शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

सांगलीच्या पूरपट्ट्यात १० हजारांवर अतिक्रमणे, हटविण्याचे औपचारिक आदेश की खरोखर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:14 IST

वॉर्डनिहाय सर्वेक्षण सुरु

सांगली : महापालिकेनेच २००६ मध्ये केलेल्या एका सर्व्हेनुसार पूरपट्ट्यात २ हजार ५०० अतिक्रमणे आढळली होती. त्यानंतर १९ वर्षात अतिक्रमणांचा पूरसांगलीच्या पूरपट्ट्यात आला. तो अजूनही कायम आहे. आता या अतिक्रमणांची संख्या १० हजारांवर गेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही औपचारिकता ठरणार की खरोखरच सांगलीकरांना पुराच्या धोक्यातून मुक्त करण्यासाठी कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आपत्ती व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाच दुसऱ्या बाजूने सांगलीकरांना पुराच्या आपत्तीत ढकलण्याचा घाट घातला जात आहे. अनेक राजकीय नेते, बिल्डर, व्यावसायिक आणि शासकीय अधिकाऱ्यांनी याच पूरपट्ट्यातील वाहत्या पाण्यात हात धुऊन घेतले. त्यांची हीच कृती सांगली शहराला बुडविण्यास कारणीभूत ठरत आहे.नदी, नैसर्गिक नाले आणि पूरपट्ट्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई का होत नाही, या प्रश्नाचे गूढ कायम आहे. निळी रेषा पाटबंधारे विभाग तयार करतो, या पट्ट्यात बांधकाम परवाने न देण्याची जबाबदारी महापालिकेची असते. मात्र, या रेषेतच गेल्या नऊ वर्षांत जागा विक्रीचा बाजार प्रशासकीय कृपेने मांडला गेला. त्यामुळेच कारवाईचे धाडस कुणीही करीत नाही. आता अतिक्रमण करणारे इतके बेफाम झाले आहेत की त्यांनी परवानग्या न घेताच नाले अन् ओतात बांधकामे करण्याचा सपाटा लावला आहे.

..तर चंद्रकांत पाटील सांगलीचे हिरोपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाप्रमाणे नाले, ओढ्यांतील अतिक्रमणे हटली तर सांगलीकर त्यांची ही लोकहिताची कृती कधीही विसरणार नाहीत. सांगलीकरांसाठी ते व महापालिकेचे आयुक्त हिरो ठरतील. त्यामुळेच सांगलीकरांना दिलेला शब्द ते पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वॉर्डनिहाय सर्वेक्षण सुरुमहापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, नाले व ओढ्यातील अतिक्रमणे यांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. वॉर्डनिहाय सर्वेक्षण होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई होईल, असे सांगितले जात आहे.

४३.३ फुटांवर आखली पूररेषाजुलै २००५ मध्ये आलेल्या पुराचा विचार करून पाटबंधारे विभागाने १७ मार्च २००६ रोजी ४३.३ फूट पूर पातळी गृहीत धरून निळी रेषा आखली होती. या क्षेत्रात बांधकाम परवाने देता येत नाहीत. याशिवाय पूररेषेबाहेर ज्या भागात दीर्घकाळ पुराचे पाणी साचते त्या ठिकाणीही परवाने नाकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यामुळे सर्वेक्षणात अशी बांधकामेही अतिक्रमणात गृहीत धरायला हवीत.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलguardian ministerपालक मंत्री