शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पॅगो-रिक्षाचालकांतील वाद पेटला..!

By admin | Updated: July 7, 2015 23:37 IST

दररोज मारामारी : टप्पा वाहतुकीवरून संघर्ष, अधिकाऱ्यांची बोटचेपी भूमिका

सांगली : सांगली-मिरज मार्ग आणि या दोन्ही शहरात अ‍ॅपे पॅगो रिक्षाचालकांच्या सुरू असलेल्या टप्पा वाहतुकीच्या वादाने सध्या चांगलाच पेट घेतला आहे. टप्पा वाहतुकीस तीनआसनी रिक्षाचालकांचा विरोध आहे. यातून त्यांच्यात दररोज वाद व मारामारीचे प्रकार घडत आहेत. तीनआसनी रिक्षा संघटनेने यापूर्वी जिल्हा पोलीसप्रमुख व आरटीओंना टप्पा वाहतूक बंद करण्यासाठी अनेकदा निवेदन दिले आहे. पण हा विषय निकालात काढण्यासाठी एकही अधिकारी पुढाकार घेत नसल्याने वाद वाढत चाललाय. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.पॅगो डिझेल रिक्षाच्या टप्पा वाहतुकीमुळे आमचा व्यवसाय मोडकळीस आला असल्याचे तीनआसनी चालकांचे म्हणणे आहे. सांगली-मिरज मार्गावर दररोज पाचशे पॅगो चालक टप्पा वाहतूक करीत आहेत. सरसकट मिरजेला जाणारे प्रवासी न घेता ते शहरात कुठेही थांबून प्रवासी घेत आहेत. शहरातील स्थानिक रिक्षा व्यवसायावर त्यांनी कब्जा केला आहे. यामुळे पेट्रोल रिक्षाचालकांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. दिवसभर रांगेत थांबून त्यांना शंभर रुपयेही पगार पडत नाही. प्रवासी घेण्यास विरोध केला, तर तीनआसनी चालकांच्या अंगावर ते धावून येऊन, जिवंत ठेवणार नाही, अशी भाषा करीत आहेत. दररोज शहरात कुठे ना कुठे त्यांच्यात मारामारी होतच आहे. या वादाला कुठे तरी पूर्णविराम मिळण्याची गरज आहे. पोलीस व आरटीओ बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे हा प्रश्न पेटतच आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शहर पोलीस ठाण्याच्यासमोर तर दररोज मारामारी होत आहे. मंगळवारी दुपारी एक पॅगोचालक प्रवासी भरीत होता. त्यावेळी तीनआसनी चालकाने त्यास विरोध केल्यानंतर पॅगोचालकाने त्याच्या अंगावर रिक्षा घातली. या प्रकारामुळे काही तणाव निर्माण झाला होता. पोलीस ठाणे जवळ असूनही ते गांधीरीची भूमिका घेत असल्याने तीनआसनी रिक्षाचालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. येत्या चार-पाच दिवसात यासंदर्भात कोणताही निर्णय न झाल्यास तीनआसनी रिक्षा चालक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या तयारी आहेत. (प्रतिनिधी)तीन आसनी चालकांमध्ये खदखदसांगली जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव पवार म्हणाले, पॅगोची टप्पा वाहतूक बंद करावी, यासाठी गतवर्षी आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी टप्पा वाहतूक बंद करण्याचे आदेश देऊन तसे संघटनेला लेखी पत्र दिले होते. पण आरटीओ व वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचारी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. पॅगो डिझेल रिक्षाच्या टप्पा वाहतुकीमुळे आमचा व्यवसाय मोडकळीस आला असल्याचे तीनआसनी चालकांचे म्हणणे आहे. सांगली-मिरज मार्गावर दररोज पाचशे पॅगो चालक टप्पा वाहतूक करीत आहेत. सरसकट मिरजेला जाणारे प्रवासी न घेता ते शहरात कुठेही थांबून प्रवासी घेत आहेत. शहरातील स्थानिक रिक्षा व्यवसायावर त्यांनी कब्जा केला आहे, यामुळे तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांमध्ये खदखद सुरू आहे.