शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पंत, बापू... सातारा ब्रँड जगवा!

By admin | Updated: May 19, 2017 00:15 IST

पंत, बापू... सातारा ब्रँड जगवा!

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘औद्योगिक वसाहतींच्या बाबतीत आलेल्या भकासपणामुळे साताऱ्यातील तरुण वर्ग पुणे-मुंबईकडे स्थलांतरित होत आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील तरुणाई कास, तापोळा परिसरात पर्यटकांसाठी नवनवीन सोयी उपलब्ध करून रोजगाराचा नवा मार्ग शोधत आहे. ‘सातारा ब्रँड’ अधिकाधिक मजबूत करू पाहणाऱ्या या नवउद्योजकांना साथ देणे तर राहिलेच बाजूला... उलट कास पठार परिसरातील स्थानिक उद्योग बुलडोझरने उद्ध्वस्त करण्याची भाषा होऊ लागल्याने, ‘पंत, बापू... आता सातारा ब्रँडला तुम्हीच वाचवा,’ या भाषेत अनेक संस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् पालकमंत्री विजय शिवतारे यांना विनंती वजा आवाहन केले आहे. याबाबत कास पठार विकास प्रतिष्ठानने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कास पठार परिसरातील अतिक्रमणे बुलडोझर लावून उद्ध्वस्त करू, असे चार दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले होते. मुळात या भागातील स्थानिकांच्या अडचणी समजून घेऊन हे वक्तव्य झाले असते तर सातारकरांना आनंद झाला असता. एकीकडे सातारा शहरातील अनेक नामवंत उद्योगधंदे बंद पडत चालले आहेत. अनेक स्थलांतरित होत आहेत. या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या वाटा शोधत स्थानिक तरुण कास पठाराकडे वळला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कासकडे येत असताना पठार परिसरात त्यांना साधी पाण्याची बाटलीही मिळत नव्हती. परंतु काळाची गरज ओळखून अनेकांनी आपापल्या जागेत पर्यावरणाला धक्का लावू न देता न्याहरी अन् निवास या सरकारी योजनेला पूरक अशी निवासस्थाने बांधली आहेत. ‘सातारा ब्रँड’ अधिकाधिक मजबूत करण्यासाठी धडपडणाऱ्या या स्थानिक लोकांना सहकार्य करणे तर दूरच राहिले. उलट कुणाच्या तरी सांगण्यावरून उद्ध्वस्त करण्याची भाषा होत असेल तर साताऱ्याचे खरे पालक कोण?, असा निराशजनक प्रश्न सातारकरांसमोर उभा ठाकला आहे. तेव्हा मुख्यमंत्री अन् पालकमंत्री यांच्याबद्दल सातारा जिल्ह्याला असलेल्या आपुलकीच्या भावनेचा विचार करून उलट कास पठार परिसराला अधिकाधिक चांगले पर्यटनस्थळ कसे बनवता येईल, याचा दोघांनी विचार करावा, असे आवाहन कास पठार विकास प्रतिष्ठानच्या वतीने सोमनाथ जाधव, लक्ष्मण गोगावले, शंकरराव जांभळे आणि विनोद गोगावले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे. पाठीवर थाप नको; पण पोटावर पाय देऊ नका! महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गावी पुस्तकांचं गाव निर्माण करून सातारा ब्रँडला हातभार लावणाऱ्या फडणवीस सरकारने कास पठारच्या विकासाकडे लक्ष द्यावे. कास परिसरात दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. या ठिकाणी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिकांच्या पाठीवर एकवेळ शाबासकीची थाप मारता आली नाही तर हरकत नाही. पण, बुलडोझरने बांधकामे उद्ध्वस्त करण्याची भाषा करून पोटावर पाय देऊ नका, अशी विनंतीही करण्यात आली आहे.