शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

जयंतरावांच्या कारखान्याकडून एफआरपी थकीत -निशिकांत पाटील : १०० कोटींची देणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:09 IST

वाळवा तालुक्यातील शेतकºयांनी ३० वर्षे जयंत पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले, पण त्यांच्याकडूनच शेतकºयांना न्याय मिळत नाही. एफआरपीची १०० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दुबळे ठेवण्याचे षड्यंत्र

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील शेतकºयांनी ३० वर्षे जयंत पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले, पण त्यांच्याकडूनच शेतकºयांना न्याय मिळत नाही. एफआरपीची १०० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. तालुक्यात विरोध वाढत आहे म्हटल्यावर शेतकºयांची कोंडी करण्याचे प्रयत्न आ. पाटील व त्यांच्या बगलबच्चांकडून होत आहेत. शेतकºयांची नवी पिढी दुबळी रहावी, असे षड्यंत्र रचले जात आहे. मात्र शेतकरीच आता चोख उत्तर देतील, असा इशारा नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी बुधवारी दिला.

राजारामबापू कारखान्याच्या थकीत एफआरपीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सभासदांसमवेत घेतलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी रवींद्र पिसाळ, अधिक मोरे, रयत क्रांती आघाडीचे सागर खोत, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील उपस्थित होते.

रवींद्र पिसाळ म्हणाले, विधानसभेला शेतकºयांची मते चालतात, तर मग साखर कारखान्याचे सभासद का करून घेतले जात नाही? सभासद वाढीसाठी १ आॅगस्टरोजी आष्टा नाका येथील राजारामबापू पुतळा परिसरात आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले; तर सागर खोत यांनी, येत्या १० दिवसात एफआरपीची रक्कम न मिळाल्यास साखर आयुक्तांकडे कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

नगराध्यक्ष पाटील म्हणाले, राजारामबापू कारखान्याच्या तिन्ही युनिटमध्ये २० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यांच्याकडून एफआरपीप्रमाणे जानेवारी १६ पासून ३ हजार ६ रुपयांपैकी थकीत ५०६ रुपयांप्रमाणे १०० कोटी २३ लाख रुपयांची बाकी शेतकºयांना येणे आहे. तसेच एफआरपी अधिक २०० यानुसार ३९ कोटी ६१ लाख रुपये अशी एकूण १३९ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम शेतकºयांना मिळायला हवी.

प्रसाद पाटील म्हणाले, ५४ गावांच्या संपर्क दौºयातून जनतेच्या अडीअडचणी समजून घेताना शेतकºयांमध्ये ऊस बिलाच्या प्रश्नावरून प्रचंड असंतोष असल्याचे जाणवले. कायद्याप्रमाणे १४ दिवसात एफआरपी देणे बंधनकारक असतानाही ‘राजारामबापू’कडून ५०६ रुपयांची उर्वरित रक्कम अद्यापही दिली गेलेली नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखाने