शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

इस्लामपूरच्या आराखड्याबाबत विरोधकांत मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2016 00:47 IST

राजू शेट्टी यांची शुक्रवारी बैठक : राष्ट्रवादीविरोधातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार

अशोक पाटील :: इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने शहराचा नियोजित विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनदरबारी पाठवला आहे. परंतु त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिलेली नाही. तो मंजूर होण्यासाठी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांना याप्रश्नी लक्ष घालण्यास सांगितले आहे. त्यामुळे शेट्टी यांनी शुक्रवार, दि. २५ रोजी राष्ट्रवादीविरोधातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये विकास आराखड्यावर मंथन होणार आहे.शहराच्या १९८० नंतरच्या विकास आराखड्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. मंजुरीअगोदरच या विकास आराखड्यावर पालिका प्रशासनाने लाखो रुपये उधळले आहेत. आराखडा मंजूर करून तो नगरविकास खात्याकडे अंतिम मंजुरीस पाठविला आहे. परंतु तो रद्द व्हावा म्हणून भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रमभाऊ पाटील व काही विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीने मंजूर केलेल्या आराखड्यास शासनदरबारी अडथळे येत आहेत. सध्या इस्लामपूर शहरात गुंठेवारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कायदेशीर मार्गाने घर बांधता येत नाही. खरेदीचे व्यवहार ठप्प झाले असून, नोटरी करुन खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. यामध्ये बहुतांशवेळा फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. एकच जागा अनेकांना विकली जात आहे. अशा व्यवहारामुळे गावगुंड आणि जागांचे दलाल मालमाल झाले आहेत.शुक्रवार, दि. २५ रोजी खा. राजू शेट्टी विरोधकांची बैठक बोलावणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, विक्रम पाटील, वैभव पवार, बाबासाहेब सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते विजय कुंभार, शिवसेनेचे आनंदराव पवार उपस्थित राहणार असून, शेट्टी त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत. विकास आराखड्यासंदर्भात या बैठकीत मंथन होणार असून, त्याचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर होणार आहे. त्यानंतरच इस्लामपूर येथील आराखड्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे विरोधकांतून बोलले जात आहे.कोण, काय म्हणाले?राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर शहरातील विरोधी नगरसेवकांसह इतर घटकपक्षांना एकत्रित करून बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत आराखड्यासंदर्भात चर्चा होऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. मुख्यमंत्री फडणवीस आणि शेट्टी यांची आराखड्यासंदर्भात दोन-तीन वेळा बैठक झाली आहे. येणाऱ्या काही महिन्यातच आराखड्याचा प्रश्न मार्गी लागेल.- भागवत जाधव, प्रवक्ते, स्वाभिमानी पालिका प्रशासनाच्या पातळीवर नियोजित विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तो नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तो सध्या नगरविकास खात्याकडे मंजुरीविना पडून आहे. आमचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा मंजुरीसाठी प्रयत्न करत आहोत. परंतु अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही.- सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्ष, इस्लामपूर.