शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

राष्ट्रवादीच्या निवडणुकीत निरुत्साही वारे

By admin | Updated: April 2, 2015 00:38 IST

नाराजीचा सूर : पक्षांतर्गत कुरघोड्या; आबांच्या निधनामुळे फटका

सांगली : राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निवडणुकांचा मौसम आला असताना, सांगली जिल्ह्यात निरुत्साही वारे वाहू लागले आहे. पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे एकीकडे नेते, कार्यकर्ते खचले आहेत, तर दुसरीकडे आर. आर. पाटील यांच्या निधनाचाही मोठा फटका या निवडणुकांना बसत आहे. येत्या ५ आणि १२ एप्रिल रोजी विविध पदांसाठी निवडणुका होणार असतानाही पदे मिळविण्यासाठी फारसा उत्साह दिसत नाही. कार्यालयातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दीही घटली आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी, गेल्या काही वर्षांत पक्षाची अधोगती सुरू आहे. महापालिका, विधानसभा अशा महत्त्वाच्या निवडणुकांबरोबरच राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या गावांमधील छोट्या सोसायट्यांच्या निवडणुकातही पक्षाला मोठा फटका बसला आहे. पदांसाठी पूर्वी राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी होत होती. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की पक्षीय कार्यालयात हालचालींना वेग येत होता. इच्छुकांच्या नेत्यांच्या दरबारी फेऱ्या होत असत. आता असे कोणतेही चित्र दिसत नाही. लोकसभा निवडणुकीपासून पक्षातील उत्साहाला अनेक कारणांनी ओहोटी लागली. ती अजूनही कायम आहे. पुन्हा भरती येईल, याचीही चिन्हे कोणाला दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातील अर्धा डझन नेते भाजप व शिवसेनेत निघून गेले. त्यांच्या जागी सक्षम नेतृत्व उभे करण्यात पक्षाला यश आले नाही. काही ठिकाणी राष्ट्रवादीला उसने उमेदवार घ्यावे लागले. विधानसभेच्या निवडणुकीत या गोष्टी स्पष्टपणे दिसून आल्या. नेत्यांबरोबर कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर निघून गेले. त्यामुळे पक्षांतर्गत कार्यकर्त्यांची संख्या घटली. दुसरीकडे पक्षांतर्गत कुरघोड्या वाढल्याने अनेक प्रामाणिक कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले. या नाराजीतून त्यांनी पक्षीय कार्यालयात येणे बंद केले. आजही जिल्ह्यातील, शहरातील महत्त्वाचे नेते, पदाधिकारी पक्षीय कार्यालयात दिसत नाहीत. महत्त्वाच्या बैठकांनाही त्यांनी गैरहजेरी असते. त्यामुळे निवडणुकांमध्ये म्हणावा तेवढा उत्साह दिसत नाही. (प्रतिनिधी)निवडणुकीचा कार्यक्रम ५ एप्रिलरोजी विधानसभानिहाय तसेच तालुका व ब्लॉक कार्यकारिणी अध्यक्ष, अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. १२ एप्रिल रोजी प्राथमिक समिती, पंचायत, जिल्हा, शहर, तालुका, मतदारसंघनिहाय अध्यक्ष, तसेच प्रदेश कार्यकारिणीवर पाठविण्यात येणाऱ्या प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. आबांच्या निधनाचा धक्का आर. आर. पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीकडे एक सक्षम नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने अनेक कार्यकर्ते खचले. प्रत्येक तालुक्यात त्यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत. आबांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही हे कार्यकर्ते सावरलेले नाहीत. आबा नसतील तर, पद घेऊन काय करायचे, असा सवाल कार्यकर्तेच उपस्थित करीत आहेत.