शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेने-- २० ते २२ एप्रिलअखेर सांगलीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:46 IST

सांगली : स्वा. सावरकर अभ्यास मंडळ (मुंबई), सावरकर प्रतिष्ठान (सांगली) व सावरकरप्रेमी मंडळ (मिरज) यांच्यावतीने सांगलीत आयोजित करण्यात आलेले ३० वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार

ठळक मुद्देविविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगली : स्वा. सावरकर अभ्यास मंडळ (मुंबई), सावरकर प्रतिष्ठान (सांगली) व सावरकरप्रेमी मंडळ (मिरज) यांच्यावतीने सांगलीत आयोजित करण्यात आलेले ३० वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. दि. २० ते २२ एप्रिलअखेर होणाऱ्या या संमेलनात समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दा. वा. नेने, तर सोलापूरचे खा. शरद बनसोडे उद्घाटक आहेत.

सावरकर साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी विश्रामबाग येथील दांडेकर हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरूवातीला बाळासाहेब देशपांडे यांनी संमेलनाची रूपरेषा व त्याच्या तयारीसाठी करण्यात येणाºया समित्यांची माहिती दिली. त्यानंतर माधवराव कुलकर्णी यांनी समित्यांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सावरकर प्रतिष्ठान प्रशालेच्या प्रांगणात होणाºया या संमेलनात पहिल्या दिवशी २० एप्रिल रोजी दुपारी चारपासून ग्रंथदिंडी, शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेनंतर प्रेरणा लांबे यांचे ‘मी येसुबाई बोलतेय’ या विषयावर, गीता उपासनी यांचे ‘सहा सोनेरी पानांचा इतिहास’ या विषयावर आणि शंतनू रिठे यांचे ‘आज सावरकर असते तर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विश्रामबाग येथील शोभायात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी शेखर इनामदार यांनी घेतली, तर गावभाग येथील शोभायात्रेची जबाबदारी भारती दिगडे यांनी घेतली.

मिरज येथील शोभायात्रेसाठी सुधीर गोरे व संजय धामणगावकर यांनी सहकाºयांसह योगदान देणार असल्याचे सांगितले. उर्वरित कार्यक्रम पुढील बैठकीत निश्चित केले जाणार आहेत.संमेलनामध्ये दोन दिवस पूर्णवेळ उपस्थित राहावे, आपल्याबरोबर किमान दोन प्रतिनिधी सहभागी करावेत, संमेलनात युवकांचा सहभाग वाढवावा व निधीच्या संकलनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी, संयोजन समितीकडून जी द्याल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली जाईल असे सांगितले. यावेळी बापूसाहेब पुजारी, विलास चौथाई यांच्यासह इतरांनीही आपली मते व्यक्त केली.मंत्री, खासदार, मान्यवरांची उपस्थितीसंमेलनाच्या मुख्य दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, तर समारोपाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती असणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दा. वा. नेने, तर सोलापूरचे खा. शरद बनसोडे उद्घाटक आहेत. संमेलनास खा. अमर साबळे, प्रदीप रावत, दत्तात्रय शेकटकर, भाऊ तोरसेकर, यमाजी मालकर, रवींद्र गोयल आदी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.सावरकर साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी सांगलीतील विश्रामबाग येथे बैठक झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेखर इनामदार, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, बाळासाहेब देशपांडे, विलास चौथाई आदी उपस्थित होते.