शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेने-- २० ते २२ एप्रिलअखेर सांगलीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:46 IST

सांगली : स्वा. सावरकर अभ्यास मंडळ (मुंबई), सावरकर प्रतिष्ठान (सांगली) व सावरकरप्रेमी मंडळ (मिरज) यांच्यावतीने सांगलीत आयोजित करण्यात आलेले ३० वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार

ठळक मुद्देविविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगली : स्वा. सावरकर अभ्यास मंडळ (मुंबई), सावरकर प्रतिष्ठान (सांगली) व सावरकरप्रेमी मंडळ (मिरज) यांच्यावतीने सांगलीत आयोजित करण्यात आलेले ३० वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. दि. २० ते २२ एप्रिलअखेर होणाऱ्या या संमेलनात समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दा. वा. नेने, तर सोलापूरचे खा. शरद बनसोडे उद्घाटक आहेत.

सावरकर साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी विश्रामबाग येथील दांडेकर हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरूवातीला बाळासाहेब देशपांडे यांनी संमेलनाची रूपरेषा व त्याच्या तयारीसाठी करण्यात येणाºया समित्यांची माहिती दिली. त्यानंतर माधवराव कुलकर्णी यांनी समित्यांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सावरकर प्रतिष्ठान प्रशालेच्या प्रांगणात होणाºया या संमेलनात पहिल्या दिवशी २० एप्रिल रोजी दुपारी चारपासून ग्रंथदिंडी, शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेनंतर प्रेरणा लांबे यांचे ‘मी येसुबाई बोलतेय’ या विषयावर, गीता उपासनी यांचे ‘सहा सोनेरी पानांचा इतिहास’ या विषयावर आणि शंतनू रिठे यांचे ‘आज सावरकर असते तर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विश्रामबाग येथील शोभायात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी शेखर इनामदार यांनी घेतली, तर गावभाग येथील शोभायात्रेची जबाबदारी भारती दिगडे यांनी घेतली.

मिरज येथील शोभायात्रेसाठी सुधीर गोरे व संजय धामणगावकर यांनी सहकाºयांसह योगदान देणार असल्याचे सांगितले. उर्वरित कार्यक्रम पुढील बैठकीत निश्चित केले जाणार आहेत.संमेलनामध्ये दोन दिवस पूर्णवेळ उपस्थित राहावे, आपल्याबरोबर किमान दोन प्रतिनिधी सहभागी करावेत, संमेलनात युवकांचा सहभाग वाढवावा व निधीच्या संकलनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी, संयोजन समितीकडून जी द्याल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली जाईल असे सांगितले. यावेळी बापूसाहेब पुजारी, विलास चौथाई यांच्यासह इतरांनीही आपली मते व्यक्त केली.मंत्री, खासदार, मान्यवरांची उपस्थितीसंमेलनाच्या मुख्य दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, तर समारोपाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती असणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दा. वा. नेने, तर सोलापूरचे खा. शरद बनसोडे उद्घाटक आहेत. संमेलनास खा. अमर साबळे, प्रदीप रावत, दत्तात्रय शेकटकर, भाऊ तोरसेकर, यमाजी मालकर, रवींद्र गोयल आदी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.सावरकर साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी सांगलीतील विश्रामबाग येथे बैठक झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेखर इनामदार, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, बाळासाहेब देशपांडे, विलास चौथाई आदी उपस्थित होते.