शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

पावसाने दडी मारल्याने पान उत्पादक हताश

By admin | Updated: July 16, 2015 23:15 IST

उत्पादनात घट : पंधरा दिवसांनी येणारा खुड्याचा फेर तीस दिवसांवर गेला; बाजारात दरही घसरले

दिलीप कुंभार-नरवाड -सध्या पावसाने ओढ दिल्याने लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.उन्हामुळे होरपळून निघालेल्या पान उत्पादकांना पावसाळ्यात रिमझीम पाऊस आणि ढगाळ हवामानाची अपेक्षा होती, मात्र पानवेलींच्या वाढीसाठी पोषक हवामान नसल्याने पानांच्या फुटव्यावर परिणाम झाला आहे. १५ दिवसांनी येणारा खुड्याचा फेर ३० दिवसांवर गेला आहे. याशिवाय पान बाजार पेठेत देखील खाऊच्या पानांना कवडीमोलाची किंमत मिळत असल्याने, पान उत्पादकांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.पान व्यापाऱ्यांवर मात्र कोणताही परिणाम दिसून येत नसून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा सारखाच असल्याने, नेहमीच लक्ष्मीच्या पावली कमिशन चालून येत असते. पान उत्पादकांना पानमळ्याचे व्यवस्थापन करताना नाकीनऊ होत असून, खुडेकरी आणि वेल बांधणारे यांची मजुरी भागविताना दमछाक होत आहे. ३ वर्षापासून प्रथमच पान उत्पादकांवर मंदीचे सावट कायम असून नेहमी ७०० ते ९०० रूपयांना विकली जाणारी १० कवळ्यांची एक करंडी अवघ्या २०० ते २५० रुपयांना विकली जात आहे. याशिवाय फापडा पानांच्या एका करंडीला किमान मिळणारा ३००० रुपये दर १००० रुपयांवर येऊन पोहोचला असल्याने पान उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.पान बाजारपेठेत मंदीचे सावट असल्याने कामगारांचा खर्च भागवून हाती काहीच पडत नाही. पानमळ्यात दर नाही म्हणून पाने ठेवल्यास, ती कालांतराने खराब होतात. खाऊची पाने नाशवंत असल्याने बाजारभावाचा विचार न करता पाने खुडावीच लागतात, अशीही माहिती त्यांनी दिली. भविष्यात अशीच स्थिती कायम राहिल्यास पानमळ्यांचे क्षेत्र वेगाने कमी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. - मधुकर जाधव, पान उत्पादक शेतकरीमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, चांदवड, रत्नागिरी, सांगोला, उस्मानाबाद आदी पान बाजारपेठा सध्या मंदीच्या खाईत लोटल्या आहेत. मद्रासी पानांची पान बाजारपेठेतील आवक कमी होऊनही, देशी पानांना फारशी मागणी नसल्याने पान बाजारपेठेत मंदीचे सावट कायम आहे.