शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

निकृष्ट विकास कामांवर विरोधक अजूनही गप्पच

By admin | Updated: February 9, 2015 23:56 IST

इस्लामपूर नगरपालिका : वैभव पवार यांचा एकाकी लढा

अशोक पाटील - इस्लामपूर - भुयारी गटार, सुंदर बगीचा, भव्य सुशोभित रस्ते, २४ तास शुध्द आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन, वृक्षारोपणसारख्या योजना राबविण्यात इस्लामपूर नगरपरिषद आघाडीवर आहे. शासनाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपये पालिकेकडून खर्ची टाकले जात आहेत. झालेली कामे आणि शहरात होत असलेले रस्ते निकृष्ट असल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार आक्रमक झाले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर विरोधी नगरसेवक विजय कुंभार, आनंदराव पवार, कपिल ओसवाल यांनी मौन पाळले आहे.इस्लामपूर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे स्वप्न माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे आहे. यासाठी त्यांनी सत्तेत असताना कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचा पोहण्याचा तलाव, सुंदर बगीचा, प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे, नाट्यगृह, खुले नाट्यगृह, घरकुल योजना, अद्ययावत न्यायालयाची इमारत आदी विकासकामे झाली आहेत. परंतु यातील काही कामे वगळता सर्वच कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे वेळोवेळी आरोप झाले आहेत. शहराला २४ तास पाणी देण्याची सत्ताधाऱ्यांची घोषणा हवेत विरली आहे. शहराच्या उपनगरांना पुरेसे पाणीही मिळत नाही, मग २४ तास पाणी कोठून देणार?, असाही प्रश्न उपस्थित होतो.सध्या शहरात रस्ते करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. एका तासात रस्ता बनविण्याचे तंत्र पालिकेच्या ठेकेदाराने अवगत केले आहे. यामुळे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्टपणे होत आहे. सलग दोन दिवस हे काम काँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार यांनी बंद पाडले. यावेळी विरोधी नगरसेवक विजय कुंभार, आनंदराव पवार, कपिल ओसवाल यांनी पवार यांना पाठिंबा देणे गरजेचे असतानाही ते मौन पाळून आहेत.सध्या शहरात राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम पाटील, जयकर पाटील यांच्यासह शिवसेनेचे नेते कार्यरत आहेत. तेही वैभव पवार यांच्या मदतीला आले नाहीत.हे सर्वच नेते सत्ताधाऱ्याऱ्याच्या विरोधात एकाकी लढत असल्याने कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळेच पालिकेने ‘निकृष्ट दर्जा’ हे ब्रीद तयार करून आपली वाटचाल ठेवली आहे. सध्या इस्लापूर शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. भविष्यात भुयारी गटार योजना अमलात आणावयाची आहे. त्यामुळे पुन्हा रस्ते खोदले जाणार आहेत. त्यामुळेच सध्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. त्याचा दर्जा तज्ज्ञांकडून तपासून घेऊन विरोधकांनी आरोप करावेत.-विजय पाटील, पक्षप्रतोद, इस्लामपूर पालिकासध्या शहरात राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम पाटील, जयकर पाटील यांच्यासह शिवसेनेचे नेते कार्यरत आहेत. तेही वैभव पवार यांच्या मदतीला आले नाहीत. हे सर्वच नेते सत्ताधाऱ्यांविरोधात एकाकी लढत असल्याने कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळेच पालिकेने ‘निकृष्ट दर्जा’ हे ब्रीद तयार करून आपली वाटचाल चालू ठेवली आहे. सध्या रस्त्याचे काम १ इंच जाडीचे कारपेट धरून केले जात आहे. हे रस्ते येणाऱ्या पावसाळ्यातच नेस्तनाबूत होणार आहेत. रस्त्याच्या खर्चाचे बजेट अत्यल्प असल्याने तक्रारी करूनही उपयोग होणार नाही. यापूर्वी सर्वसामान्यांना खाचखळग्यातून चालावे लागत होते. त्यापेक्षा हे रस्ते बरे म्हणायचे.- वैभव पवार, माजी नगरसेवक, काँग्रेस