शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

पाणी कोणा एकट्याच्या बापाचे नाही!

By admin | Updated: January 13, 2015 00:18 IST

दीपकआबा साळुंखे-पाटील : ‘म्हैसाळ’च्या पाण्याबाबत सांगलीत बैठक

सांगली : सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील साडेचार हजार हेक्टरसाठी म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे, याकरिता शासनाने खास तरतूद करून पाणी सोडले आहे, मात्र मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील लोक सांगोल्यापर्यंत पाणीच पोहोचू देत नाहीत. कालवे फोडून पाणी अडवत आहेत. शेगाव (ता. जत) येथील तलाव तीन वेळा भरून घेतल्यानंतरही पुढे पाणी सोडत नाहीत. पाणी कोणा एकट्याच्या बापाचे नाही, ते सर्वांना समानच मिळाले पाहिजे, असा इशारा सांगोला तालुक्याचे नेते आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना दिला. म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नावर सांगोला, जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील पदाधिकारी, अधिकाऱ्यांची सांगलीतील वारणाली येथे आज (सोमवारी) बैठक झाली. या बैठकीस आमदार सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ.दीपकआबा पाटील, कार्यकारी अभियंता एम. एच. धुळे, कार्यकारी अभियंता सचिन पवार आदी उपस्थित होते. आ. साळुंखे-पाटील म्हणाले की, म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सर्व तालुक्यांना आणि क्षेत्राला समान मिळाले पाहिजे, यासाठी सांगोला तालुक्याने शासनाशी लढा दिला आहे. म्हैसाळ योजना सुुरू होऊन चार ते पाच वर्षे झाली, तरीही मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातच पाणी फिरत आहे. अद्याप सांगोला तालुक्यापर्यंत ते पोहोचलेले नाही. सध्या सांगोला तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर पारे तलाव आणि मेथवडे बंधारा भरण्यासाठी म्हैसाळचे पाणी सोडले आहे. परंतु, मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातून पुढे पाणी सोडलेच जात नाही. शेगाव तलाव तीन ते चार वेळा भरल्यानंतरही म्हैसाळ योजनेचे कालवे फोडून पाणी अडवले जात आहे. यामुळे सांगोला तालुक्यापर्यंत पाणीच पोहोचत नाही. आमच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, ते कोणा एकट्याच्या बापाचे नाही, अशी विनंती करून सांगा. एवढ्यावर जर कुणी थांबणार नसेल, तर कायद्याचा आधार घेऊन दोषींवर फौजदारी कारवाई करावी.फौजदारी कारवाईच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आ. जगताप, आ. खाडे यांनीही म्हैसाळ योजनेचे कालवे फोडणाऱ्यांचा अधिकाऱ्यांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची सूचना केली. सांगोला तालुक्यातील तलाव भरल्यानंतर जत, कवठेमहांकाळ आणि शेवटी मिरज तालुक्यास पाणी द्यावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. कोण कालवे फोडत आहे, याची अधिकारी, कर्मचाऱ्यांना कल्पना आहे. त्यांनी दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पंप चालू ठेवावेत, अशी सूचना जगताप यांनी केली. (प्रतिनिधी)तीस टक्के पाणी कर्नाटकलाम्हैसाळचे पाणी मिळत नसल्यामुळे जत आणि सांगोला तालुक्यात संघर्ष पेटला आहे. पाणी मिळविण्यासाठी तेथील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाणीप्रश्नावर दोन्ही तालुक्यातील नेत्यांमधील संघर्ष पेटला असतानाच, आमदार खाडे यांनी म्हैसाळ योजनेतील ३० टक्के पाणी कर्नाटकाला वाहून जात असल्याचा आरोप करून बैठकीतील हवाच काढून घेतली. अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कारभाराचेही त्यांनी वाभाडे काढले. खाडेंच्या विधानानंतर दीपकआबांनी तर डोक्यालाच हात लावला. ‘अहो, आम्ही घोटभर पाण्यासाठी जीव तोडून ओरडत आहोत आणि अधिकारी मात्र योजनेतील ३० टक्के पाणी कर्नाटकाला सोडत आहेत, ही गंभीर बाब आहे,’ असे सांगून, पाण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.मराठवाडा, विदर्भात पाणी मोजमाप आणि पाणीपट्टी आकारणीमधील अनेक अधिकारी, कर्मचारी बसून पगार घेत आहेत. त्यांना तेथे कामही नसल्यामुळे तेथील कार्यालये म्हैसाळ योजनेकडे वर्ग करून, पाणीपट्टी वसुलीसाठी गती द्यावी, अशी सूचना आ. साळुंखे-पाटील, आ. जगताप यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार तसा प्रस्ताव करून शासनाकडे पाठविण्याचे ठरले.निधीसाठी पंतप्रधानांना भेटणारम्हैसाळ योजनेसाठी निधी मिळालेला नाही. या योजनेच्या अपूर्ण कामांकरिता शासनाने निधी द्यावा, या मागणीसाठी जत, सांगोला, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव तालुक्यातील आमदार, ज्येष्ठ लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची बैठक घडवून आणू. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना असल्याने निधी द्यावा, अशी मागणी करू, असे मत दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले.