शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

‘जत’मधील नऊ गावांना टँकरने पाणी

By admin | Updated: July 27, 2014 23:03 IST

४८ वाड्या-वस्तीतही टंचाई : नागरिकांना पाच खेपांचे पाणी मिळेना

जत : ऐन पावसाळ्यातही तालुक्यातील नऊ गावे आणि त्याखालील ४८ वाड्या-वस्त्यांवरील २१ हजार ८२५ नागरिकांना माणसी वीस लिटर या प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येथील काही भागात पाऊस झाला आहे, तर काही भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने तेथे टँकरने पाणी दिले जात आहे.तालुक्यात ढगाळ वातावरण असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे. अधूनमधून तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. उमराणी, सिंदूर, बसर्गी, वज्रवाड, खिलारवाडी, डफळापूर, एकुंडी, अमृतवाडी, बनाळी ही नऊ गावे आणि परिसरात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वज्रवाड व खिलारवाडी येथील टँकर नादुरुस्त आहे. त्यामुळे चार दिवसांपासून तेथील पाणीपुरवठा बंद आहे. पर्यायी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.प्रशासनाने नऊ गावे आणि त्याखालील ४८ वाड्या-वस्त्यांसाठी टँकरच्या २३.५ खेपा मंजूर केल्या आहेत. परंतु भारनियमन, दोन गावांतील जादा अंतर, पाण्याचा उद्भव आणि नादुरुस्त टँकर यांमुळे १८.५ खेपाच मिळत असून, पाच खेपांचे पाणी मिळत नाही. नऊपैकी पाच टँकर शासकीय आहेत. त्यातील दोन नादुरुस्त आहेत. त्यामुळे दोन गावांना टँकरद्वारे पाणी मिळेनासे झाले आहे. शासकीय टँकरपेक्षा खासगी टँकरची पाण्याची क्षमता जादा आहे. शासकीय टँकर सतत नादुरुस्त असतात. (वार्ताहर)