शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पूर्वमध्ये पानमळे नामशेष होणार

By admin | Updated: September 4, 2015 22:09 IST

पानाला कवडीमोल किंमत : खुडेकऱ्यांची मजुरीही परवडेना; पानमळ्यांवर कुऱ्हाड

दिलीप कुंभार -नरवाड---मिरज पूर्व भागातील पान उत्पादकांच्या पानांना बाजारपेठेत कवडीमोल किंमत मिळत असल्याने, अखेर पानवेलीच काढून टाकण्याचा निर्णय अनेक पान उत्पादकांनी घेतला आहे. नीचांकी दराने पाठ सोडली नसल्याने, अखेर ज्या हाताने पानवेलीला पाणी देऊन जतन केले, त्याच हातांनी नाईलाजास्तव कुऱ्हाड चालवावी लागत असल्याचे विदारक चित्र मिरज पूर्वभागातून दिसू लागले आहे.-मिरज पूर्वभागात पानमळे मोठ्या प्रमाणावर आहेत. पान उत्पादकांना १८ वाफ्यांचा एक गुंठा पानमळा तयार करण्यासाठी २५२ पानवेली लागतात. एका वाफ्यात १४ पानवेलींची लागण करतात. ४० आर क्षेत्रासाठी १० हजार ८० पानवेली लागतात. पानवेलीच्या बिया म्हणून साडेसात कांड्याचे खोडाकडील कलम वापरतात. एका कलमाची किंमत सात रुपये असते. एक एकर क्षेत्रावर पानवेलींची लागण करण्यासाठी ७० हजार ५६० रुपये इतका खर्च येतो.याशिवाय ठिबक सिंचन सेटसाठी ५५ हजार रुपये, शेवगा, शेवरी, पानमळ्याला तटबंदी आदींचा खर्च २५ हजार रुपये येतो. एक एकर पानमळा घालून उत्पादन सुरू करण्यासाठी एक लाख ४० हजार ५६० रुपये खर्च येतो. एवढी प्रचंड गुंतवणूक करूनही पानांना पान बाजारपेठेत हमीभाव मिळत नसल्याने उत्पादक चिंतातूर झाले आहेत. पानांचा दर घसरल्याने पान मळ्यातील वेल बांधणे आणि खुडा करणे पान उत्पादकांना परवडत नसल्याने पदरमोड करावी लागत आहे. याबाबत जाधव यांनी सांगितले की, पान मळ्यातील कामगारांचा खर्च निघत नसल्याने पानमळा तोडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही.दर मिळत नसल्याने हंगाम परवडेनाएकेकाळी मिरज पूर्वभागाचे वैभव, अशी या भागातील पानमळ्यांची ओळख होती. देशभरात येथील पान निर्यात होत होते. मात्र गेल्या काही वर्षात वाढती शेतमजुरी, अवास्तव शेणखतांचे दर आणि भरपूर लागणारे पाणी यातून सध्या तरी पानांच्या मिळणाऱ्या भावात सावरणे अशक्य असल्याचेही मत येथील पानमळे बागायतदार काकासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. भविष्यात पानवेलींच्या पानांच्या दराची अशीच घसरण कायम राहिल्यास पानमळा शेतीच नामशेष होण्याची भीती परिसरातील पान उत्पादक बागायतदांतून व्यक्त होत आहे. उत्पादकांचा जून ते डिसेंबर हा पाने खुडण्याचा हंगाम असतो, पण यावर्षी हंगाम सुरू होऊन सप्टेंबर महिना उजाडला तरी पानांना दर मिळत नसल्याने, मळ्यांवर कुऱ्हाड चालविणे उत्पादकांना भाग पडत आहे. गेल्या दहा वर्षांपासून प्रथमच पानांच्या दराने नीचांकी पातळी गाठली आहे. सांगोला, पंढरपूर, उस्मानाबाद, पुणे, रत्नागिरी, मुंबई, कलकत्ता, बनारस, राजकोट (गुजरात) आदी प्रमुख पान बाजारपेठेत मंदीचे सावट कायम आहे. यामुळे नरवाड (ता. मिरज) येथील काकासाहेब जाधव यांनी दराची वाट पाहून स्वत:च आजवर जपलेल्या आपल्या पानमळ्याला कुऱ्हाड लावली आहे.