शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पाणी कोणा एकट्याच्या बापाचे नाही!

By admin | Updated: January 13, 2015 00:18 IST

दीपकआबा साळुंखे-पाटील : ‘म्हैसाळ’च्या पाण्याबाबत सांगलीत बैठक

सांगली : सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील साडेचार हजार हेक्टरसाठी म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे, याकरिता शासनाने खास तरतूद करून पाणी सोडले आहे, मात्र मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील लोक सांगोल्यापर्यंत पाणीच पोहोचू देत नाहीत. कालवे फोडून पाणी अडवत आहेत. शेगाव (ता. जत) येथील तलाव तीन वेळा भरून घेतल्यानंतरही पुढे पाणी सोडत नाहीत. पाणी कोणा एकट्याच्या बापाचे नाही, ते सर्वांना समानच मिळाले पाहिजे, असा इशारा सांगोला तालुक्याचे नेते आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना दिला. म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नावर सांगोला, जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील पदाधिकारी, अधिकाऱ्यांची सांगलीतील वारणाली येथे आज (सोमवारी) बैठक झाली. या बैठकीस आमदार सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ.दीपकआबा पाटील, कार्यकारी अभियंता एम. एच. धुळे, कार्यकारी अभियंता सचिन पवार आदी उपस्थित होते. आ. साळुंखे-पाटील म्हणाले की, म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सर्व तालुक्यांना आणि क्षेत्राला समान मिळाले पाहिजे, यासाठी सांगोला तालुक्याने शासनाशी लढा दिला आहे. म्हैसाळ योजना सुुरू होऊन चार ते पाच वर्षे झाली, तरीही मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातच पाणी फिरत आहे. अद्याप सांगोला तालुक्यापर्यंत ते पोहोचलेले नाही. सध्या सांगोला तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर पारे तलाव आणि मेथवडे बंधारा भरण्यासाठी म्हैसाळचे पाणी सोडले आहे. परंतु, मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातून पुढे पाणी सोडलेच जात नाही. शेगाव तलाव तीन ते चार वेळा भरल्यानंतरही म्हैसाळ योजनेचे कालवे फोडून पाणी अडवले जात आहे. यामुळे सांगोला तालुक्यापर्यंत पाणीच पोहोचत नाही. आमच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, ते कोणा एकट्याच्या बापाचे नाही, अशी विनंती करून सांगा. एवढ्यावर जर कुणी थांबणार नसेल, तर कायद्याचा आधार घेऊन दोषींवर फौजदारी कारवाई करावी.फौजदारी कारवाईच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आ. जगताप, आ. खाडे यांनीही म्हैसाळ योजनेचे कालवे फोडणाऱ्यांचा अधिकाऱ्यांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची सूचना केली. सांगोला तालुक्यातील तलाव भरल्यानंतर जत, कवठेमहांकाळ आणि शेवटी मिरज तालुक्यास पाणी द्यावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. कोण कालवे फोडत आहे, याची अधिकारी, कर्मचाऱ्यांना कल्पना आहे. त्यांनी दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पंप चालू ठेवावेत, अशी सूचना जगताप यांनी केली. (प्रतिनिधी)तीस टक्के पाणी कर्नाटकलाम्हैसाळचे पाणी मिळत नसल्यामुळे जत आणि सांगोला तालुक्यात संघर्ष पेटला आहे. पाणी मिळविण्यासाठी तेथील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाणीप्रश्नावर दोन्ही तालुक्यातील नेत्यांमधील संघर्ष पेटला असतानाच, आमदार खाडे यांनी म्हैसाळ योजनेतील ३० टक्के पाणी कर्नाटकाला वाहून जात असल्याचा आरोप करून बैठकीतील हवाच काढून घेतली. अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कारभाराचेही त्यांनी वाभाडे काढले. खाडेंच्या विधानानंतर दीपकआबांनी तर डोक्यालाच हात लावला. ‘अहो, आम्ही घोटभर पाण्यासाठी जीव तोडून ओरडत आहोत आणि अधिकारी मात्र योजनेतील ३० टक्के पाणी कर्नाटकाला सोडत आहेत, ही गंभीर बाब आहे,’ असे सांगून, पाण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.मराठवाडा, विदर्भात पाणी मोजमाप आणि पाणीपट्टी आकारणीमधील अनेक अधिकारी, कर्मचारी बसून पगार घेत आहेत. त्यांना तेथे कामही नसल्यामुळे तेथील कार्यालये म्हैसाळ योजनेकडे वर्ग करून, पाणीपट्टी वसुलीसाठी गती द्यावी, अशी सूचना आ. साळुंखे-पाटील, आ. जगताप यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार तसा प्रस्ताव करून शासनाकडे पाठविण्याचे ठरले.निधीसाठी पंतप्रधानांना भेटणारम्हैसाळ योजनेसाठी निधी मिळालेला नाही. या योजनेच्या अपूर्ण कामांकरिता शासनाने निधी द्यावा, या मागणीसाठी जत, सांगोला, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव तालुक्यातील आमदार, ज्येष्ठ लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची बैठक घडवून आणू. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना असल्याने निधी द्यावा, अशी मागणी करू, असे मत दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले.