शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पडळकरांच्या मतांमुळे प्रस्थापितांना धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 16:14 IST

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मागील तीन विधानसभा निवडणुकीत ७३ हजार ते ८० हजार मते मिळविणारा उमेदवार आमदार झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत सगळे प्रस्थापित नेते भाजप आणि ‘स्वाभिमानी’च्या मागे ठामपणे उभे असताना

ठळक मुद्देत्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे, तर पडळकरांचा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

अविनाश बाड  । आटपाडी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मागील तीन विधानसभा निवडणुकीत ७३ हजार ते ८० हजार मते मिळविणारा उमेदवार आमदार झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत सगळे प्रस्थापित नेते भाजप आणि ‘स्वाभिमानी’च्या मागे ठामपणे उभे असताना, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना खानापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ७८ हजार मते मिळाली. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांच्या मनात धडकी भरविणारी ही लोकसभा निवडणूक ठरली आहे.

खानापूर-आटपाडी आणि विसापूर मंडल या विधानसभा निवडणुकीचे गणित आजपर्यंत तरी प्रस्थापित नेते ज्या बाजूला, त्याच बाजूला मताधिक्य, असेच असल्याचे  स्पष्ट झाले आहे. आ. अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे नेते संजयकाकांच्या मागे होते. त्यामुळे संजयकाकांना या विधानसभा मतदारसंघात ७९,१७९ मते मिळाली. माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत पाटील यांच्यासह कॉँग्रेसची नेतेमंडळी ‘स्वाभिमानी’चे उमेदवार विशाल पाटील यांच्यामागे असूनही त्यांना या विधानसभा मतदारसंघात केवळ ४३,८२९ एवढी मते मिळाली.

एकही प्रस्थापित नेता मागे नसताना, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ७८,०२४ एवढी मते मिळाली. संजयकाकांना केवळ १,१५५ मतांचे मताधिक्य पडळकरांपेक्षा जास्त आहे. विशाल पाटील यांना संजयकाकांपेक्षा तब्बल ३५,३५०, तर पडळकरांपेक्षा ३४,१९५ कमी मते मिळाली आहेत.२००४ च्या विधानसभा निवडणुकीत सदाशिवराव पाटील ७९,८१३ मते मिळवून, तर २००९ मध्ये ७७,९६५ मते मिळवून विधानसभा निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये ७२,८४९ मते मिळवून आमदार अनिल बाबर जिंकले होते. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिला, तर प्रस्थापित नेत्यांना अस्वस्थ करणाराच लोकसभा निवडणुकीचा हा निकाल लागला आहे, असे म्हणावे लागेल.

अर्थात प्रत्येक निवडणुकीची रंगत वेगवेगळी असते. लोकसभा निवडणुकीत तालुक्याचा उमेदवार म्हणून मतदारांनी झुकते माप दिले. मात्र विधानसभेवेळी कोण कुणासमोर उभा राहणार, कुणाला कोण पाठिंबा देणार, यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. हे खरे असले तरी, निवडणूक यंत्रणेचा अभाव, नेत्यांची वानवा असताना ‘वंचित’च्या पडळकरांना मिळालेली मते निदान आमदारकीची स्वप्ने पाहणाºयांना आणि त्यांच्या चेल्यांना तरी काळजीत पाडणारी आहेत यात शंका नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे, तर पडळकरांचा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

टॅग्स :SangliसांगलीLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल