शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने पान उत्पादक हताश

By admin | Updated: July 16, 2015 23:15 IST

उत्पादनात घट : पंधरा दिवसांनी येणारा खुड्याचा फेर तीस दिवसांवर गेला; बाजारात दरही घसरले

दिलीप कुंभार-नरवाड -सध्या पावसाने ओढ दिल्याने लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.उन्हामुळे होरपळून निघालेल्या पान उत्पादकांना पावसाळ्यात रिमझीम पाऊस आणि ढगाळ हवामानाची अपेक्षा होती, मात्र पानवेलींच्या वाढीसाठी पोषक हवामान नसल्याने पानांच्या फुटव्यावर परिणाम झाला आहे. १५ दिवसांनी येणारा खुड्याचा फेर ३० दिवसांवर गेला आहे. याशिवाय पान बाजार पेठेत देखील खाऊच्या पानांना कवडीमोलाची किंमत मिळत असल्याने, पान उत्पादकांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.पान व्यापाऱ्यांवर मात्र कोणताही परिणाम दिसून येत नसून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा सारखाच असल्याने, नेहमीच लक्ष्मीच्या पावली कमिशन चालून येत असते. पान उत्पादकांना पानमळ्याचे व्यवस्थापन करताना नाकीनऊ होत असून, खुडेकरी आणि वेल बांधणारे यांची मजुरी भागविताना दमछाक होत आहे. ३ वर्षापासून प्रथमच पान उत्पादकांवर मंदीचे सावट कायम असून नेहमी ७०० ते ९०० रूपयांना विकली जाणारी १० कवळ्यांची एक करंडी अवघ्या २०० ते २५० रुपयांना विकली जात आहे. याशिवाय फापडा पानांच्या एका करंडीला किमान मिळणारा ३००० रुपये दर १००० रुपयांवर येऊन पोहोचला असल्याने पान उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.पान बाजारपेठेत मंदीचे सावट असल्याने कामगारांचा खर्च भागवून हाती काहीच पडत नाही. पानमळ्यात दर नाही म्हणून पाने ठेवल्यास, ती कालांतराने खराब होतात. खाऊची पाने नाशवंत असल्याने बाजारभावाचा विचार न करता पाने खुडावीच लागतात, अशीही माहिती त्यांनी दिली. भविष्यात अशीच स्थिती कायम राहिल्यास पानमळ्यांचे क्षेत्र वेगाने कमी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. - मधुकर जाधव, पान उत्पादक शेतकरीमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, चांदवड, रत्नागिरी, सांगोला, उस्मानाबाद आदी पान बाजारपेठा सध्या मंदीच्या खाईत लोटल्या आहेत. मद्रासी पानांची पान बाजारपेठेतील आवक कमी होऊनही, देशी पानांना फारशी मागणी नसल्याने पान बाजारपेठेत मंदीचे सावट कायम आहे.