शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

साखर निर्मितीपेक्षा साखर विक्रीचे नवे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:25 IST

फोटो ओळी - राजारामबापू साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक ऑनलाईन सभेत जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. आर. ...

फोटो ओळी - राजारामबापू साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक ऑनलाईन सभेत जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. आर. पाटील, विजयराव पाटील, प्रतीक पाटील, आर. डी. माहुली उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : साखर निर्मितीपेक्षा साखर विक्रीचे नवे संकट साखर उद्योगासमोर निर्माण झाले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढविण्याबरोबर नव-नवे मार्ग शोधायला हवेत, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

राजारामबापू साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ही सभा ऑनलाईन झाली. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष विजयराव पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले, कोरोनाची परिस्थिती पाहून कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी संपर्क दौरा करून ऊस उत्पादकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत. एकरी उत्पादन वाढविण्यावर भर द्यायला हवा.

पी. आर. पाटील म्हणाले, देशात अतिरिक्त साखर उत्पादन होत असल्याने साखर विक्रीचे मोठे आव्हान साखर उद्योगासमोर आहे. त्यामुळे एफआरपी देण्यासाठी कर्जाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. इथेनॉल निर्मिती तसेच वीज उत्पादनाने काहीसा आर्थिक हातभार लागला आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, रवींद्र पिसाळ यांनी काही सूचना मांडल्या. रणजित पाटील, माणिक पाटील, डॉ. प्रकाश पाटील, धनाजी पाटील, पोपटराव जगताप, संभाजी पाटील यांच्यासह ऊस उत्पादकांनी ठराव मंजूर करण्याची सूचना मांडली. सर्व विषय मंजूर करण्यात आले.

यावेळी संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, देवराज पाटील, बाळासाहेब पवार, पै. भगवान पाटील, आनंदराव पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, दादासाहेब मोरे, सचिव प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

चौकट

जयंतरावांकडून विचारणा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या इतिहासात ही पहिली ऑनलाईन सभा झाली. प्रत्येक विषयाचे वाचन झाल्यावर जयंत पाटील स्वतः ऑनलाईन सभासदांना आपणास काही बोलायचे आहे का, अशी विचारणा करीत होते.