शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

साखर निर्मितीपेक्षा साखर विक्रीचे नवे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:25 IST

फोटो ओळी - राजारामबापू साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक ऑनलाईन सभेत जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. आर. ...

फोटो ओळी - राजारामबापू साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक ऑनलाईन सभेत जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. आर. पाटील, विजयराव पाटील, प्रतीक पाटील, आर. डी. माहुली उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : साखर निर्मितीपेक्षा साखर विक्रीचे नवे संकट साखर उद्योगासमोर निर्माण झाले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढविण्याबरोबर नव-नवे मार्ग शोधायला हवेत, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

राजारामबापू साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ही सभा ऑनलाईन झाली. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष विजयराव पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले, कोरोनाची परिस्थिती पाहून कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी संपर्क दौरा करून ऊस उत्पादकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत. एकरी उत्पादन वाढविण्यावर भर द्यायला हवा.

पी. आर. पाटील म्हणाले, देशात अतिरिक्त साखर उत्पादन होत असल्याने साखर विक्रीचे मोठे आव्हान साखर उद्योगासमोर आहे. त्यामुळे एफआरपी देण्यासाठी कर्जाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. इथेनॉल निर्मिती तसेच वीज उत्पादनाने काहीसा आर्थिक हातभार लागला आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, रवींद्र पिसाळ यांनी काही सूचना मांडल्या. रणजित पाटील, माणिक पाटील, डॉ. प्रकाश पाटील, धनाजी पाटील, पोपटराव जगताप, संभाजी पाटील यांच्यासह ऊस उत्पादकांनी ठराव मंजूर करण्याची सूचना मांडली. सर्व विषय मंजूर करण्यात आले.

यावेळी संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, देवराज पाटील, बाळासाहेब पवार, पै. भगवान पाटील, आनंदराव पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, दादासाहेब मोरे, सचिव प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

चौकट

जयंतरावांकडून विचारणा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या इतिहासात ही पहिली ऑनलाईन सभा झाली. प्रत्येक विषयाचे वाचन झाल्यावर जयंत पाटील स्वतः ऑनलाईन सभासदांना आपणास काही बोलायचे आहे का, अशी विचारणा करीत होते.