शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

आता एकच मिशन, शेतकऱ्यांना पेन्शन

By admin | Updated: July 6, 2014 00:01 IST

आर. आर. पाटील : बळिराजाला मिळणार न्याय

कवठेमहांकाळ : आयुष्यभर शेतीत काबाडकष्ट करून देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन देण्यासाठी आपण राज्यात व्यापक मिशन राबवून न्याय देणार आहोत. ‘आता एकच मिशन, शेतकऱ्यांना पेन्शन’, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज, शनिवारी येथे केली.गृहमंत्री पाटील कवठेमहांकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, शेती देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. या शेतीवर देशातील कोट्यवधी लोक उपजीविका करतात; परंतु शेतीत राबणारा शेतकरी मात्र हलाखीचे व गरिबीचे जीनव जगत आहे. उतारवयात कुटुंबात सांभाळ होत नसल्याने या शेतकऱ्याचे जीवन उघड्यावर पडते. त्यामुळे पुढच्या काळात राज्यातील शेतकरी हलाखीचे जीवन जगू नये, त्याचा उत्तरार्थ सुखाचा जावा, यासाठी त्याला वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन देण्यात यावी, याकरिता युध्दपातळीवर प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, यासाठी आटपाडी तालुक्यात आबा सरगर नावाच्या शेतकऱ्याने उपोषण सुरू केले आहे. त्यांची ही व्यथा राज्य सरकारकडे मांडून ही मोहीम सार्थ करून दाखवू. १९९४ मध्ये आपण शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी आवाज उठविला होता. तो तडीस नेण्याची आज संधी मिळाली आहे. ती सार्थ करून दाखवू असेही ते म्हणाले. (वार्ताहर)