शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना, म्युकरमायकोसिसनंतर आता कानांनाही बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कानांच्या तक्रारीत वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना, म्युकरमायकोसिसनंतर आता कानांनाही बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कानांच्या तक्रारीत वाढ होते. बुरशीजन्य संसर्गामुळे कान दुखत असतो. पण अनेकजण त्यावर घरीच उपचार करतात, अथवा त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भविष्यात कानाचा पडदा, पाठीमागील हाडामध्ये दोष निर्माण होण्याची भीती असते. त्यासाठी तज्ज्ञ डाॅक्टरांकडून वेळीच औषधोपचार घ्यावेत, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टर देतात.

आजही कानदुखीसारख्या रोगांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. कानात पाणी जाणे, वेळीच कान कोरडे न करणे, अशा कारणांनी कानात बुरशी होण्याचा धोका अधिक असतो. विशेषत: पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्ग अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात कानांची विशेष काळजी घेतली पाहिजे. घरातील चुकीच्या उपचारांमुळे बुरशीची वाढ झपाट्याने होऊन समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यासाठी वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

कोट

पावसाळा, दमट वातावरणात कानात बुरशी होण्याचे प्रमाण वाढते. दरवर्षी अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. अनेकजण घरीच उपचार करतात. काहीजण कानात तेल घालतात, तर काहीजण डाॅक्टरांकडून ड्राॅप घेतात. पण ते धोकादायक आहे. तज्ज्ञ डाॅक्टरांकडून औषधोपचार करून घेतले पाहिजे, अन्यथा हा धोका वाढून पडद्याला दोष निर्माण होऊ शकतो. - डाॅ. शशिकांत दोरकर

कोट

दमट वातावरणात कानात बुरशी तयार होते. पावसाळ्यात ती दुपटीने वाढते. कानाचा आकार वेडावाकडा असेल तर कानातील पाणी बाहेर येत नाही. तसेच मधुमेही रुग्णांना त्याचा धोका अधिक असतो. दोन ते तीन वेळा तज्ज्ञ डाॅक्टरांकडून उपचार घेतल्यास हा रोग बरा होतो. - डाॅ. सुरेश नाईक

चौकट

काय घ्याल काळजी

१. कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावेत. विशेषत: आंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करावेत. हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जूंतक करावा.

२. टोकदार वस्तूने कान स्वच्छ करू नये, कान दुखू लागल्यास किंवा कानातून पाणी येत असल्यास डाॅक्टरांना भेटावे. कानात तेल अथवा ड्राॅप घालू नये. वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

चौकट

पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका

१. बुरशीजन्य कानात होणारे संक्रमण मुख्यत: कान कालवावर परिणाम करते. दूषित पाण्यात पोहणे, कानाला आघात होणे, पावसाळ्यात कानात पाणी जाणे, अशा कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. दमट वातावरणातही बुरशीचा धोका अधिक असतो.

२. खेड्यापाड्यात आजही कान दुखू लागल्यास कानात तेल घातले जाते. ते चुकीचे आहे. मुळात ओलाव्यामुळे बुरशीत वाढ होते. तेल घातल्याने संसर्ग वाढण्याचा धोका असतो. बुरशी वाढत जाऊन कानात पुरळ, गाठी होऊ शकतात. कानामागील हाड, पडद्यालाही दोष निर्माण होऊ शकतो.