शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना, म्युकरमायकोसिसनंतर आता कानांनाही बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कानांच्या तक्रारीत वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना, म्युकरमायकोसिसनंतर आता कानांनाही बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कानांच्या तक्रारीत वाढ होते. बुरशीजन्य संसर्गामुळे कान दुखत असतो. पण अनेकजण त्यावर घरीच उपचार करतात, अथवा त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भविष्यात कानाचा पडदा, पाठीमागील हाडामध्ये दोष निर्माण होण्याची भीती असते. त्यासाठी तज्ज्ञ डाॅक्टरांकडून वेळीच औषधोपचार घ्यावेत, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टर देतात.

आजही कानदुखीसारख्या रोगांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. कानात पाणी जाणे, वेळीच कान कोरडे न करणे, अशा कारणांनी कानात बुरशी होण्याचा धोका अधिक असतो. विशेषत: पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्ग अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात कानांची विशेष काळजी घेतली पाहिजे. घरातील चुकीच्या उपचारांमुळे बुरशीची वाढ झपाट्याने होऊन समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यासाठी वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

कोट

पावसाळा, दमट वातावरणात कानात बुरशी होण्याचे प्रमाण वाढते. दरवर्षी अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. अनेकजण घरीच उपचार करतात. काहीजण कानात तेल घालतात, तर काहीजण डाॅक्टरांकडून ड्राॅप घेतात. पण ते धोकादायक आहे. तज्ज्ञ डाॅक्टरांकडून औषधोपचार करून घेतले पाहिजे, अन्यथा हा धोका वाढून पडद्याला दोष निर्माण होऊ शकतो. - डाॅ. शशिकांत दोरकर

कोट

दमट वातावरणात कानात बुरशी तयार होते. पावसाळ्यात ती दुपटीने वाढते. कानाचा आकार वेडावाकडा असेल तर कानातील पाणी बाहेर येत नाही. तसेच मधुमेही रुग्णांना त्याचा धोका अधिक असतो. दोन ते तीन वेळा तज्ज्ञ डाॅक्टरांकडून उपचार घेतल्यास हा रोग बरा होतो. - डाॅ. सुरेश नाईक

चौकट

काय घ्याल काळजी

१. कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावेत. विशेषत: आंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करावेत. हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जूंतक करावा.

२. टोकदार वस्तूने कान स्वच्छ करू नये, कान दुखू लागल्यास किंवा कानातून पाणी येत असल्यास डाॅक्टरांना भेटावे. कानात तेल अथवा ड्राॅप घालू नये. वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

चौकट

पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका

१. बुरशीजन्य कानात होणारे संक्रमण मुख्यत: कान कालवावर परिणाम करते. दूषित पाण्यात पोहणे, कानाला आघात होणे, पावसाळ्यात कानात पाणी जाणे, अशा कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. दमट वातावरणातही बुरशीचा धोका अधिक असतो.

२. खेड्यापाड्यात आजही कान दुखू लागल्यास कानात तेल घातले जाते. ते चुकीचे आहे. मुळात ओलाव्यामुळे बुरशीत वाढ होते. तेल घातल्याने संसर्ग वाढण्याचा धोका असतो. बुरशी वाढत जाऊन कानात पुरळ, गाठी होऊ शकतात. कानामागील हाड, पडद्यालाही दोष निर्माण होऊ शकतो.