शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

सख्या चुलत भावांचा पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:34 IST

Accident Mahavitran Shirala sangli :  पाडळी ( ता. शिराळा ) येथील सख्या चुलत भावांचा विद्युत मोटार चालू करताना पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवार रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मोरणा धरण लगत पाडळी गावाच्या हद्दीत घडली. विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील (वय ३२) व मानसिंग बबन पाटील (वय ३०) असे या युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा नेला होता. या दोन युवक शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली.

ठळक मुद्देसख्या चुलत भावांचा पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांचा मोर्चा

विकास शहाशिराळा :  पाडळी ( ता. शिराळा ) येथील सख्या चुलत भावांचा विद्युत मोटार चालू करताना पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवार रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मोरणा धरण लगत पाडळी गावाच्या हद्दीत घडली. विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील (वय ३२) व मानसिंग बबन पाटील (वय ३०) असे या युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा नेला होता. या दोन युवक शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील  व मानसिंग बबन पाटील हे दोघे सकाळी ८ वाजणेच्या सुमारास पाडळीच्या लातोंडी नामक परिसरात असणाऱ्या शेती पाण्याच्या मोटारीकडे गेले असता त्यांना या विद्युत मोटारीचा विजेचा धक्का लागला. हा धक्का इतक्या मोठ्या प्रमाणात बसला की हे दोघे जागीच मृत्यू पावले. तेथे असणाऱ्या नागरिकांनी त्यांना पाण्याबरोबर काढून तातडीने मोटारसायकलवरून शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.मानसिंग हे शिराळा येथील खाजगी कारखान्यात नोकरीस होते. ते अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, असा परिवार आहे तर विक्रम उर्फ जयकर हे मुंबई येथे खाजगी नोकरीत होते. याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत सुनील बबन पाटील यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार वायदंडे हे करीत आहेत.उपअभियंता प्रल्हाद बुचडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नक्की काय घटना घडली याची माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयास कळवले.यानंतर वरिष्ठ कार्यालयातील तज्ञ तसेच अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.विक्रम उर्फ जयकर पाटील हे मुंबईत खाजगी नोकरी करत होते. लॉकडाऊनमुळे चार- पाच दिवसांपूर्वीच ते पाडळी येथे सहकुटुंब गावाकडे आले होते.घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात गावकरी वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालय येथे जमले आणि तक्रार करूनही वेळेत वीज मोटार कनेक्शनची दुरुस्ती केली जात नाही. यामुळे या दोघांना आपले प्राण गमवावे लागले, जो पर्यंत याबाबत ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करून देणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता .

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली