शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

जयंतरावांच्या कारखान्याकडून एफआरपी थकीत -निशिकांत पाटील : १०० कोटींची देणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:09 IST

वाळवा तालुक्यातील शेतकºयांनी ३० वर्षे जयंत पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले, पण त्यांच्याकडूनच शेतकºयांना न्याय मिळत नाही. एफआरपीची १०० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दुबळे ठेवण्याचे षड्यंत्र

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील शेतकºयांनी ३० वर्षे जयंत पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले, पण त्यांच्याकडूनच शेतकºयांना न्याय मिळत नाही. एफआरपीची १०० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. तालुक्यात विरोध वाढत आहे म्हटल्यावर शेतकºयांची कोंडी करण्याचे प्रयत्न आ. पाटील व त्यांच्या बगलबच्चांकडून होत आहेत. शेतकºयांची नवी पिढी दुबळी रहावी, असे षड्यंत्र रचले जात आहे. मात्र शेतकरीच आता चोख उत्तर देतील, असा इशारा नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी बुधवारी दिला.

राजारामबापू कारखान्याच्या थकीत एफआरपीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सभासदांसमवेत घेतलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी रवींद्र पिसाळ, अधिक मोरे, रयत क्रांती आघाडीचे सागर खोत, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील उपस्थित होते.

रवींद्र पिसाळ म्हणाले, विधानसभेला शेतकºयांची मते चालतात, तर मग साखर कारखान्याचे सभासद का करून घेतले जात नाही? सभासद वाढीसाठी १ आॅगस्टरोजी आष्टा नाका येथील राजारामबापू पुतळा परिसरात आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले; तर सागर खोत यांनी, येत्या १० दिवसात एफआरपीची रक्कम न मिळाल्यास साखर आयुक्तांकडे कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

नगराध्यक्ष पाटील म्हणाले, राजारामबापू कारखान्याच्या तिन्ही युनिटमध्ये २० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यांच्याकडून एफआरपीप्रमाणे जानेवारी १६ पासून ३ हजार ६ रुपयांपैकी थकीत ५०६ रुपयांप्रमाणे १०० कोटी २३ लाख रुपयांची बाकी शेतकºयांना येणे आहे. तसेच एफआरपी अधिक २०० यानुसार ३९ कोटी ६१ लाख रुपये अशी एकूण १३९ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम शेतकºयांना मिळायला हवी.

प्रसाद पाटील म्हणाले, ५४ गावांच्या संपर्क दौºयातून जनतेच्या अडीअडचणी समजून घेताना शेतकºयांमध्ये ऊस बिलाच्या प्रश्नावरून प्रचंड असंतोष असल्याचे जाणवले. कायद्याप्रमाणे १४ दिवसात एफआरपी देणे बंधनकारक असतानाही ‘राजारामबापू’कडून ५०६ रुपयांची उर्वरित रक्कम अद्यापही दिली गेलेली नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखाने