शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

आता निवडणुका स्वबळावरच लढणार

By admin | Updated: October 25, 2016 01:01 IST

राजेंद्रअण्णा देशमुख : राजकीय तर्क-वितर्कांना पूर्णविराम; कोणत्याही गटाशी युती नाही

आटपाडी : आपण सगळ्यांना मित्र समझतो, पण प्रत्येक मित्र जर आपल्याला विरोधकच समजत असतील, तर आपण मैत्री कुणाबरोबर करायची? आपली सगळ्यांबरोबर मैत्री करून झालीय. त्यापेक्षा आपण एकटेच लढलो तर चांगले होणार आहे. बाकीच्यांनी औपचारिक बोलले तरी चालेल; पण मला आता तसे बोलून चालणार नाही, असे सांगून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी येणाऱ्या जि. प. आणि पं. स. च्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय गटाशी युती होणार नसल्याचे भाष्य केले आणि चर्चांना पूर्णविराम दिला. निमित्त होते येथील आदर्श गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आदर्श को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे. या कार्यक्रमासाठी राजेंद्रअण्णा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि जिल्हा बॅँकेचे संचालक उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख हे सख्खे बंधू प्रथमच एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. गेली काही वर्षे देशमुख गटाने अनेक निवडणुका विविध राजकीय गटांशी युती करून लढविल्या; पण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून ही मंडळी आता ताकसुध्दा फुंकून पिऊ लागल्याचे चित्र आहे. एरवी निवडणुकीच्या प्रचार सभांमध्येच राजकीय भाष्य करणाऱ्या देशमुख बंधूंनी सोमवारी जाहीरपणे भूमिका मांडली. कल्लेश्वर मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अमरसिंह देशमुख म्हणाले, तरुणांच्या नावाने सर्वत्र ओरड ऐकायला मिळत असताना, तरुण गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आधी व्यायामशाळा बांधून आता पतसंस्था काढून आदर्श निर्माण केला आहे. तालुक्याबाहेरील पतसंस्था येथे येऊन व्यवसाय करत आहेत. त्या कोणत्या पध्दतीने हे सांगण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत लोकांच्या पैशाची काळजी घेण्यासाठी संस्था निर्माण केलेल्या या तरुणांचे कार्य कौतुकास्पद आहे; पण संस्था चालवताना त्यात राजकारण नको. मी गेली सात वर्षे राज्यातील आदर्श बॅँकेचा पुरस्कार घेतोय, पण त्याचे गेल्या विधानसभा निवडणुकीत मला ‘बक्षीस’ मिळाले. राजेंद्रअण्णा यावर म्हणाले, मोठे काम करूनही निवडणुकीत का मते दिली नाहीत, असे न म्हणता, नाराज न होता दररोज नव्या उमेदीने लोकांसमोर जातोय. अमरसिंह यांनी अभिमान वाटावा असेच काम केले आहे. मीसुध्दा त्यांच्याकडून शिकतोय. मित्रांनो, आधी संसार नेटका करा, मग राजकारण करा. सगळ्या देशात एवढा पाऊस झाला. पूल तुटले, वाहने वाहून गेली. आटपाडीत पाऊस पडला का? सगळ्या जिल्ह्यात नगरपंचायत, पालिका झाली, निवडणुका लागतात. आटपाडीची जाहीर झाली का? मुख्यमंत्री पदावर असताना दोन वर्षांपूवी पृथ्वीराज चव्हाण यांनी टेंभूचे बटण दाबले, अजून तरी पूर्ण क्षमतेने पाणी आले का? सगळ्या मोटारी चालू झाल्या का? मग आपण या देशात आहोत का नाही? (वार्ताहर) मंडपाला जशी झालर : तसेच राजकारण! कुठल्याही मंडपाला झालर नसेल, तर चालत नाही. तसे राजकारण आहे. पण घरावर तुळशीपत्र ठेवून राजकारण करू नका, असे आवाहन राजेंद्रअण्णांनी कार्यकर्त्यांना केले. आटपाडीवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचून आटपाडी भारताच्या नकाशात आहे का नाही? येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज व्हा, असा संदेश दिला. तालुक्यावर होणाऱ्या अन्यायावर विचार करायला पाहिजे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.