शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

जयंतराव असतील तर आमची उपस्थिती!

By admin | Updated: November 14, 2014 23:23 IST

उलटसुलट चर्चा : कारखाना गळीत हंगामास बहुतांशी पदाधिकाऱ्यांची दांडी

अशोक पाटील - इस्लामपूर -जयंत पाटील यांनी १९९९ पासून सलग १५ वर्षे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद सांभाळले. या काळात त्यांच्या मतदारसंघातील त्यांचे एकनिष्ठ, पै-पाहुणे आणि राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकारी त्यांच्या अवतीभवती वावरत. आता मंत्रीपद गेल्यानंतर प्रथमच राजारामबापू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमात जयंत पाटील अनुपस्थित राहणार असल्याचे कळताच बहुतांश पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली. यावरून जयंत पाटील असतील तरच आमचीही उपस्थिती राहील, अशी भूमिका या मंडळींची राहील, असे दिसत आहे.राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी व जत या शाखांच्या गळिताचा प्रारंभ एकाच दिवशी झाला. अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी, इस्लामपूर पालिकेचे सत्ताधारी नगरसेवकांना दिले होते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पत्रही पाठविले होते. निमंत्रणपत्रिकेवर प्रमुख पाहुण्यांसह जयंत पाटील यांच्या नावाचा समावेश होता. परंतु ऐनवेळी पाटील यांना शरद पवार यांनी मुंबई येथे बोलावून घेतले. त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीत हे अगोदरच समजले. परिणामी अनेक पदाधिकारी व नेहमी त्यांच्या आजुबाजूला असणाऱ्यांनी गळीत हंगाम कार्यक्रमाला दांडी मारली. याची चर्चाही कार्यक्रमस्थळी होती. गर्दी कमी असल्याचे पाहून मंत्रीपद गेल्यानंतर पाटील यांचा दबदबा कमी झाला का, असाही सवाल उपस्थित केला जात होता. कारखान्याची दुसरी शाखा सुरू होईपर्यंत ज्यांनी साखर वर्ज्य केली होती, त्या जनार्दनकाका पाटील व त्यांचे पुत्र माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील गव्हाणीत उसाची मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर हजर झाले. असाच प्रकार अनेक नेत्यांबाबत घडला. ज्यांच्या मागे कसलीही ताकद नाही, असे पदाधिकारी मात्र पुढे-पुढे करून तोरा मिरवत होते. जयंत पाटील कार्यक्रमास उपस्थित असते, तर असे घडले असते का?, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची घोडदौड सुरू आहे. एकाच दिवशी चार कारखान्यांच्या गळीत हंगामाचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागली. या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्योग समूहातील पदाधिकारी, पालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिले होते. याव्यतिरिक्त स्वत:च्या सहीची पत्रेही पाठविली होती.- पी. आर. पाटील, अध्यक्ष, राजारामबापू साखर कारखाना