शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST

सांगली : ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू केल्याशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. राज्य सरकारला काय करायचे ...

सांगली : ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू केल्याशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. राज्य सरकारला काय करायचे ते करू दे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत दिला. मंत्री अनिल परब यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र डाटा जमा करून ओबीसी आरक्षण देणे शक्य आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी पक्षाची भूमिका आहे.

भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रतिमेला धक्का लागत नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले की, एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणारा भाजप नाही. आम्हालाही ठोशास ठोसा देता येतो. मंत्री अनिल परब यांच्या व्हीडीओ क्लिप घराघरांत पोहोचल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयानेही त्याची दखल घेतली आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे.

भाजपशासित राज्यात ‘ईडी’ची कारवाई होत नसल्याची टीका होत आहे. त्यावर पाटील म्हणाले की, काहीजण जात्यात आहेत, काहीजण सुपात आहेत. शंभर कोटींची बेनामी संपत्ती जप्त होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसले आहेत. ते काय करत आहेत? किमान जाब तरी विचारावा. आमच्या पक्षातही कोणी गैरप्रकार केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल.

चौकट

राणे तुमच्याच धाटणीतील

नारायण राणे मूळ शिवसेनेच्या धाटणीतील आहेत. ते भाजपमध्ये आले तरी त्यांच्या बोलण्याची धाटणी जुनीच आहे. त्यामुळे आमच्यात भिंत बांधू नका, आमचे सरकार नसतानाही अनेक नेते भाजपमध्ये आले. सर्वच पक्षांनी एकत्र बसून राजकीय आचारसंहिता ठरविली पाहिजे, असे पाटील म्हणाले.

चौकट

राजू शेट्टींचा प्रस्ताव आल्यावर विचार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्याबाबत पाटील म्हणाले की, शेट्टी वाऱ्यासारखे आहेत. ते कोणाच्याच हातात सापडत नाहीत. अन्याय होतो, तिथे ते बोलतात. आमच्यासोबत होते, तेव्हाही ते बोलत होते. त्यांच्याकडून युतीबाबत काहीच प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यानंतर पक्षाच्या कोअर कमिटीसोबत चर्चा करून निर्णय होईल.

चौकट

पाटील म्हणतात...

- जयंतराव, नेते पळवून निवडणुका जिंकता येत नाहीत

- जनआशीर्वाद यात्रेला महाआघाडी घाबरली आहे, यात्रा चिरडण्याचा प्रयत्न करत आहे

- जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी चार भिंतीआड बोलावे, असा सल्ला संजयकाका व विलासराव जगतापांना दिला.

-सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या हाती