शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा सांगलीत मोर्चा

By admin | Updated: January 9, 2017 22:54 IST

नोटाबंदीला विरोध : केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

सांगली : नोटाबंदीच्या विरोधात सोमवारी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयापासून झाली. राम मंदिर, कॉँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. आंदोलनात आ. सुमनताई पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, राष्ट्रवादीचे नेते इलियास नायकवडी, शंकरदादा पाटील, माजी आ. विलासराव शिंदे, मनोज शिंदे, महापालिका स्थायी समिती सभापती संगीता हारगे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, बाबासाहेब मुळीक, पी. आर. पाटील, ताजुद्दिन तांबोळी, वैभव शिंदे, राहुल पवार, बाळासाहेब होनमोरे, बी. के. पाटील, विराज नाईक, सागर घोडके, वसुधा कुंभार, अनिता पांगम, छाया जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)इशारा नेत्यांचा : सदाभाऊंना गावबंदीचाशेतकऱ्यांच्या जिवावर राजकारण करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आता त्यांची कोणतीही फिकीर नाही. शेतकरी संकटात असताना, ते ही परिस्थिती मान्य करीत नाहीत. खुर्ची बदलली की चष्मा बदलतो, याचे हे उदाहरण आहे. त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही, तर जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्यांना प्रवेशबंदी करावी लागेल, असा इशारा दिलीपतात्या पाटील यांनी दिला. जयंत पाटील यांनीही नामोल्लेख न करता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली.कोण, काय म्हणालेजयंत पाटील : रघुराम राजन यांनी देशातील ठराविक धनिकांच्याकडील थकीत कर्जे तातडीने वसूल करण्याबाबत चार ते पाच पत्रे दिली होती. त्यांच्या या सूचनेने धनिकांची लॉबी जागी झाली आणि त्यांनी मोदींना हाताशी धरून राजन यांनाच पदावरून हटविले. याच धनिकांकडे अडकलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी माफ करण्याच्या उद्देशानेच मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. काळा पैसा जमा होईल आणि त्यातून या धनिकांचा फायदा करून देता येईल, असे गणित त्यांनी आखले होते. नोटाबंदीचा निर्णयच फसल्याने त्यांचे हे मनसुबे यशस्वी झाले नाहीत, मात्र गरीब जनता यात भरडली जात आहे. देशातील प्रत्येक घटकाला वेठीस धरण्याचा उद्योग आता सुरू झाला आहे. जिल्हा बॅँकेनंतर आता अंमलबजावणी संचालनालयामार्फत सुवर्ण व्यावसायिकांना वेठीस धरले जात आहे. एकही घटक या निर्णयाच्या धक्क्यातून सावरलेला नाही. आर्थिक समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे जोपर्यंत सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना आणि कष्टकरी जनतेला या निर्णयाच्या कचाट्यातून सोडविले जात नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी आंदोलन करेल, असे ते म्हणाले. अण्णा डांगे : नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा होणार की तोटा, हे आता काळच ठरवेल. कोणतेही नियोजन न करता हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने सामान्य जनता आता अडचणीत सापडली आहे. जिल्हा बॅँकांप्रमाणे पतसंस्थाही अडचणीत आल्या आहेत. शासनाने ही परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा लोकांना हे सरकारच बदलावे लागेल. दिलीपतात्या पाटील : (जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष ) जी व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलते, त्याच्याविरोधात षड्यंत्र रचण्याचे काम केले जात आहे. जिल्हा बॅँकेला अडचणीत आणण्याचे कामही याच षड्यंत्राचा भाग आहे. देशातल्या तपासणी करणाऱ्या सर्व यंत्रणा आता दमल्या. आता मोदी आणि जेटली जिल्हा बॅँकेच्या तपासणीसाठी येणार आहेत.