शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

राष्ट्रवादीचा सांगलीत मोर्चा

By admin | Updated: January 9, 2017 22:54 IST

नोटाबंदीला विरोध : केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

सांगली : नोटाबंदीच्या विरोधात सोमवारी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयापासून झाली. राम मंदिर, कॉँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. आंदोलनात आ. सुमनताई पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, राष्ट्रवादीचे नेते इलियास नायकवडी, शंकरदादा पाटील, माजी आ. विलासराव शिंदे, मनोज शिंदे, महापालिका स्थायी समिती सभापती संगीता हारगे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, बाबासाहेब मुळीक, पी. आर. पाटील, ताजुद्दिन तांबोळी, वैभव शिंदे, राहुल पवार, बाळासाहेब होनमोरे, बी. के. पाटील, विराज नाईक, सागर घोडके, वसुधा कुंभार, अनिता पांगम, छाया जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)इशारा नेत्यांचा : सदाभाऊंना गावबंदीचाशेतकऱ्यांच्या जिवावर राजकारण करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आता त्यांची कोणतीही फिकीर नाही. शेतकरी संकटात असताना, ते ही परिस्थिती मान्य करीत नाहीत. खुर्ची बदलली की चष्मा बदलतो, याचे हे उदाहरण आहे. त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही, तर जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्यांना प्रवेशबंदी करावी लागेल, असा इशारा दिलीपतात्या पाटील यांनी दिला. जयंत पाटील यांनीही नामोल्लेख न करता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली.कोण, काय म्हणालेजयंत पाटील : रघुराम राजन यांनी देशातील ठराविक धनिकांच्याकडील थकीत कर्जे तातडीने वसूल करण्याबाबत चार ते पाच पत्रे दिली होती. त्यांच्या या सूचनेने धनिकांची लॉबी जागी झाली आणि त्यांनी मोदींना हाताशी धरून राजन यांनाच पदावरून हटविले. याच धनिकांकडे अडकलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी माफ करण्याच्या उद्देशानेच मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. काळा पैसा जमा होईल आणि त्यातून या धनिकांचा फायदा करून देता येईल, असे गणित त्यांनी आखले होते. नोटाबंदीचा निर्णयच फसल्याने त्यांचे हे मनसुबे यशस्वी झाले नाहीत, मात्र गरीब जनता यात भरडली जात आहे. देशातील प्रत्येक घटकाला वेठीस धरण्याचा उद्योग आता सुरू झाला आहे. जिल्हा बॅँकेनंतर आता अंमलबजावणी संचालनालयामार्फत सुवर्ण व्यावसायिकांना वेठीस धरले जात आहे. एकही घटक या निर्णयाच्या धक्क्यातून सावरलेला नाही. आर्थिक समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे जोपर्यंत सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना आणि कष्टकरी जनतेला या निर्णयाच्या कचाट्यातून सोडविले जात नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी आंदोलन करेल, असे ते म्हणाले. अण्णा डांगे : नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा होणार की तोटा, हे आता काळच ठरवेल. कोणतेही नियोजन न करता हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने सामान्य जनता आता अडचणीत सापडली आहे. जिल्हा बॅँकांप्रमाणे पतसंस्थाही अडचणीत आल्या आहेत. शासनाने ही परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा लोकांना हे सरकारच बदलावे लागेल. दिलीपतात्या पाटील : (जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष ) जी व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलते, त्याच्याविरोधात षड्यंत्र रचण्याचे काम केले जात आहे. जिल्हा बॅँकेला अडचणीत आणण्याचे कामही याच षड्यंत्राचा भाग आहे. देशातल्या तपासणी करणाऱ्या सर्व यंत्रणा आता दमल्या. आता मोदी आणि जेटली जिल्हा बॅँकेच्या तपासणीसाठी येणार आहेत.