शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
2
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
3
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
4
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
5
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
6
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
7
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
8
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
9
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
10
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
11
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
12
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
13
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
14
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
15
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
16
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
17
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
18
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
19
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
20
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आता निवडणुका स्वबळावरच लढणार

By admin | Updated: October 25, 2016 01:01 IST

राजेंद्रअण्णा देशमुख : राजकीय तर्क-वितर्कांना पूर्णविराम; कोणत्याही गटाशी युती नाही

आटपाडी : आपण सगळ्यांना मित्र समझतो, पण प्रत्येक मित्र जर आपल्याला विरोधकच समजत असतील, तर आपण मैत्री कुणाबरोबर करायची? आपली सगळ्यांबरोबर मैत्री करून झालीय. त्यापेक्षा आपण एकटेच लढलो तर चांगले होणार आहे. बाकीच्यांनी औपचारिक बोलले तरी चालेल; पण मला आता तसे बोलून चालणार नाही, असे सांगून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी येणाऱ्या जि. प. आणि पं. स. च्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय गटाशी युती होणार नसल्याचे भाष्य केले आणि चर्चांना पूर्णविराम दिला. निमित्त होते येथील आदर्श गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आदर्श को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे. या कार्यक्रमासाठी राजेंद्रअण्णा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि जिल्हा बॅँकेचे संचालक उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख हे सख्खे बंधू प्रथमच एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. गेली काही वर्षे देशमुख गटाने अनेक निवडणुका विविध राजकीय गटांशी युती करून लढविल्या; पण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून ही मंडळी आता ताकसुध्दा फुंकून पिऊ लागल्याचे चित्र आहे. एरवी निवडणुकीच्या प्रचार सभांमध्येच राजकीय भाष्य करणाऱ्या देशमुख बंधूंनी सोमवारी जाहीरपणे भूमिका मांडली. कल्लेश्वर मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अमरसिंह देशमुख म्हणाले, तरुणांच्या नावाने सर्वत्र ओरड ऐकायला मिळत असताना, तरुण गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आधी व्यायामशाळा बांधून आता पतसंस्था काढून आदर्श निर्माण केला आहे. तालुक्याबाहेरील पतसंस्था येथे येऊन व्यवसाय करत आहेत. त्या कोणत्या पध्दतीने हे सांगण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत लोकांच्या पैशाची काळजी घेण्यासाठी संस्था निर्माण केलेल्या या तरुणांचे कार्य कौतुकास्पद आहे; पण संस्था चालवताना त्यात राजकारण नको. मी गेली सात वर्षे राज्यातील आदर्श बॅँकेचा पुरस्कार घेतोय, पण त्याचे गेल्या विधानसभा निवडणुकीत मला ‘बक्षीस’ मिळाले. राजेंद्रअण्णा यावर म्हणाले, मोठे काम करूनही निवडणुकीत का मते दिली नाहीत, असे न म्हणता, नाराज न होता दररोज नव्या उमेदीने लोकांसमोर जातोय. अमरसिंह यांनी अभिमान वाटावा असेच काम केले आहे. मीसुध्दा त्यांच्याकडून शिकतोय. मित्रांनो, आधी संसार नेटका करा, मग राजकारण करा. सगळ्या देशात एवढा पाऊस झाला. पूल तुटले, वाहने वाहून गेली. आटपाडीत पाऊस पडला का? सगळ्या जिल्ह्यात नगरपंचायत, पालिका झाली, निवडणुका लागतात. आटपाडीची जाहीर झाली का? मुख्यमंत्री पदावर असताना दोन वर्षांपूवी पृथ्वीराज चव्हाण यांनी टेंभूचे बटण दाबले, अजून तरी पूर्ण क्षमतेने पाणी आले का? सगळ्या मोटारी चालू झाल्या का? मग आपण या देशात आहोत का नाही? (वार्ताहर) मंडपाला जशी झालर : तसेच राजकारण! कुठल्याही मंडपाला झालर नसेल, तर चालत नाही. तसे राजकारण आहे. पण घरावर तुळशीपत्र ठेवून राजकारण करू नका, असे आवाहन राजेंद्रअण्णांनी कार्यकर्त्यांना केले. आटपाडीवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचून आटपाडी भारताच्या नकाशात आहे का नाही? येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज व्हा, असा संदेश दिला. तालुक्यावर होणाऱ्या अन्यायावर विचार करायला पाहिजे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.