शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी उचलीचे वांदे

By admin | Updated: October 4, 2014 23:55 IST

अधिकारी निवडणुकीत : सत्ताधारी प्रचारात

सांगली : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त अ‍ॅडव्हान्स (उचल) दिली जाते. पण यंदा पालिकेची आर्थिक स्थिती पाहता कर्मचाऱ्यांच्या उचलीचे वांदे निर्माण होणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत, तिथे उचल कशी मिळणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यात वरिष्ठ अधिकारी निवडणूक कामात मग्न आहेत. तर सत्ताधारी व विरोधक आपआपल्या उमेदवारांच्या प्रचाराला लागले आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी अडीच हजार ते पाच हजार उचल दिली जाते. ही उचल नंतर त्यांच्या वेतनातून कपात होते. दरवर्षी सुमारे ८० लाख रुपयांची उचल होते. यंदा मात्र महापालिकेवरच आर्थिक सावटाचे ढग दाटले आहेत. गेल्या दीड वर्षापासून जमा-खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. एलबीटीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. जकातीवेळी आठ ते नऊ कोटी रुपये दरमहा तिजोरीत जमा होत होते. पण एलबीटीत चार ते पाच कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळालेले नाही. त्यात अन्य स्त्रोतातूनही उत्पन्न घटले आहेत. घरपट्टी, पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. विकासकामांसाठी पैसाच हाती नाही. त्यात ठेकेदारांचे २० कोटी थकित आहेत. कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यात वेळेवर पगार मिळू शकलेला नाही. महिन्याअखेरीस कुठे चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत आहेत. तर त्यावरील श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पगारासाठी प्रतीक्षा करावी लागते. अशा स्थितीत यंदाही कर्मचाऱ्यांनी उचल देण्याची मागणी केली आहे. एकूणच आर्थिक स्थिती पाहता महापालिकेचे प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे कितपत लक्ष देईल, याबाबत साशंकता आहे. (प्रतिनिधी)