शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या जागा केल्या खुल्या

By admin | Updated: January 13, 2016 23:17 IST

संजयनगरमध्ये कारवाई : अतिक्रमण पथकाने पाच खोकी हटविली

 सांगली : शहरातील संजयनगर येथील राज्य शासनाच्या १३.३६ गुंठे जागेवर केलेले अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने बुधवारी उद्ध्वस्त केले. या जागेवर तिघांनी पत्र्याचे शेड मारून रुग्णालय, अंगणवाडी, वेल्डिंग वर्कशॉप सुरू केले होते. याच परिसरातील शंभरफुटी रस्त्यावरील पाच खोकीही हटविण्यात आली. संजयनगर येथील जगदाळे प्लॉटमधील साठफुटी रस्त्यालगत अर्बन लँड सिलिंगमधील १३.३६ गुंठे जागा राज्य शासनाच्या नावावर आहे. या जागेसंदर्भात मालक व शासनात न्यायालयीन दावाही सुरू आहे. शासनाचे नाव लागले असले तरी, मूळ मालकाला नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे मूळ मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली नाही. त्यात नगरसेवक सुनील कलकुटगी यांनी, या जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पण याची त्यांनी दखल न घेतल्याने कलकुटगी यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार केली. नगरविकासच्या कक्ष अधिकाऱ्यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी महापालिकेच्या पथकाला अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. पालिकेचे सहायक आयुक्त रमेश वाघमारे, अभियंता आप्पा हलकुडे, नगररचनाचे संजय कांबळे यांच्या पथकाने दुपारी शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या जागेवर एकाने रुग्णालय सुरू केले होते. त्याच्याशेजारीच अंगणवाडी व वेल्डिंगचे वर्कशॉप होते. बाजूच्या एका प्लॉटमध्ये पत्र्याचे शेड उभारले होते. त्यानंतर या पथकाने संजयनगर शंभरफुटी रस्त्यावरील बीएसएनएलजवळील खोक्यांवर कारवाई केली. या ठिकाणी नव्याने खोकी उभारण्यात आली होती. या कारवाईला खोकीधारकांनी सुरूवातीला विरोध केला. नोटीस न देता खोकी हटवू नका, अशी भूमिका घेतली. पण अधिकाऱ्यांनी, खोकी उभारताना पालिकेची परवानगी घेतली होती का? आता कशाला नोटीस हवी? असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर त्याठिकाणची पाच खोकी हटविण्यात आली. अजूनही या रस्त्यावर ५० खोकी असून तीही हटविण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) धनदांडग्यांची अतिक्रमणे हटवा : संभाजी पवार शहरात अनेक धनदांडग्यांनी रस्त्यावर बंगले, शोरूम, दुकाने थाटली आहेत. त्यांचे अतिक्रमण हटविण्याचे धाडस प्रशासनाने दाखवावे. मग गोरगरिबांवर हातोडा टाकावा. सध्याची अतिक्रमण हटाव मोहीम राजकीय दबावाने सुरू आहे. त्याबद्दल जनतेत असंतोष आहे. प्रशासनाने आधी हातगाडी, फेरीवाले, विक्रेते यांचे पुनवर्सन करावे, त्यांना नोटिसा द्याव्यात, मगच कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन उभे करावे लागले, असा इशारा माजी आमदार संभाजी पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.