शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात राष्ट्रवादी मौनात की कोमात?

By admin | Updated: October 15, 2015 00:35 IST

नगरसेवकांची सोडचिठ्ठी : नेत्यांची हतबलता

दत्ता पाटील--तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करुन पक्षाला धक्का दिला आहे. एकेकाळी पालिकेत बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीचे, आता अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे. शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असतानादेखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मौन सोडलेले नाही. भाजपचे कमळ हातात धरणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा बडगाही उगारलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी मौनात आहे की कोमात, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील आबा आणि खा. संजयकाका पाटील यांच्या गटाने एकत्रितपणे तासगाव नगरपालिकेची गतवेळची निवडणूक लढवली होती. त्यात आबा गटाचे वर्चस्व होते. दोन्ही नेते एकत्र असतानादेखील कार्यकर्त्यांत कुरघोडीचे राजकारण सुरूच होते. किंंबहुना खासदार संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही गटांतील कुरघोड्या वाढल्या. दरम्यान, आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची अवस्था, वर्चस्व असूनदेखील आत्मविश्वास गमावल्यासारखी झाली होती. नगरसेवकांतील वैयक्तिक हेवेदावे आणि अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत खा. संजयकाका पाटील यांनी नाराज नगरसेवकांना गळ लावला. तीन नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देत, त्यापैकी एकाला नगराध्यक्षपदही बहाल केले. पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर राजकीय स्थित्यंतर थांबेल, असे वाटत असतानाच, राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. आयेशा नदाफ यांचे नगरसेवकपद रद्द होऊ नये, यासाठी खासदार संजयकाकांनी खेळी केली. त्यानंतर डॉ. नदाफ यांनीही खासदारांचे नेतृत्व मान्य केले. नगराध्यक्ष बदलासाठी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी राष्ट्रवादीत राहूनच भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्यापैकी नगरसेवक जाफर मुजावर यांनाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपवासी केले. आबांच्या पश्चात पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत असताना, पक्षातील नेते मात्र मौन धारण करुन आहेत. पक्षाला अस्तित्व शोधण्याची वेळ आली असताना, नेत्यांचे मौन का, असा सवाल सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत. कवठेमहांकाळ पंचायत समितीत पक्ष सोडणाऱ्या सदस्यांना सदस्यत्व रद्दचा इशारा पक्षाकडून देण्यात आला. मात्र तासगाव पालिकेत भाजपचे कमळ हातात धरणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी नेते हतबल झाले आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीसोबतचनगरसेवकांनी वैयक्तिक स्वार्थापोटीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. स्वार्थीनी पक्ष सोडल्यामुळे यापुढे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. आ. सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व दाखवून देणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कमलेश तांबवेकर आणि स्वप्नील जाधव यांनी सांगितले.लक्ष कोण घालणार? काही महिन्यांपूर्वी तासगाव-कवठेमहांकाळमध्ये दुसऱ्या नेतृत्वाला लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचे वक्तव्य पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. आता कवठेमहांकाळ पंचायत समिती आणि तासगाव नगरपालिका दोन्हीकडे भाजपने धक्का दिला आहे. आता तरी राष्ट्रवादीचे नेते लक्ष घालणार का, याची चर्चा आहे.