शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आता निवडणुका स्वबळावरच लढणार

By admin | Updated: October 25, 2016 01:01 IST

राजेंद्रअण्णा देशमुख : राजकीय तर्क-वितर्कांना पूर्णविराम; कोणत्याही गटाशी युती नाही

आटपाडी : आपण सगळ्यांना मित्र समझतो, पण प्रत्येक मित्र जर आपल्याला विरोधकच समजत असतील, तर आपण मैत्री कुणाबरोबर करायची? आपली सगळ्यांबरोबर मैत्री करून झालीय. त्यापेक्षा आपण एकटेच लढलो तर चांगले होणार आहे. बाकीच्यांनी औपचारिक बोलले तरी चालेल; पण मला आता तसे बोलून चालणार नाही, असे सांगून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी येणाऱ्या जि. प. आणि पं. स. च्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय गटाशी युती होणार नसल्याचे भाष्य केले आणि चर्चांना पूर्णविराम दिला. निमित्त होते येथील आदर्श गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आदर्श को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे. या कार्यक्रमासाठी राजेंद्रअण्णा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि जिल्हा बॅँकेचे संचालक उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख हे सख्खे बंधू प्रथमच एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. गेली काही वर्षे देशमुख गटाने अनेक निवडणुका विविध राजकीय गटांशी युती करून लढविल्या; पण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून ही मंडळी आता ताकसुध्दा फुंकून पिऊ लागल्याचे चित्र आहे. एरवी निवडणुकीच्या प्रचार सभांमध्येच राजकीय भाष्य करणाऱ्या देशमुख बंधूंनी सोमवारी जाहीरपणे भूमिका मांडली. कल्लेश्वर मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अमरसिंह देशमुख म्हणाले, तरुणांच्या नावाने सर्वत्र ओरड ऐकायला मिळत असताना, तरुण गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आधी व्यायामशाळा बांधून आता पतसंस्था काढून आदर्श निर्माण केला आहे. तालुक्याबाहेरील पतसंस्था येथे येऊन व्यवसाय करत आहेत. त्या कोणत्या पध्दतीने हे सांगण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत लोकांच्या पैशाची काळजी घेण्यासाठी संस्था निर्माण केलेल्या या तरुणांचे कार्य कौतुकास्पद आहे; पण संस्था चालवताना त्यात राजकारण नको. मी गेली सात वर्षे राज्यातील आदर्श बॅँकेचा पुरस्कार घेतोय, पण त्याचे गेल्या विधानसभा निवडणुकीत मला ‘बक्षीस’ मिळाले. राजेंद्रअण्णा यावर म्हणाले, मोठे काम करूनही निवडणुकीत का मते दिली नाहीत, असे न म्हणता, नाराज न होता दररोज नव्या उमेदीने लोकांसमोर जातोय. अमरसिंह यांनी अभिमान वाटावा असेच काम केले आहे. मीसुध्दा त्यांच्याकडून शिकतोय. मित्रांनो, आधी संसार नेटका करा, मग राजकारण करा. सगळ्या देशात एवढा पाऊस झाला. पूल तुटले, वाहने वाहून गेली. आटपाडीत पाऊस पडला का? सगळ्या जिल्ह्यात नगरपंचायत, पालिका झाली, निवडणुका लागतात. आटपाडीची जाहीर झाली का? मुख्यमंत्री पदावर असताना दोन वर्षांपूवी पृथ्वीराज चव्हाण यांनी टेंभूचे बटण दाबले, अजून तरी पूर्ण क्षमतेने पाणी आले का? सगळ्या मोटारी चालू झाल्या का? मग आपण या देशात आहोत का नाही? (वार्ताहर) मंडपाला जशी झालर : तसेच राजकारण! कुठल्याही मंडपाला झालर नसेल, तर चालत नाही. तसे राजकारण आहे. पण घरावर तुळशीपत्र ठेवून राजकारण करू नका, असे आवाहन राजेंद्रअण्णांनी कार्यकर्त्यांना केले. आटपाडीवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचून आटपाडी भारताच्या नकाशात आहे का नाही? येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज व्हा, असा संदेश दिला. तालुक्यावर होणाऱ्या अन्यायावर विचार करायला पाहिजे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.