शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
2
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
4
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
5
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
7
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
8
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
9
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
10
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
11
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
12
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
13
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
14
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
15
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
16
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
17
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
18
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
19
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
20
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव

बंदविरोधात तासगावात व्यापाऱ्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:28 IST

तासगाव : शनिवारी-रविवारी बंदच्या मानसिकतेत असणाऱ्या तासगावच्या व्यापाऱ्यांना मंगळवारी सकाळपासूनच व्यापार बंद ठेवावा लागला. ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली दि. ...

तासगाव : शनिवारी-रविवारी बंदच्या मानसिकतेत असणाऱ्या तासगावच्या व्यापाऱ्यांना मंगळवारी सकाळपासूनच व्यापार बंद ठेवावा लागला. ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली दि. ३० एप्रिलपर्यंत पुन्हा लॉकडाऊन पाळावा लागणार आहे. हे समजताच व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला. त्यातच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अर्ध्या गावातील व्यवहार सुरू होता. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी तासगाव नगरपालिकेत धाव घेतली. तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी व्यापाऱ्यांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता शासनाने नाही नाही म्हणत छुप्या मार्गाने पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांच्या समोर यायला मंगळवारची सकाळ उजाडावी लागली. मंगळवारी सकाळी तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद करण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी मुख्याधिकारी पाटील आपल्या हातात शासनाच्या नियमांचा कागद घेऊन व्यापाऱ्यांना समजावून सांगत होते. शनिवार-रविवारी आम्ही बंद ठेवणार होतो. आता आमची दुकाने का बंद करता? असा व्यापाऱ्यांचा प्रश्न होता. ३० तारखेपर्यंत दुकान बंद ठेवायला लागणार; यामुळे व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला. संतप्त व्यापाऱ्यांनी तासगाव पालिकेत धाव घेतली.

मागील लॉक डाऊनच्या संकटातून आता कुठे बाहेर पडतोय. मागच्या वेळीही लाईट बिल, दुकान भाडे, बँकांचे व्याज काही शासनाने माफ केले नाही. विटा, इस्लामपूर या ठिकाणी व्यापार सुरू आहे. मग तासगावातीलच दुकाने बंद? का ? किराणा दुकाने, बेकरी, भाजीबाजारात गर्दी आहे. मग बाकीची दुकाने का बंद? आमच्या आर्थिक प्रश्नावर तोडगा काय?अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती व्यापाऱ्यांनी केली.

चौकट

पोलीस निरीक्षक झाडे व मुख्याधिकारी पाटील यांनी अतिशय संयमाने संतप्त व्यापाऱ्यांना शांत केले. पाटील यांनी व्यापाऱ्यांना आपण निवेदन द्या; आम्ही ते शासनाकडे पाठवू, अशा शब्दांत व्यापाऱ्यांची समजूत काढली. पोलीस निरीक्षक झाडे म्हणाले, प्रशासन व्यापाऱ्यांच्या विरोधात अजिबात नाही. संपूर्ण महाराष्ट्र शासन निर्णयाने बंद झाला आहे. फक्त तासगावचा प्रश्न नाही कोरोनाचे पेशंट वाढत असल्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी बंद ठेवून सहकार्य करावेेे असे त्यांनी आवाहन केले.