शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

मिरज पूर्वमध्ये पानमळे नामशेष होणार

By admin | Updated: September 4, 2015 22:09 IST

पानाला कवडीमोल किंमत : खुडेकऱ्यांची मजुरीही परवडेना; पानमळ्यांवर कुऱ्हाड

दिलीप कुंभार -नरवाड---मिरज पूर्व भागातील पान उत्पादकांच्या पानांना बाजारपेठेत कवडीमोल किंमत मिळत असल्याने, अखेर पानवेलीच काढून टाकण्याचा निर्णय अनेक पान उत्पादकांनी घेतला आहे. नीचांकी दराने पाठ सोडली नसल्याने, अखेर ज्या हाताने पानवेलीला पाणी देऊन जतन केले, त्याच हातांनी नाईलाजास्तव कुऱ्हाड चालवावी लागत असल्याचे विदारक चित्र मिरज पूर्वभागातून दिसू लागले आहे.-मिरज पूर्वभागात पानमळे मोठ्या प्रमाणावर आहेत. पान उत्पादकांना १८ वाफ्यांचा एक गुंठा पानमळा तयार करण्यासाठी २५२ पानवेली लागतात. एका वाफ्यात १४ पानवेलींची लागण करतात. ४० आर क्षेत्रासाठी १० हजार ८० पानवेली लागतात. पानवेलीच्या बिया म्हणून साडेसात कांड्याचे खोडाकडील कलम वापरतात. एका कलमाची किंमत सात रुपये असते. एक एकर क्षेत्रावर पानवेलींची लागण करण्यासाठी ७० हजार ५६० रुपये इतका खर्च येतो.याशिवाय ठिबक सिंचन सेटसाठी ५५ हजार रुपये, शेवगा, शेवरी, पानमळ्याला तटबंदी आदींचा खर्च २५ हजार रुपये येतो. एक एकर पानमळा घालून उत्पादन सुरू करण्यासाठी एक लाख ४० हजार ५६० रुपये खर्च येतो. एवढी प्रचंड गुंतवणूक करूनही पानांना पान बाजारपेठेत हमीभाव मिळत नसल्याने उत्पादक चिंतातूर झाले आहेत. पानांचा दर घसरल्याने पान मळ्यातील वेल बांधणे आणि खुडा करणे पान उत्पादकांना परवडत नसल्याने पदरमोड करावी लागत आहे. याबाबत जाधव यांनी सांगितले की, पान मळ्यातील कामगारांचा खर्च निघत नसल्याने पानमळा तोडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही.दर मिळत नसल्याने हंगाम परवडेनाएकेकाळी मिरज पूर्वभागाचे वैभव, अशी या भागातील पानमळ्यांची ओळख होती. देशभरात येथील पान निर्यात होत होते. मात्र गेल्या काही वर्षात वाढती शेतमजुरी, अवास्तव शेणखतांचे दर आणि भरपूर लागणारे पाणी यातून सध्या तरी पानांच्या मिळणाऱ्या भावात सावरणे अशक्य असल्याचेही मत येथील पानमळे बागायतदार काकासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. भविष्यात पानवेलींच्या पानांच्या दराची अशीच घसरण कायम राहिल्यास पानमळा शेतीच नामशेष होण्याची भीती परिसरातील पान उत्पादक बागायतदांतून व्यक्त होत आहे. उत्पादकांचा जून ते डिसेंबर हा पाने खुडण्याचा हंगाम असतो, पण यावर्षी हंगाम सुरू होऊन सप्टेंबर महिना उजाडला तरी पानांना दर मिळत नसल्याने, मळ्यांवर कुऱ्हाड चालविणे उत्पादकांना भाग पडत आहे. गेल्या दहा वर्षांपासून प्रथमच पानांच्या दराने नीचांकी पातळी गाठली आहे. सांगोला, पंढरपूर, उस्मानाबाद, पुणे, रत्नागिरी, मुंबई, कलकत्ता, बनारस, राजकोट (गुजरात) आदी प्रमुख पान बाजारपेठेत मंदीचे सावट कायम आहे. यामुळे नरवाड (ता. मिरज) येथील काकासाहेब जाधव यांनी दराची वाट पाहून स्वत:च आजवर जपलेल्या आपल्या पानमळ्याला कुऱ्हाड लावली आहे.