शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

तासगाव निवडणुकीनंतरच जिल्हा बँकेची मोर्चेबांधणी

By admin | Updated: April 3, 2015 00:36 IST

राष्ट्रवादीकडून संकेत : सर्वपक्षीय एकत्रिकरणाच्या हालचाली

सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान होत आहे. या मतदानाच्या प्रक्रियेनंतरच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जाईल, अशी माहिती आज, गुरुवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिली. दरम्यान, सर्वपक्षीय एकत्रिकरणास काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आता भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही हिरवा कंदील दर्शविल्याने त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या ४ एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ८ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ११ ते २४ एप्रिल या कालावधित अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सध्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरू असल्याने, त्याचे मतदान झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. १२ किंवा १३ एप्रिल रोजी राष्ट्रवादीची जिल्हा बँकेसंदर्भात निवडणूक होणार आहे. या बैठकीतच निवडणुकीबाबतचे धोरण निश्चित केले जाईल. सर्वपक्षीय नेत्यांना आवाहनही करण्यात येण्याची चिन्हे आहेत. तोपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी केले आहे. त्यानुसार येत्या ४ एप्रिलपासून अर्ज दाखल केले जाणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी पक्ष बाजूला ठेवून नेत्यांनी एकत्रित यावे, असे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी यापूर्वीच या आवाहनास प्रतिसाद दिला होता. भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही गुरुवारी पत्रकारांशी बोलताना याबाबतची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी बँक चांगल्या, प्रामाणिक लोकांच्या हाती जाणार असेल, तर आमची हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्वपक्षीय नेते एकत्रित येण्याची शक्यता बळावली आहे. उमेदवारीवरून मतभेद निर्माण झाले नाहीत, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तालुकानिहाय मतदारसंख्येचा विचार केल्यास सर्वाधिक मतदार वाळवा आणि मिरज तालुक्यातच आहेत. त्यामुळे याठिकाणची मतेच निर्णायक ठरणार आहेत. (प्रतिनिधी)शेतकरी पॅनेल होणारआ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी पॅनेल स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पॅनेलअंतर्गतच सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित येण्याचे आवाहन होणार असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा तासगाव-कवठेमहांकाळच्या निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे. प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याचे लोक जिल्हा बँकेत आले पाहिजेत. त्यांना या क्षेत्राचा अभ्यास असावा. असे लोक देण्याबद्दल एकमत होत असेल, तर आम्ही एकत्र येण्यास तयार आहोत. ही बँक शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाची असल्याने यामध्ये राजकारण नसावे. - संजय पाटील, खासदारजिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाचे केंद्र नव्हे. त्यामुळे तसा विचार या निवडणुकीत केला जाऊ नये. प्रामाणिक व अभ्यासू लोक याठिकाणी यावेत. या सर्व गोष्टींसह आम्ही पक्षीय बैठकीत आमची मते मांडणार आहोत. - पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस