शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पावसाने दडी मारल्याने पान उत्पादक हताश

By admin | Updated: July 16, 2015 23:15 IST

उत्पादनात घट : पंधरा दिवसांनी येणारा खुड्याचा फेर तीस दिवसांवर गेला; बाजारात दरही घसरले

दिलीप कुंभार-नरवाड -सध्या पावसाने ओढ दिल्याने लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.उन्हामुळे होरपळून निघालेल्या पान उत्पादकांना पावसाळ्यात रिमझीम पाऊस आणि ढगाळ हवामानाची अपेक्षा होती, मात्र पानवेलींच्या वाढीसाठी पोषक हवामान नसल्याने पानांच्या फुटव्यावर परिणाम झाला आहे. १५ दिवसांनी येणारा खुड्याचा फेर ३० दिवसांवर गेला आहे. याशिवाय पान बाजार पेठेत देखील खाऊच्या पानांना कवडीमोलाची किंमत मिळत असल्याने, पान उत्पादकांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.पान व्यापाऱ्यांवर मात्र कोणताही परिणाम दिसून येत नसून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा सारखाच असल्याने, नेहमीच लक्ष्मीच्या पावली कमिशन चालून येत असते. पान उत्पादकांना पानमळ्याचे व्यवस्थापन करताना नाकीनऊ होत असून, खुडेकरी आणि वेल बांधणारे यांची मजुरी भागविताना दमछाक होत आहे. ३ वर्षापासून प्रथमच पान उत्पादकांवर मंदीचे सावट कायम असून नेहमी ७०० ते ९०० रूपयांना विकली जाणारी १० कवळ्यांची एक करंडी अवघ्या २०० ते २५० रुपयांना विकली जात आहे. याशिवाय फापडा पानांच्या एका करंडीला किमान मिळणारा ३००० रुपये दर १००० रुपयांवर येऊन पोहोचला असल्याने पान उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.पान बाजारपेठेत मंदीचे सावट असल्याने कामगारांचा खर्च भागवून हाती काहीच पडत नाही. पानमळ्यात दर नाही म्हणून पाने ठेवल्यास, ती कालांतराने खराब होतात. खाऊची पाने नाशवंत असल्याने बाजारभावाचा विचार न करता पाने खुडावीच लागतात, अशीही माहिती त्यांनी दिली. भविष्यात अशीच स्थिती कायम राहिल्यास पानमळ्यांचे क्षेत्र वेगाने कमी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. - मधुकर जाधव, पान उत्पादक शेतकरीमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, चांदवड, रत्नागिरी, सांगोला, उस्मानाबाद आदी पान बाजारपेठा सध्या मंदीच्या खाईत लोटल्या आहेत. मद्रासी पानांची पान बाजारपेठेतील आवक कमी होऊनही, देशी पानांना फारशी मागणी नसल्याने पान बाजारपेठेत मंदीचे सावट कायम आहे.