शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सख्या चुलत भावांचा पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:34 IST

Accident Mahavitran Shirala sangli :  पाडळी ( ता. शिराळा ) येथील सख्या चुलत भावांचा विद्युत मोटार चालू करताना पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवार रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मोरणा धरण लगत पाडळी गावाच्या हद्दीत घडली. विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील (वय ३२) व मानसिंग बबन पाटील (वय ३०) असे या युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा नेला होता. या दोन युवक शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली.

ठळक मुद्देसख्या चुलत भावांचा पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांचा मोर्चा

विकास शहाशिराळा :  पाडळी ( ता. शिराळा ) येथील सख्या चुलत भावांचा विद्युत मोटार चालू करताना पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवार रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मोरणा धरण लगत पाडळी गावाच्या हद्दीत घडली. विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील (वय ३२) व मानसिंग बबन पाटील (वय ३०) असे या युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा नेला होता. या दोन युवक शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील  व मानसिंग बबन पाटील हे दोघे सकाळी ८ वाजणेच्या सुमारास पाडळीच्या लातोंडी नामक परिसरात असणाऱ्या शेती पाण्याच्या मोटारीकडे गेले असता त्यांना या विद्युत मोटारीचा विजेचा धक्का लागला. हा धक्का इतक्या मोठ्या प्रमाणात बसला की हे दोघे जागीच मृत्यू पावले. तेथे असणाऱ्या नागरिकांनी त्यांना पाण्याबरोबर काढून तातडीने मोटारसायकलवरून शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.मानसिंग हे शिराळा येथील खाजगी कारखान्यात नोकरीस होते. ते अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, असा परिवार आहे तर विक्रम उर्फ जयकर हे मुंबई येथे खाजगी नोकरीत होते. याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत सुनील बबन पाटील यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार वायदंडे हे करीत आहेत.उपअभियंता प्रल्हाद बुचडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नक्की काय घटना घडली याची माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयास कळवले.यानंतर वरिष्ठ कार्यालयातील तज्ञ तसेच अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.विक्रम उर्फ जयकर पाटील हे मुंबईत खाजगी नोकरी करत होते. लॉकडाऊनमुळे चार- पाच दिवसांपूर्वीच ते पाडळी येथे सहकुटुंब गावाकडे आले होते.घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात गावकरी वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालय येथे जमले आणि तक्रार करूनही वेळेत वीज मोटार कनेक्शनची दुरुस्ती केली जात नाही. यामुळे या दोघांना आपले प्राण गमवावे लागले, जो पर्यंत याबाबत ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करून देणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता .

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली