शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या अडीच दिवसांच्या पावसाने केले परागंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST

फोटो २६ संतोष ०१ गावभागातील दीपक शिकलगार यांच्या अख्खे कुटुंब पूरग्रस्त झाले आहे. दामाणी हायस्कूलमधील निवारा केंद्रात थांबून पूर ...

फोटो २६ संतोष ०१

गावभागातील दीपक शिकलगार यांच्या अख्खे कुटुंब पूरग्रस्त झाले आहे. दामाणी हायस्कूलमधील निवारा केंद्रात थांबून पूर ओसरण्याची वाट ते पाहत आहेत.

फोटो २६ संतोष ०२

मदनभाऊ पाटील युवामंचाने रहिवाशांची जेवणाची सोय केली असली, तरी लहानग्यांसाठी स्वयंपाकही खोलीतच केला जात आहे.

फोटो २६ दीपक शिकलगार

संतोष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रातील २६ निवारा केंद्रांमध्ये तीन हजार विस्थापितांनी आश्रय घेतला आहे. कृष्णेला कधी एकदा उतार मिळतो आणि आपापल्या घरात परततो, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

अवघ्या अडीच दिवसांच्या पावसाने या लोकांना अक्षरश: परागंदा केले आहे. २०१९च्या महापुराचा अनुभव आणि प्रशासनाचा ५२ फूट पाणीपातळीचा अंदाज यामुळे त्यांनी वेळीच घरे सोडली, पण सततच्या पुराने सहनशीलतेच्या भिंती खचल्या आहेत. कृष्णामाई घरात मुक्कामाला आल्याने निवारा केंद्रांत आश्रय घ्यावा लागला. चार दिवसांपासून चार हजारांहून अधिक नागरिक दिवाभिताचे जीणे जगत आहेत. महापालिका व स्वयंसेवी संस्थांनी खाण्यापिण्यासह सर्व सोयी केल्या असल्या, तरी घरात परतण्याची प्रतीक्षा आहे.

गावभागातील दीपक शिकलगारांनी संपूर्ण कुटुंबासह दामाणी हायस्कूलमध्ये आश्रय घेतला आहे. शनिवारी सकाळीच त्यांनी घराला कुलूप ठोकले. पुराचा अंदाज घेऊन महत्त्वाचे साहित्य माळ्यावर हलविले. कर्नाळ रस्त्यावरील हर्ष रजपूत महापालिकेच्या शाळा क्रमांक १४ मध्ये कुटुंबासह राहतोय. पत्र्याच्या पेट्यांत सगळा संसार भरून आणला आहे. निवारा केंद्रात सोयी असल्या, तरी पुरात घर शाबूत राहील का नाही, याची चिंता लागली आहे.

श्यामरावनगरमधील जनाब बादशाह खलिफा मदरशात काम करतात. महापुराचा तिसऱ्यांदा कटू अनुभव त्यांनी घेतलाय. कोरोनामुळे मदरसा रिकामा असला, तरी होणाऱ्या नुकसानीची चिंता त्यांना भेडसावतेय. श्यामरावगरमधील घर विकून आता सुरक्षित परिसरात जागा घेणार असल्याचे सांगितले. हरिपूर रस्त्यावर काळी वाट परिसरातील दीपक वैद्य यांनाही कुटुंबासह परागंदा व्हावे लागले आहे. मदनभाऊ पाटील युवामंचाने प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र खोली दिली आहेत, पण स्वच्छतागृहे पुरेशी नाहीत.

चौकट

पोटातल्या बाळासह घर सोडले

श्यामरावनगरमधील चार गर्भवतींना कुटुंबासह घर सोडावेे लागले. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून त्यांना गोळ्या-अैाषधे दिली जात आहेत. गावभागातील अंथरुणाला खिळलेल्या एका वृद्धाला तरुणांनी झोळी करून, दामाणी हायस्कूलमधील निवारा केंद्रात आणले. त्यांना आणखी चांगल्या उपचारांची गरज होती, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा असल्याने वृद्धाला तात्पुरते उपचारच मिळाले.

चौकट

जनावरांच्या पोटापाण्याचीही चिंता

विस्तारित भागातील रहिवाशांसोबत जनावरेही मोठ्या संख्येने आहेत. माणसांच्या पोटापाण्याची सोय होत असली, तरी जनावरांच्या वैरणीसाठी धावाधाव करावी लागत आहे. महापालिकेने वैरण उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला आहे.

चौकट

पुढचा पावसाळा दाखवतोय वाकुल्या

लोकांच्या नजरेपुढे पुढचा पावसाळा आहे, किंबहुना, परतीचा पाऊसही आतापासूनच वाकुल्या दाखवत आहे. हे किती दिवस चालणार, हा प्रश्न पूरग्रस्तांसमोर आहे.