?, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.औदुंबरमधून कृष्णा नदीतून कवठेमहांकाळ, मणेराजुरी, विसापूर या प्रादेशिक पाणी योजनांतून दोन तालुक्यातील ३९ गावांना पिण्याचे पाणी दिले जाते. या तीनही योजनांकडे वीज महावितरण कंपनीचे सुमारे चौदा कोटी रुपये वीज बिल येणे बाकी आहे. गेल्या चार महिन्यात प्रशासनाने या थकित बिलाचा एकही रुपाया भरला नसल्याने, वीज महावितरणने धडक मोहीम राबवित या योजनेचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे दि. १५ सप्टेंबरपासून तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.प्रत्येक महिन्याला या तीनही योजनांचे पंचवीस लाख रुपये वीज बिल येते. ग्रामपंचायतीला पाणीपट्टी गोळा करून पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे हे पैसे जमा करावे लागतात व तेथून ही वीज बिलाची रक्कम भरली जाते. परंतु आॅगस्ट महिन्यापासून पैसेच न दिल्याने अखेर, महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्यायला पाणी मिळणार का?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. (वार्ताहर)पाण्याचा प्रश्न ऐरणीवर  --कवठेमहांकाळ, मणेराजुरी व विसापूर प्रादेशिक पाणी योजनेचे थकित १४ कोटी वीज बिल न भरल्याने महावितरणने या योजनेचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.