शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

आता काकू-पुतण्याचं राजकारण पहा

By admin | Updated: January 18, 2015 00:28 IST

अजित पवार : इस्लामपुरातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला टोला

इस्लामपूर : राज्यात भाजपचीच सत्ता असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस टोलप्रश्नी आंदोलनाचा इशारा देत आहेत. राज्यातील जनतेने आजवर काका-पुतण्याचे राजकारण पाहिले आता काकू-पुतण्याचे राजकारण पहावे, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी इस्लामपूर येथील कार्यक्रमात लगावला. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त इस्लामपूर नगरपालिकेने बांधलेल्या घरकुले व व्यापारी संकुलाचे उद्घाटन आणि राजारामबापू सहकारी बॅँकेने उत्तयदायित्व घेतलेल्या शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव धान्याची माहिती मोबाईल संदेशाद्वारे (एसएमएस) देण्याच्या कार्यप्रणालीचे उद्घाटन पवार यांच्याहस्ते करण्यात आले. माजी मंत्री आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी १० कुटुंबांना घरकुलाच्या चाव्यांची प्रतिकृती प्रातिनिधिक स्वरुपात पवार यांच्याहस्ते देण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या ताकारी रस्त्यावरील खुल्या नाट्यगृहात झालेल्या जाहीर कार्यक्रमात आ. पवार बोलत होते.ते म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यासाठी माध्यमांचा प्रभावी वापर करीत खोटी आश्वासने देऊन जनतेची घोर फसवणूक व निराशा केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० दिवसात परदेशातील काळा पैसा आणण्याचे आश्वासन दिले. त्यातून प्रत्येक कुटुंबाला १५ ते १६ लाख रुपये मिळतील, असे दिवास्वप्न दाखवले. आज २५० दिवस झाले तरी, हा काळा पैसा परत आलेला नाही. विधानसभा निवडणुकीवेळी पुन्हा हीच पध्दत वापरत एलबीटी हटवू, टोल हटवू, अशा खोट्या वल्गना करीत राज्यातही भाजपने सत्ता हस्तगत केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस या टोलप्रश्नी आंदोलनाचा इशारा देत आहेत. गृह खाते त्यांच्याकडेच आहे. नागपुरात दिवसाढवळ्या मुडदे पडत आहेत. मुलींची छेडछाड होते आहे; मात्र तरीही त्यांना कायदा व सुव्यवस्थेशी देणे-घेणे नाही, असा आरोप पवार यांनी केला.आ. जयंत पाटील म्हणाले की, बापूंचे पुण्यस्मरण चांगल्या विकासाभिमुख कामाने करण्याची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून सामान्य कुटुंबांना हक्काची घरकुले देण्याच्या उपक्रमाचा आनंद आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीतून शहराला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला. सामान्य माणसांना त्रास होणार नाही, यासाठी रास्त भाव धान्याची माहिती देणारी कार्यप्रणाली सुरू केली. राजकारणात उन्हाळे-पावसाळे येत असतात. बापूंचे कार्यकर्ते त्यातून तावून-सुलाखून निघालेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम करू. काहीजण इकडे-तिकडे गेले; मात्र नगाला नग देण्याची क्षमता राष्ट्रवादीत आहे.राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी बॅँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी स्वागत, तर उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी आभार मानले. यावेळी दिलीपराव पाटील, विलासराव शिंदे, माणिकराव पाटील, पी. आर. पाटील, नेताजीराव पाटील, विनायकराव पाटील, जनार्दन पाटील, जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, अरुण लाड, रामराव देशमुख, बी. के. पाटील, रवींद्र बर्डे उपस्थित होते. (प्रतिनिधी)