शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

‘स्वाभिमानी’चा टक्का राष्ट्रवादी कॉँग्रेसमुळे घसरला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:06 AM

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या ताकदीवर राजकीय पटलावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शेतकऱ्यांच्या ताकदीवर राजकीय पटलावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी काँग्रेस आघाडीमध्ये सहभागी झाले. मात्र लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातील वाळवा आणि शिराळा तालुक्यांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्या सलगीमुळे स्वाभिमानीचा टक्का घसरल्याची चर्चा आहे. शेट्टी यांच्याविरोधात सक्रिय असलेली रयत क्रांती संघटनाही लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेली आहे.२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या महाआघाडीत सामील होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान दिले होते. त्यानंतर खोत यांना कृषी राज्यमंत्रीपद मिळाले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली. दोघांमधील मतभेद वाढतच गेले. जिल्हा परिषद निवडणुकीत तर या दोघांमध्ये मोठी दरी पडली. यातून खोत यांनी भाजपची शाल पांघरून नव्या रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार शेट्टी हे खोत आणि भाजप सरकारवरील नाराजीतून काँगे्रस महाआघाडीमध्ये सामील झाले. महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेट्टी यांनी निवडणूक लढवली. परंतु हे अनेक शेतकऱ्यांना रूचले नाही. यांनी त्यातल्या त्यात आमदार जयंत पाटील यांच्याशी केलेल्या सलगीवरही सर्वसामान्य शेतकरी संतप्त प्रतिक्रिया देत होते. आता या परिसरातील मतदानाचा टक्का घसरला आहेच आणि याचा थेट फटका ‘स्वाभिमानी’ला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.प्रारंभीच्या टप्प्यात शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजकीय नांगरट केली होती. परंतु भाजप आणि शिवसेनेची युती झाली. जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या धैर्यशील माने यांना शेट्टींविरोधात उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून रयत क्रांती संघटनेच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला. संपूर्ण निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी सदाभाऊ खोत राज्यभर फिरले. मात्र त्यांची वाळव्यातील रयत क्रांती संघटना बॅफूटवरच गेली.