शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तासगावच्या समस्यांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

By admin | Updated: November 27, 2015 00:10 IST

भाजप सरकारवर हल्लाबोल : मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

तासगाव : तासगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करुन तातडीने पाणी सोडावे, यासह अन्य मागण्यांसाठी तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुरुवारी रस्त्यावर उतरले. आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत, भाजप सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला. मोर्चात तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.तासगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, दुष्काळाच्या सवलती त्वरित उपलब्ध करुन द्याव्यात, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावीत, ताकारी, म्हैसाळ, आरफळ, टेंभू, विसापूर, पुणदी आणि गव्हाण उपसा सिंचन योजनांची बिले टंचाई निधीतून भरुन, या योजना तात्काळ सुरु कराव्यात, शेतकऱ्यांची सर्व वीज बिले आणि कर माफ करावा, विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, बसचा मोफत पास द्यावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात, पिण्याच्या पाणी योजनांची वीज बिले माफ करावीत. ज्येष्ठ शेतकऱ्यांना मासिक पेन्शन योजना सुरु करावी, दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याची नुकसानभरपाई द्यावी, घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, सौरऊर्जेवर शेती पंपास अनुदान द्यावे, तालुक्यातील बेकायदा धंदे बंद करावेत, वृध्द कलाकारांना पेन्शन सुरु करावी, स्वस्त धान्य दुकानातील धान्य पुरवठा सुरळीत करावा, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. गुरुवारी साडेअकरा वाजता मार्केट यार्डपासून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक चौकातून गणपती मंदिरापासून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना स्मिता पाटील म्हणाल्या, यापूर्वी आबांवर आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी कोणाच्या बापाकडून नव्हे, तर शासनाकडून निधी आणून पाणी योजना सुरु कराव्यात. दहा वर्षे आमदार असतानाही ज्यांना पाया भक्कम करता आला नाही, त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत गावा-गावात फिरण्याची वेळ आली. मुख्यमंत्री तालुक्यात येऊन गेले, मात्र त्यांनी विकासासाठी काहीच निधी दिला नाही. शेतकऱ्यांचे जगणे महाग आणि मरण स्वस्त झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आबांचे कुटुंबीय शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बेमुदत उपोषण करेल. बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील म्हणाले, भाजप सरकारने अच्छे दिनचे गाजर दाखवले. प्रत्यक्षात मात्र लोकांना बुरे दिनचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जुने दिवसच चांगले म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्यात यावर्षी द्राक्षाचे पीक चांगले आहे. हे पीक हाताशी आले तर शेतकरी कर्जमुक्तही होईल. मात्र त्यासाठी तालुक्यातील पाणी योजना कार्यान्वित व्हायला हव्यात. मात्र तालुक्यातील भाजपच्या नेत्यांना निधी खर्च करण्यात पूर्ण अपयश आले आहे. भाजपच्या नेत्यांकडून निधीबाबत केवळ घोषणा केल्या आहेत. खासदारांनी निधी खर्च करून दाखवावा. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपला हद्दपार करायला हवे. त्यासाठी आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आवाज उठवला जाईल.मागण्यांचे निवदेन आमदार सुमनताई पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसीलदार सुधाकर भोसले यांच्याकडे दिले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, पंचायत समितीचे सभापती सुनीता पाटील, संभाजी पाटील, गजानन खुजट, एम. बी. पवार, शंकरदादा पाटील, ताजुद्दीन तांबोळी, राहुल कांबळे, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)पहिलाच मोर्चा : राष्ट्रवादी रस्त्यावरराष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून मागील वर्षापर्यंत हा पक्ष आणि पर्यायाने तालुक्यातील राष्ट्रवादीचे कारभारी सत्ताधारी पक्षात होते. मात्र आता विरोधी पक्षात असल्याने जनतेच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादीने काढलेला तालुक्यातील हा पहिलाचा मोर्चा ठरला. आबांच्या पश्चात हा मोर्चा यशस्वी ठरणार का? याबाबत उत्सुकता होती. चिंंचणीत लाखाचा मटका भाजप सरकारच्या काळात तालुक्यात अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. शेतकरी, रोजगारी लोक मटक्याच्या नादी लागल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, असा आरोप बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी केला. माझ्या स्वत:च्या चिंचणी गावात रोज एक लाख रुपयांचा मटका घेतला जात असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची टीकाही पाटील यांनी केली.राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींची, नाराजांची दांडी राष्ट्रवादीच्या गुरुवारी झालेल्या मोर्चात अपवाद वगळता जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्यांनी दांडी मारली होती, तर राष्ट्रवादीत नाराज असलेल्या सुनील पाटील, वसंत सावंत, किशोर उनउने यांनीही या मोर्चाकडे पाठ फिरवली होती.