शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ना शाळा, ना परीक्षा; पाच लाख विद्यार्थी पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

सांगली : राज्य शासनाने पहिली ते बारावी वर्गातील पाच लाख ५६३ विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पास केले आहे. ...

सांगली : राज्य शासनाने पहिली ते बारावी वर्गातील पाच लाख ५६३ विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पास केले आहे. यापैकी शहरी भागातील काही जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळाले; पण जिल्हा परिषद शाळेतील मुले शाळेतच गेली नाहीत आणि ६० टक्के मुलांना ऑनलाइन शिक्षणही मिळाले नाही, यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल शिक्षण तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, शिराळासह अनेक दुर्गम भागांतील मुलांकडे आजही स्मार्ट फोन नाही. या विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या मुलांनी ऑनलाइन शिक्षण कसे घ्यायचे, असा सवालही पालकांनी उपस्थित केला आहे. शहरी भागातील मुलांना शाळांकडून ऑनलाइन शिक्षण मिळत आहे. या शाळांनी मुलांच्या परीक्षाही ऑनलाइन घेतल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन शिक्षण देत आहेत; पण जिल्हा परिषदेतील ६० ते ७० टक्के मुलांनी दीड वर्षात शाळा आणि शिक्षकांचे तोंडच पाहिले नाही. गेल्या वर्षी पुस्तके तर मिळाली होती. या वर्षी पुस्तकेही मिळाली नाहीत. या मुलांचे शिक्षणच थांबले आहे. याकडे राज्य सरकार आणि अधिकारीही गांभीर्याने लक्ष देत नाहीत, अशी खंत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चौकट

जिल्हा परिषद शाळा : १६८८

महापालिका शाळा : ५०

खाजगी अनुदानित शाळा : १५२

खासगी विनाअनुदानित शाळा : २२२१

एकूण विद्यार्थी : ५००५६३

चौकट

कुठल्या वर्गात किती विद्यार्थी?

पहिली : ३९५२६

दुसरी : ४२६२७

तिसरी : ४३६५८

चौथी : ४३६१५

पाचवी : ४४४८३

सहावी : ४३५३६

सातवी : ४३६०२

आठवी : ४४०९५

नववी : ४५२७२

दहावी : ४२१७६

अकरावी : ३३३४९

बारावी : ३४६२४

चौकट

ऑनलाइन शिक्षण काळाची गरज : संजय ठिगळे

कोरोनाची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. पालकही मुलांच्या सुरक्षित शिक्षणालाच प्राधान्य देणार आहेत. शास्त्र शाखा वगळता अन्य कला, वाणिज्य शाखा आणि प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यात काहीच अडचण नाही. मुलांच्या सुरक्षेसाठी एक-दोन वर्षे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले, म्हणून फार मोठे नुकसान होणार नाही. ऑनलाइन शिक्षण ही काळाची गरज, म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञ प्रा. संजय ठिगळे यांनी दिली.

चौकट

मुलगा काय शिक्षण घेतो हेच कळत नाही : सुषमा नायकवडी

सध्याच्या कोरोना कालावधीमध्ये ऑनलाइन शिक्षण थोड्या कालावधीसाठी योग्य आहे; पण कायमस्वरूपी ऑनलाइन शिक्षण देणे म्हणजे विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. विज्ञान शाखेतील मुलांचे ऑनलाइन प्रात्यक्षिक घेण्यात अडचणी येत आहेत. दोन-दोन वर्षे मुलांची प्रात्यक्षिक परीक्षा न घेता त्यांना उत्तीर्ण करणे, त्या मुलांचे नुकसान होऊ शकते, असे मत क्रांतीसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी यांनी व्यक्त केले.

चौकट

इंटरनेट रेंजच मिळत नसल्याच्या तक्रारी

कोरोनामुळे सगळीकडे वर्क फ्रॉम होमसोबत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी आवश्‍यक असणारी इंटरनेट सेवा योग्यप्रकारे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अतिदुर्गम, दुर्गम भागात बीएसएनएल दूरध्वनी व मोबाइल टॉवरचे जाळे आहे. मात्र, काही वेळा ते विस्कळीत होत आहे. कारण, सध्या मोबाइल व इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण येथे जास्त आहे. शाळा, महाविद्यालयांचे अध्यापनही ऑनलाइन सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये मोबाइल आणि इंटरनेट रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून येत आहेत.