शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले; मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची टीका

By संतोष भिसे | Updated: March 12, 2023 17:44 IST

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले असल्याची टीका मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी केली.

सांगली : भारताला महासत्ता बनविण्यात मुस्लिमांनी बहुमोल योगदान दिले आहे. पण सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मुस्लिमांवरील अन्यायात वाढ झाल्याची टीका मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी केली. सांगलीत जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजणारे विरोधी पक्षही कोणताही विरोध न करता मुस्लिमांवरील अन्यायाचा तमाशा बघत असून एकप्रकारे साथच देत आहेत असे ते म्हणाले.

पदाधिकारी यांना मरगळ झटकून समाजाच्या विकासाचे व्रत घेऊन कार्यरत होण्याचा सल्ला इकबाल अन्सारी यांनी दिला. ते म्हणाले, धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिमांना आपली बटीक गृहीत धरले आहे. मुस्लिमांवरील अन्यायाला मूक संमती देत आहेत. त्यामुळे संघटनेची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. जातीयवादी पक्ष तसेच धर्मनिरपेक्षतेच्या आडून मुस्लिमांवर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. राज्य अध्यक्ष सादिक शेख म्हणाले, समाजात व संघटनेत एकजूट असेल, तर संघटना सक्षम बनते. यावेळी अमीन शेख यांनीही भूमिका मांडली. सूत्रसंचालन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जहांगीर हजरत यांनी केले. एम. एस. गवंडी, नासीर शरीकमसलत, अयुब बारगीर, शाहीन मुल्ला यांनीही मार्गदर्शन केले. संयोजन कबीर मुजावर, शहानवाज मुल्ला आदींनी केले. 

 

टॅग्स :SangliसांगलीOBCअन्य मागासवर्गीय जातीMuslimमुस्लीम