शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विट्यातील गाळे काढून घेण्याचे आदेश

By admin | Updated: May 28, 2016 00:53 IST

बांधकाम समितीत निर्णय : कणेगावच्या कमानीचा प्रस्ताव फेटाळला

सांगली : विटा येथील जिल्हा परिषदेच्या दुकान गाळ्यांतील सहा दुकानदारांनी कराराचा भंग केला आहे. यामुळे त्यांच्याकडील गाळे काढून घेऊन ते अन्य व्यक्तींना भाड्याने देण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच जीवन प्रबोधनी आणि नगरवाचनालय यांच्याकडून भाड्याची थकीत रक्कम आठ दिवसात वसूल करण्याचा निर्णय झाला. तसेच कणेगाव (ता. वाळवा) येथील दोन व्यक्तींनी स्वागत कमानीसाठी प्रस्ताव पाठविल्यामुळे दोन्ही प्रस्ताव फेटाळण्यात आले. ग्रामपंचायतीने तेथील कायदा सुव्यवस्थेचा विचार करून दोन्ही स्वागत कमानींच्या जागा निश्चित करून फेरप्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.सभापती भाऊसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची बैठक झाली. विटा येथील खानापूर पंचायत समितीच्या उत्पन्नातून गाळे बांधले आहेत. या गाळ्यांचा अनधिकृत वापर सुरु असल्यावरून वाद निर्माण झाला होता. तसेच दोन संस्थांनी अनधिकृत बांधकाम केल्यावरूनही दोन सभांमध्ये वादळी चर्चाही झाली होती. दोन्ही संस्थांनी तोडगा काढून वाद मिटविला. परंतु, गाळ्यांच्या थकीत भाड्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच काही गाळेधारक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे भाडे वसुलीचा प्रश्न गंभीर निर्माण झाला असला तरी, यावेळी काही गाळेधारकांनी कराराचा भंग केला आहे. या कायद्यानुसार त्यांचे गाळे खाली करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.त्यानुसार गाळेधारकांकडून गाळे परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जीवन प्रबोधनी आणि नगरवाचनालयाकडून थकीत भाडे वसूल करण्याचाही निर्णय घेण्यात आला.कणेगाव येथील भीमराव आत्माराम पाटील यांनी स्वखर्चातून स्वागत कमान बांधण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत २७ एप्रिल २०१२ रोजी प्रस्ताव पाठविला होता. या गटाची सत्ता गेल्यानंतर अ‍ॅड्. विश्वासराव संपतराव पाटील यांनी स्वखर्चातून कमान बांधण्यासाठी ११ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रस्ताव दिला आहे. दोन्ही गटांचे प्रस्ताव समितीसमोर शुक्रवारी आले होते. यावेळी दोन्ही प्रस्ताव परत ग्रामपंचायतीकडे पाठविण्याचा निर्णय झाला. रस्त्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडील रस्त्यांना निधी मिळत नाही. यामुळे हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची मागणी सदस्य सुरेश मोहिते यांनी केली. कडेगाव तालुक्यातील सहा रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचे ठरले. भाऊसाहेब पाटील म्हणाले की, विशेष रस्ते दुरुस्तीसाठी ३६ कामांसाठी तीन कोटी १९ लाखाचा निधी मंजूर आहे. खानापूर तालुक्यातील बारा रस्त्यांच्या कामासाठी आठ कोटी ११ लाख आणि तासगाव तालुक्यातील सात कामांसाठी चार कोटी ९९ लाख मंजूर आहेत. दोन्ही गटांचे प्रस्ताव समितीसमोर शुक्रवारी आले होते. यावेळी दोन्ही प्रस्ताव परत ग्रामपंचायतीकडे पाठविण्याचा निर्णय झाला.