शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

पॅगो-रिक्षाचालकांतील वाद पेटला..!

By admin | Updated: July 7, 2015 23:37 IST

दररोज मारामारी : टप्पा वाहतुकीवरून संघर्ष, अधिकाऱ्यांची बोटचेपी भूमिका

सांगली : सांगली-मिरज मार्ग आणि या दोन्ही शहरात अ‍ॅपे पॅगो रिक्षाचालकांच्या सुरू असलेल्या टप्पा वाहतुकीच्या वादाने सध्या चांगलाच पेट घेतला आहे. टप्पा वाहतुकीस तीनआसनी रिक्षाचालकांचा विरोध आहे. यातून त्यांच्यात दररोज वाद व मारामारीचे प्रकार घडत आहेत. तीनआसनी रिक्षा संघटनेने यापूर्वी जिल्हा पोलीसप्रमुख व आरटीओंना टप्पा वाहतूक बंद करण्यासाठी अनेकदा निवेदन दिले आहे. पण हा विषय निकालात काढण्यासाठी एकही अधिकारी पुढाकार घेत नसल्याने वाद वाढत चाललाय. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.पॅगो डिझेल रिक्षाच्या टप्पा वाहतुकीमुळे आमचा व्यवसाय मोडकळीस आला असल्याचे तीनआसनी चालकांचे म्हणणे आहे. सांगली-मिरज मार्गावर दररोज पाचशे पॅगो चालक टप्पा वाहतूक करीत आहेत. सरसकट मिरजेला जाणारे प्रवासी न घेता ते शहरात कुठेही थांबून प्रवासी घेत आहेत. शहरातील स्थानिक रिक्षा व्यवसायावर त्यांनी कब्जा केला आहे. यामुळे पेट्रोल रिक्षाचालकांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. दिवसभर रांगेत थांबून त्यांना शंभर रुपयेही पगार पडत नाही. प्रवासी घेण्यास विरोध केला, तर तीनआसनी चालकांच्या अंगावर ते धावून येऊन, जिवंत ठेवणार नाही, अशी भाषा करीत आहेत. दररोज शहरात कुठे ना कुठे त्यांच्यात मारामारी होतच आहे. या वादाला कुठे तरी पूर्णविराम मिळण्याची गरज आहे. पोलीस व आरटीओ बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे हा प्रश्न पेटतच आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शहर पोलीस ठाण्याच्यासमोर तर दररोज मारामारी होत आहे. मंगळवारी दुपारी एक पॅगोचालक प्रवासी भरीत होता. त्यावेळी तीनआसनी चालकाने त्यास विरोध केल्यानंतर पॅगोचालकाने त्याच्या अंगावर रिक्षा घातली. या प्रकारामुळे काही तणाव निर्माण झाला होता. पोलीस ठाणे जवळ असूनही ते गांधीरीची भूमिका घेत असल्याने तीनआसनी रिक्षाचालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. येत्या चार-पाच दिवसात यासंदर्भात कोणताही निर्णय न झाल्यास तीनआसनी रिक्षा चालक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या तयारी आहेत. (प्रतिनिधी)तीन आसनी चालकांमध्ये खदखदसांगली जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव पवार म्हणाले, पॅगोची टप्पा वाहतूक बंद करावी, यासाठी गतवर्षी आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी टप्पा वाहतूक बंद करण्याचे आदेश देऊन तसे संघटनेला लेखी पत्र दिले होते. पण आरटीओ व वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचारी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. पॅगो डिझेल रिक्षाच्या टप्पा वाहतुकीमुळे आमचा व्यवसाय मोडकळीस आला असल्याचे तीनआसनी चालकांचे म्हणणे आहे. सांगली-मिरज मार्गावर दररोज पाचशे पॅगो चालक टप्पा वाहतूक करीत आहेत. सरसकट मिरजेला जाणारे प्रवासी न घेता ते शहरात कुठेही थांबून प्रवासी घेत आहेत. शहरातील स्थानिक रिक्षा व्यवसायावर त्यांनी कब्जा केला आहे, यामुळे तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांमध्ये खदखद सुरू आहे.