शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कांद्याने आणले डोळ्यांत पाणी!

By admin | Updated: March 8, 2017 23:29 IST

शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी : हमीभाव मिळण्याची मागणी

कापडगाव : देशभरात कांद्याच्या दरात कमालीची घसरण सुरूच असून, या आठवड्यात लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या कांद्याला पाचशे रुपये तर दोन नंबर कांद्यास दोनशे-तीनशे रुपये दर मिळत असून, कांद्याच्या या ढासळलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. मोठ्या आशेने लावलेल्या या कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची मागील चार महिन्यांपासून ससेहोलपाट होत असून, सातत्याने कांद्याच्या दरात घसरण होत आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत आजूबाजूच्या तीस ते चाळीस गावांचा कांदा विक्रीस येत असतो. दरवर्षी बाजार समितीमध्ये कांद्याच्या उलाढालीतून शेतकऱ्यांची चाळीस ते पन्नास कोटी रुपयांची उलाढाल होते. याच कांदा उत्पादक शेतकऱ्यास मिळणाऱ्या पैशातून लोणंदची बाजारपेठ चालते. मात्र, सध्या कांद्याच्या या घसरणीमुळे लोणंदची बाजारपेठही ठप्प झाली आहे. (वार्ताहर)लिलाव सुरू अन् भाव कोसळले..शासनाने मागील वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंंटल १०० रुपये प्रमाणे अनुदान जाहिर केलेले होते ते आजही शेतकऱ्यांना मिळाले नसून शेतकरी वर्ग शासकीय यंत्रणेवर कमालीचा नाराज आहे. वास्तविक कांदा हा जीवनावश्यक वस्तू असतानाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष नेहमीच दुर्लक्ष करीत आले आहे. कांद्याची निर्यात सुरु होऊन भावात सुधारणा होण्याची अपेक्षा असताना कांद्याचे भाव अचानक आणखी गडगडले आहेत. लोणंद मार्केटयार्डवर गुरुवारी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. गुरुवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरु झाले तेव्हा बाजारात कांद्याचे भाव कोसळले.