शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या पूरपट्ट्यात १० हजारांवर अतिक्रमणे, हटविण्याचे औपचारिक आदेश की खरोखर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:14 IST

वॉर्डनिहाय सर्वेक्षण सुरु

सांगली : महापालिकेनेच २००६ मध्ये केलेल्या एका सर्व्हेनुसार पूरपट्ट्यात २ हजार ५०० अतिक्रमणे आढळली होती. त्यानंतर १९ वर्षात अतिक्रमणांचा पूरसांगलीच्या पूरपट्ट्यात आला. तो अजूनही कायम आहे. आता या अतिक्रमणांची संख्या १० हजारांवर गेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही औपचारिकता ठरणार की खरोखरच सांगलीकरांना पुराच्या धोक्यातून मुक्त करण्यासाठी कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आपत्ती व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाच दुसऱ्या बाजूने सांगलीकरांना पुराच्या आपत्तीत ढकलण्याचा घाट घातला जात आहे. अनेक राजकीय नेते, बिल्डर, व्यावसायिक आणि शासकीय अधिकाऱ्यांनी याच पूरपट्ट्यातील वाहत्या पाण्यात हात धुऊन घेतले. त्यांची हीच कृती सांगली शहराला बुडविण्यास कारणीभूत ठरत आहे.नदी, नैसर्गिक नाले आणि पूरपट्ट्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई का होत नाही, या प्रश्नाचे गूढ कायम आहे. निळी रेषा पाटबंधारे विभाग तयार करतो, या पट्ट्यात बांधकाम परवाने न देण्याची जबाबदारी महापालिकेची असते. मात्र, या रेषेतच गेल्या नऊ वर्षांत जागा विक्रीचा बाजार प्रशासकीय कृपेने मांडला गेला. त्यामुळेच कारवाईचे धाडस कुणीही करीत नाही. आता अतिक्रमण करणारे इतके बेफाम झाले आहेत की त्यांनी परवानग्या न घेताच नाले अन् ओतात बांधकामे करण्याचा सपाटा लावला आहे.

..तर चंद्रकांत पाटील सांगलीचे हिरोपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाप्रमाणे नाले, ओढ्यांतील अतिक्रमणे हटली तर सांगलीकर त्यांची ही लोकहिताची कृती कधीही विसरणार नाहीत. सांगलीकरांसाठी ते व महापालिकेचे आयुक्त हिरो ठरतील. त्यामुळेच सांगलीकरांना दिलेला शब्द ते पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वॉर्डनिहाय सर्वेक्षण सुरुमहापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, नाले व ओढ्यातील अतिक्रमणे यांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. वॉर्डनिहाय सर्वेक्षण होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई होईल, असे सांगितले जात आहे.

४३.३ फुटांवर आखली पूररेषाजुलै २००५ मध्ये आलेल्या पुराचा विचार करून पाटबंधारे विभागाने १७ मार्च २००६ रोजी ४३.३ फूट पूर पातळी गृहीत धरून निळी रेषा आखली होती. या क्षेत्रात बांधकाम परवाने देता येत नाहीत. याशिवाय पूररेषेबाहेर ज्या भागात दीर्घकाळ पुराचे पाणी साचते त्या ठिकाणीही परवाने नाकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यामुळे सर्वेक्षणात अशी बांधकामेही अतिक्रमणात गृहीत धरायला हवीत.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलguardian ministerपालक मंत्री