शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST

सांगली : ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू केल्याशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. राज्य सरकारला काय करायचे ...

सांगली : ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू केल्याशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. राज्य सरकारला काय करायचे ते करू दे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत दिला. मंत्री अनिल परब यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र डाटा जमा करून ओबीसी आरक्षण देणे शक्य आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी पक्षाची भूमिका आहे.

भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रतिमेला धक्का लागत नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले की, एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणारा भाजप नाही. आम्हालाही ठोशास ठोसा देता येतो. मंत्री अनिल परब यांच्या व्हीडीओ क्लिप घराघरांत पोहोचल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयानेही त्याची दखल घेतली आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे.

भाजपशासित राज्यात ‘ईडी’ची कारवाई होत नसल्याची टीका होत आहे. त्यावर पाटील म्हणाले की, काहीजण जात्यात आहेत, काहीजण सुपात आहेत. शंभर कोटींची बेनामी संपत्ती जप्त होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसले आहेत. ते काय करत आहेत? किमान जाब तरी विचारावा. आमच्या पक्षातही कोणी गैरप्रकार केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल.

चौकट

राणे तुमच्याच धाटणीतील

नारायण राणे मूळ शिवसेनेच्या धाटणीतील आहेत. ते भाजपमध्ये आले तरी त्यांच्या बोलण्याची धाटणी जुनीच आहे. त्यामुळे आमच्यात भिंत बांधू नका, आमचे सरकार नसतानाही अनेक नेते भाजपमध्ये आले. सर्वच पक्षांनी एकत्र बसून राजकीय आचारसंहिता ठरविली पाहिजे, असे पाटील म्हणाले.

चौकट

राजू शेट्टींचा प्रस्ताव आल्यावर विचार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्याबाबत पाटील म्हणाले की, शेट्टी वाऱ्यासारखे आहेत. ते कोणाच्याच हातात सापडत नाहीत. अन्याय होतो, तिथे ते बोलतात. आमच्यासोबत होते, तेव्हाही ते बोलत होते. त्यांच्याकडून युतीबाबत काहीच प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यानंतर पक्षाच्या कोअर कमिटीसोबत चर्चा करून निर्णय होईल.

चौकट

पाटील म्हणतात...

- जयंतराव, नेते पळवून निवडणुका जिंकता येत नाहीत

- जनआशीर्वाद यात्रेला महाआघाडी घाबरली आहे, यात्रा चिरडण्याचा प्रयत्न करत आहे

- जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी चार भिंतीआड बोलावे, असा सल्ला संजयकाका व विलासराव जगतापांना दिला.

-सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या हाती