शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

माजी संचालकांना नोटिसा

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

जिल्हा बँक : १५७ कोटींचा गैरव्यवहार; आरोपपत्र दाखल होणार

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी १०२ माजी संचालक, त्यांचे वारसदार, अधिकारी यांना आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. २१ मे रोजी यावर चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. त्यानंतर आरोपपत्र दाखल केले जाईल. या घोटाळ्यातही जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या दिग्गज नेत्यांवर या घोटाळ्याची टांगती तलवार लटकत आहे. लवकरच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ७२ (३) नुसार माजी संचालकांवर आरोपपत्र ठेवले जाणार आहे. त्यावर पुन्हा सुनावणी, जबाबदारी निश्चिती आणि कारवाईच्या शिफारशीचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. ही प्रक्रिया अजून चालणार असली तरी, तत्कालीन माजी संचालकांच्या मालमत्तेची माहितीही संकलित झाली आहे. १०२ लोकांना चौकशी अधिकाऱ्यांनी २१ मे रोजी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. यापूर्वी सरसकट सर्व अनियमित कामांसाठी सर्वांना नोटिसा बजावल्या जात होत्या. आता त्या-त्या नियमबाह्य कामांना जबाबदार असणाऱ्या माजी संचालक, त्यांचे वारसदार व अधिकारी यांना स्वतंत्र नोटिसा बजावल्या आहेत. यावर सुनावणी झाल्यानंतर प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सहकार विभागाने त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. दोन वर्षापूर्वी जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेच्या संचालक मंडळाच्या कालावधित नियमबाह्य कर्जवाटपाची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८३ नुसार चौकशी करण्यात आली. या चौकशीत २१ संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप करून १५० कोटी व १७ संस्थांना एकरकमी कर्ज परतफेड योजनेतून ७ कोटी ९ लाखांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सुनावणी झाली. या सुनावणीला माजी संचालकांनी आक्षेप घेत सहकारमंत्र्यांसमोर अपील केले होते. तत्कालीन सहकारमंत्र्यांसमोर चारवेळा सुनावणी होऊनही त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे माजी संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सहकारमंत्र्यांकडील अपिलावर तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जानेवारी २०१५ मध्ये याविषयीची सुनावणी घेऊन, कलम ८८ च्या चौकशीचा मार्ग खुला करण्यात आला होता. आता याच कलमान्वये चौकशी पूर्ण झाली आहे. आता आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)