शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

जयंतरावांच्या कारखान्याकडून एफआरपी थकीत -निशिकांत पाटील : १०० कोटींची देणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:09 IST

वाळवा तालुक्यातील शेतकºयांनी ३० वर्षे जयंत पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले, पण त्यांच्याकडूनच शेतकºयांना न्याय मिळत नाही. एफआरपीची १०० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दुबळे ठेवण्याचे षड्यंत्र

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील शेतकºयांनी ३० वर्षे जयंत पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले, पण त्यांच्याकडूनच शेतकºयांना न्याय मिळत नाही. एफआरपीची १०० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. तालुक्यात विरोध वाढत आहे म्हटल्यावर शेतकºयांची कोंडी करण्याचे प्रयत्न आ. पाटील व त्यांच्या बगलबच्चांकडून होत आहेत. शेतकºयांची नवी पिढी दुबळी रहावी, असे षड्यंत्र रचले जात आहे. मात्र शेतकरीच आता चोख उत्तर देतील, असा इशारा नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी बुधवारी दिला.

राजारामबापू कारखान्याच्या थकीत एफआरपीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सभासदांसमवेत घेतलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी रवींद्र पिसाळ, अधिक मोरे, रयत क्रांती आघाडीचे सागर खोत, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील उपस्थित होते.

रवींद्र पिसाळ म्हणाले, विधानसभेला शेतकºयांची मते चालतात, तर मग साखर कारखान्याचे सभासद का करून घेतले जात नाही? सभासद वाढीसाठी १ आॅगस्टरोजी आष्टा नाका येथील राजारामबापू पुतळा परिसरात आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले; तर सागर खोत यांनी, येत्या १० दिवसात एफआरपीची रक्कम न मिळाल्यास साखर आयुक्तांकडे कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

नगराध्यक्ष पाटील म्हणाले, राजारामबापू कारखान्याच्या तिन्ही युनिटमध्ये २० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यांच्याकडून एफआरपीप्रमाणे जानेवारी १६ पासून ३ हजार ६ रुपयांपैकी थकीत ५०६ रुपयांप्रमाणे १०० कोटी २३ लाख रुपयांची बाकी शेतकºयांना येणे आहे. तसेच एफआरपी अधिक २०० यानुसार ३९ कोटी ६१ लाख रुपये अशी एकूण १३९ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम शेतकºयांना मिळायला हवी.

प्रसाद पाटील म्हणाले, ५४ गावांच्या संपर्क दौºयातून जनतेच्या अडीअडचणी समजून घेताना शेतकºयांमध्ये ऊस बिलाच्या प्रश्नावरून प्रचंड असंतोष असल्याचे जाणवले. कायद्याप्रमाणे १४ दिवसात एफआरपी देणे बंधनकारक असतानाही ‘राजारामबापू’कडून ५०६ रुपयांची उर्वरित रक्कम अद्यापही दिली गेलेली नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखाने