शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीस अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू झाले असताना, लढतींचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. राष्ट्रवादी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू झाले असताना, लढतींचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाची अजून चर्चाच सुरू असून, स्थानिक पातळीवरील राजकारणाचे रंग वेगळे असल्याने महाविकास आघाडीच्या प्रयोगासमोर अडथळे निर्माण झाले आहेत. दुसरीकडे भाजपने ‘एकला चलो रे’चा नारा देत तयारी सुरू केली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. त्यामुळे जिल्ह्यात होत असलेल्या १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही हा प्रयोग व्हावा, अशी जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. एकीकडे याबाबत चर्चा सुरू असताना, गावपातळीवरचे राजकारण हे पक्षापेक्षा गटांमध्ये विभागले गेल्याने त्याठिकाणी हा प्रयोग करताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असतानाही ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक नेत्यांवरच सर्व निर्णय सोपविले होते. या निवडणुकांमध्येही तशीच शक्यता दिसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये अनेक ठिकाणी पॅनेल, गटा-तटांच्या रंगात निवडणूक रंगलेली पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी व भाजपची ग्रामपंचायतीत ताकद अधिक आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा दबदबा

जिल्हा परिषदेत सध्या भाजप सत्तास्थानी आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्या व ग्रामपंचायतींचा विचार केल्यास तालुकानिहाय परिस्थिती वेगळी आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी, तर काही ठिकाणी भाजपची ताकद अधिक आहे. काँग्रेसही काही ठिकाणी वरचढ असून, खानापूर तालुक्यात शिवसेनेचे प्राबल्य आहे.

महाविकास आघाडी व्हावी, ही नेत्यांची इच्छा

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे महाविकास आघाडीबाबत अनुकूलता दर्शविली आहे, मात्र गावपातळीवरील नेत्यांमध्ये यावरून मतभेद आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना महाविकास आघाडीचा प्रस्ताव अद्याप पचनी पडला नाही.

तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांनी अद्याप याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. निवडणूक तोंडावर असताना निर्णय होऊ शकलेला नसल्याने अशाप्रकारची महाविकास आघाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत दिसण्याची शक्यता धूसर दिसत आहे.

लढल्यास काय परिणाम?

महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. तासगाव, कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी, खानापूरमध्ये शिवसेना, पलूस, कडेगाव व मिरजेत काँग्रेसची ताकद एकवटल्यास त्याचा फायदा आघाडीला होऊ शकतो. वेगळे लढल्यास मतांची विभागणी होऊ शकते.