शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईचे दीड हजार विद्यार्थी परीक्षा न देताच अकरावीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST

विद्यार्थ्यांना अकरावीचा प्रवेश कोणत्या गुणवत्तेवर मिळणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. राज्य परीक्षा महामंडळाने अद्याप असा निर्णय घेतलेला ...

विद्यार्थ्यांना अकरावीचा प्रवेश कोणत्या गुणवत्तेवर मिळणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. राज्य परीक्षा महामंडळाने अद्याप असा निर्णय घेतलेला नसताना बोर्डाने आततायीपणा का केला, असा प्रश्नही विचारला आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर केला. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. जिल्ह्यात २३ शाळांमध्ये १३०० विद्यार्थी दहावीत शिकतात. बारावीनंंतर चांगल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा म्हणून सीबीएसईचे पालक दहावीपासूनच मुलाची चांगली तयारी करून घेतात. २३ नोव्हेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू झाले. लॉकडाऊन काळात शाळांची व शासनाची बससेवा बंद होती, त्यामुळे या वर्गांसाठी पालकच मुलाला शाळेत घेऊन गेले. अभ्यासासाठी स्वत: खस्ता खाल्ल्या, मात्र बोर्डाने या पालकांचीच दांडी उडविली आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांनी दिवसभरात चार-पाच तास मोबाईलवर घालविले. मान मोडून अभ्यास केला. या सर्वांना बोर्डाने धक्का दिला आहे.

मुलाची गुणवत्ताच सिद्ध झाली नाही तर अकरावीला कोणत्या निकषावर त्यांना प्रवेश देणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. शाळांनी अंतर्गत गुण द्यायचे आहेत, पण त्यातून विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी स्पष्ट होणार, अशीही विचारणा केली आहे.

चौकट

अकरावीचे प्रवेश कोणत्या निकषावर ?

अकरावी प्रवेशासाठी कोणती गुण‌वत्ता यादी गृहीत धरणार याचे स्पष्टीकरण सीबीएसई बोर्डाने केलेले नाही, त्यामुळे पालक संभ्रमात आहेत. चांगल्या शिक्षणक्रमासाठी व महाविद्यालयासाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मिळेलच याची हमी नाही. शाळांना वीस गुण अंतर्गत स्वरूपात देता येतात, त्यामुळे एकाही शाळेत विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जाण्याची शक्यता नाही. त्याचा ताण अकरावी प्रवेशावर पडणार आहे. अकरावीसाठी अनैसर्गिक स्पर्धा निर्माण होणार आहे.

चौकट

गुणदान समपातळीवर कसे आणणार ?

शिक्षकांना विद्यार्थ्याच्या वर्षभरातील क्षमतेनुसार गुणदान करावे लागेल; पण यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे व पात्रतेनुसार गुणदान होईल याची हमी बोर्ड देत नाही. गुणवत्ता यादीच नसल्याने विद्यार्थ्यांचे वास्तव मूल्यांकन होणार नाही. यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. आयटीआय, पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशातही हे विद्यार्थी मागे पडण्याची भीती आहे.

पालकांत तीव्र संताप

परीक्षा नाही तर दहावी कसली? मुलगा दररोज शाळेत जात असला तरी त्याची गुणव‌त्ता परीक्षेने सिद्ध होते. मुलाला परीक्षेच्या शर्यतीत सोडायचे नसले तरी त्याचे मूल्यांकन होणे महत्त्वाचे आहे. पुढील शिक्षणासाठी त्याचा कल कळणार नाही. दहावीनंतर वेगवेगळ्या विद्याशाखा सुरू होतात, त्यासाठी दहावीची परीक्षा महत्त्वाची आहे. बोर्डाने परीक्षा रद्द करून मुलांवर अन्याय केला आहे.

- श्रीहरी व्हाव‌ळ, पालक

बोर्डाने परीक्षा रद्द केल्याने जणू वर्षभराचा अभ्यास वाया गेला आहे. गुणव‌त्तेसाठी कसून अभ्यास सुरू होता, आता त्याचा उपयोग होणार नाही. बारावी व स्पर्धा परीक्षांसाठी दहावीचा अभ्यास महत्त्वाचा असतो; पण परीक्षा रद्द केल्याने हा पाया ठिसूळ राहणार आहे. कोरोना असला तरी बोर्डाने धीर धरायला हवा होता.

- श्रुती खंदारे, पालक

बोर्डाने कोरोनाची तीव्रता कमी होईपर्यंत प्रतीक्षा करायला हवी होती. जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा घेता आल्या असत्या. वर्षभर मन लाऊन अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय झाला आहे. अकरावीचा प्रवेश कसा घ्यायचा असा प्रश्न आमच्यापुढे आहे. पुढची शिक्षणाची दिशा ठरविणेदेखील मुश्कील झाले आहे. थोडा अभ्यासक्रम कमी करून परीक्षा घेणे शक्य होते.

- अमित करमुसे, पालक

बोर्डाने परीक्षा रद्द केल्याने पालकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फलित काय, असा प्रश्न ते विचारत आहेत. विद्यार्थीही निराश आहेत. उच्च शिक्षणासाठी दहावीची परीक्षा दिशादर्शी असते, त्यामुळे ती रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे.

- इंदिरा पाटील, प्राचार्या

पाईंटर्स

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी

मुले - ८६०

मुली - ६८०