शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

ओझर्डेच्या शेतकऱ्याची शेती उभ्या ऊस पिकासह गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील रेठरे धरण- ओझर्डे हद्दीवर असणाऱ्या तिळगंगा नदीने पात्र बदलल्याने अनेक शेतकऱ्यांना कोट्यवधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील रेठरे धरण- ओझर्डे हद्दीवर असणाऱ्या तिळगंगा नदीने पात्र बदलल्याने अनेक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. ओझर्डे येथील जगदीश श्यामराव पाटील या शेतकऱ्याची तब्बल ३० गुंठे शेतीच उभ्या ऊस पिकासह वाहून गेली आहे. या नदीकिनारी असणारा दगडी संरक्षक बांध प्रवाहात वाहून गेल्याने मोठी हानी झाली आहे. या शेतकऱ्याचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जगदीश पाटील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेती हाच त्याचा व्यवसाय आहे. अवघी ३० गुंठे शेती असताना तेच संपूर्ण क्षेत्र ऊस पिकासह वाहून गेले. सात ते आठ महिन्यांपूर्वी त्यांनी ऊसाची लागण केली होती. मेहनत करण्यासाठी ७० हजार रुपये खर्च केला होता. शेतजमिनीच्या कडेने तिळगंगा नदीचे पात्र असल्याने अनेक शेतकऱ्यांनी दगडी तालीचे बांध घातले होते. त्यांच्या शेतीपासून अगदी जवळ ओढासदृश नदीवर छोटा सिमेंट बांध आहे. त्याच्या बाजूने मार्ग काढत पाण्याचा प्रवाह बाजूच्या शेतातील उभ्या पिकात पाणी घुसल्याने ओढ्याने पात्र बदलेले आहे.

जगदीश पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी सोसायटीचे कर्ज काढून शेतजमिनीला संरक्षक भिंत घातली होती. त्याला तब्बल तीन लाख रुपये असा खर्च आला होता. वीस फूट उंची असणारी आणि चारशे फूट लांब असणारी संरक्षक भिंत पाण्याच्या प्रचंड दाबाने फुटून ३० गुंठे जमीनच गायब झाली. या प्रकाराने त्यांचे कुटुंबीय हतबल झाले आहेत. कोरडवाहू शेती असल्याने ठिबक योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात होते. हे सर्व ठिबकचे पाइपलाइन संचही वाहून गेले आहेत. पाणी वाहून गेल्याच्या खुणा जमिनीवर दिसत आहेत. काही उभा ऊस आडवा झाला आहे.

पाटील यांना दोन मुले आहेत. पती-पत्नी, आई-मुलगा असे चौकोनी कुटुंब याच ३० गुंठे शेतीवर उदरनिर्वाह करीत होते. एक म्हैस आहे. तिला अन् कुटुंबाला जगवण्यासाठी आता रोजंदारी शिवाय पर्याय नाही. कोरोनामुळे हाताला काम मिळत नाही, पुढे करायचे काय? हा प्रश्न या कुटुंबापुढे निर्माण झाला आहे.

फोटो : २७ इस्लामपुर १..२..३

ओळ : ओझर्डे (ता. वाळवा) येथील शेतकऱ्याची ऊस पिकासह वाहून गेलेली शेती.