शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

'आयर्विन'च्या समांतर पुलास व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आयर्विन पुलाजवळून समांतर पूल उभारून तो कापडपेठेतून कायम करण्यास सांगलीतील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आयर्विन पुलाजवळून समांतर पूल उभारून तो कापडपेठेतून कायम करण्यास सांगलीतील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी तक्रार केली असून, येत्या २३ मार्च रोजी सांगलीत या प्रश्नी बैठक होणार आहे.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली कापड पेठ येथे ही बैठक पार पडली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार, माजी नगरसेवक हरीदास पाटील, व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा, रणजित जोग, हरिष लालन, रमण सारडा, राहुल आरवाडे, जुबेन शहा, युसुफ जमादार यांच्यासह कापडपेठ, हरभट रोड, सराफ कट्टा, मारुती रोड, बालाजी चौक, मेन रोड येथील व्यापारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांनी या बैठकीत समांतर पूल व्यापारी पेठांमधून नेण्यास तीव्र विरोध दर्शविला.

संजय बजाज म्हणाले की, आयर्विनचा पर्यायी समांतर पूल व्यापारी पेठेतून जाणार असेल तर तो पेठेला हितकारक नाही. आमदार सुधीर गाडगीळ यांनी एकही दुकान बाधित होणार नाही, असे सांगितले असले तरी भविष्यात कोणताही अधिकारी आला तर तो या रस्त्याचे पुलाच्या रुंदीप्रमाणे रुंदीकरण करणारच आहे. कापडपेठ व मेन रोडच्या रस्ता रुंदीकरणाबाबतचा एक पत्रव्यवहार नुकताच सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका आयुक्तांमध्ये झालेला आहे. त्यामुळे हा पूल झाल्यास व्यापारी पेठा उद्ध्वस्त होतील. शहरांचा विकास करताना नेहमी रिंगरोड करून वाहतूक बाहेरून न्यायची असते. सांगलीत मात्र उलटे घडत आहे. या ठिकाणी शहरातून अवजड वाहतूक नेण्याचे नियोजन सुरू आहे.

चौकट

सांगलीत उद्या बैठक

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेत उद्या, मंगळवारी आढावा बैठक होणार आहे. यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने याप्रकरणी निवेदन देऊन विरोध केला जाणार आहे.

चौकट

आमदारांनी चर्चा करावी

समीर शहा म्हणाले की, या पुलाला विरोध असणाऱ्या आम्हा व्यापाऱ्यांशी आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी. अधिकाऱ्यांनाही सोबत घ्यावे. आता व भविष्यात कधीही पेठांमधील दुकानांना बाधा पोहोचणार नाही, अशी लेखी हमी द्यावी. आम्ही हे आंदोलन मागे घेऊन पुलाला पाठिंबा देऊ

चौकट

सांगलीवाडी नागरिकांना पूल हवा!

सांगलीवाडीचे हरिदास पाटील म्हणाले की, सांगलीवाडीतील लोकांना हा समांतर पूल हवा आहे, मात्र तो व्यापारी पेठांचे नुकसान करून होणार असेल तर नको आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच्या आराखड्यात समांतर पूल टिळक चौकाला जोडला होता. तोच कायम करावा.