शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

नोटाबंदी निर्णयाने सर्वसामान्य त्रस्त

By admin | Updated: February 18, 2017 00:04 IST

सत्यजित देशमुख : मणदूरमध्ये काँगे्रस-राष्ट्रवादीची सभा

शिराळा : मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सर्वसामान्य माणसावर केलेले सर्जिकल स्ट्राईक आहे. या निर्णयाने जनताच पिचली असून, विजय मल्ल्यासारखे मोठे उद्योजक यामध्ये सहीसलामत सुटले. त्यामुळे उद्योगपतींना साथ देणाऱ्या भाजपला नाकारून काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन प्रदेश काँंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले. मणदूर (ता. शिराळा) येथे काँग्रेस व राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थित होते. देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांची अवहेलना करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. अनेक अपेक्षा ठेवून जनतेने भाजपला निवडून दिले, पण जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. मानसिंगराव नाईक म्हणाले, समाजमान्यता मिळाल्याने गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये लोकांना अपेक्षित विकास झाला. या विभागामध्ये मी आमदार असताना अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत. या जोरावरच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विजयश्री खेचून आणू, विरोधकांना एकही जागा मिळणार नाही.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, गोविंदराव माने, संभाजी पाटील, शिवाजी चौगुले, नाना पाटील, मोहन पाटील, राम माने, कैलास पाटील, यशवंत पाटील, शिवाजी जाधव, शिवाजी पाटील, विष्णू पाटील, वसंत कांबळे, रामचंद्र मिरुखे, मारुती मिरुखे, ज्योती मिरुखे, किसन कंदारे, तानाजी वरपे, किसन मिरुखे, पांडुरंग कोळेखर, तुकाराम गावडे उपस्थित होते. (वार्ताहर)