शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

आता काकू-पुतण्याचं राजकारण पहा

By admin | Updated: January 18, 2015 00:28 IST

अजित पवार : इस्लामपुरातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला टोला

इस्लामपूर : राज्यात भाजपचीच सत्ता असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस टोलप्रश्नी आंदोलनाचा इशारा देत आहेत. राज्यातील जनतेने आजवर काका-पुतण्याचे राजकारण पाहिले आता काकू-पुतण्याचे राजकारण पहावे, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी इस्लामपूर येथील कार्यक्रमात लगावला. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त इस्लामपूर नगरपालिकेने बांधलेल्या घरकुले व व्यापारी संकुलाचे उद्घाटन आणि राजारामबापू सहकारी बॅँकेने उत्तयदायित्व घेतलेल्या शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव धान्याची माहिती मोबाईल संदेशाद्वारे (एसएमएस) देण्याच्या कार्यप्रणालीचे उद्घाटन पवार यांच्याहस्ते करण्यात आले. माजी मंत्री आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी १० कुटुंबांना घरकुलाच्या चाव्यांची प्रतिकृती प्रातिनिधिक स्वरुपात पवार यांच्याहस्ते देण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या ताकारी रस्त्यावरील खुल्या नाट्यगृहात झालेल्या जाहीर कार्यक्रमात आ. पवार बोलत होते.ते म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यासाठी माध्यमांचा प्रभावी वापर करीत खोटी आश्वासने देऊन जनतेची घोर फसवणूक व निराशा केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० दिवसात परदेशातील काळा पैसा आणण्याचे आश्वासन दिले. त्यातून प्रत्येक कुटुंबाला १५ ते १६ लाख रुपये मिळतील, असे दिवास्वप्न दाखवले. आज २५० दिवस झाले तरी, हा काळा पैसा परत आलेला नाही. विधानसभा निवडणुकीवेळी पुन्हा हीच पध्दत वापरत एलबीटी हटवू, टोल हटवू, अशा खोट्या वल्गना करीत राज्यातही भाजपने सत्ता हस्तगत केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस या टोलप्रश्नी आंदोलनाचा इशारा देत आहेत. गृह खाते त्यांच्याकडेच आहे. नागपुरात दिवसाढवळ्या मुडदे पडत आहेत. मुलींची छेडछाड होते आहे; मात्र तरीही त्यांना कायदा व सुव्यवस्थेशी देणे-घेणे नाही, असा आरोप पवार यांनी केला.आ. जयंत पाटील म्हणाले की, बापूंचे पुण्यस्मरण चांगल्या विकासाभिमुख कामाने करण्याची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून सामान्य कुटुंबांना हक्काची घरकुले देण्याच्या उपक्रमाचा आनंद आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीतून शहराला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला. सामान्य माणसांना त्रास होणार नाही, यासाठी रास्त भाव धान्याची माहिती देणारी कार्यप्रणाली सुरू केली. राजकारणात उन्हाळे-पावसाळे येत असतात. बापूंचे कार्यकर्ते त्यातून तावून-सुलाखून निघालेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम करू. काहीजण इकडे-तिकडे गेले; मात्र नगाला नग देण्याची क्षमता राष्ट्रवादीत आहे.राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी बॅँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी स्वागत, तर उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी आभार मानले. यावेळी दिलीपराव पाटील, विलासराव शिंदे, माणिकराव पाटील, पी. आर. पाटील, नेताजीराव पाटील, विनायकराव पाटील, जनार्दन पाटील, जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, अरुण लाड, रामराव देशमुख, बी. के. पाटील, रवींद्र बर्डे उपस्थित होते. (प्रतिनिधी)