शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

७६ वर्ष नणंद-भावजय राहिलेल्या मैत्रिणींचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST

कोकरुड : असे म्हटले जाते की, दहा पुरुष एकत्र राहू शकतात. मात्र दोन महिला एकत्र राहू शकत नाहीत, अगदी ...

कोकरुड : असे म्हटले जाते की, दहा पुरुष एकत्र राहू शकतात. मात्र दोन महिला एकत्र राहू शकत नाहीत, अगदी त्या सख्ख्या बहिणी असल्या तरी. मात्र सय्यदवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील ७६ वर्षांपेक्षा जास्त काळ मैत्रिणीसारख्या राहणाऱ्या नणंद-भावजयीचे अडीच महिन्यांच्या अंतरात निधन झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पुतळाबाई ज्ञानदेव पाटील व सखुबाई खाशाबा खाेचरे या त्या जीवश्च-कंठश्च मैत्रिणी राहिलेल्या नणंद-भावजयी.

सय्यदवाडी येथील विठ्ठल ज्ञानदेव पाटील यांच्या पोटी ९० वर्षांपूर्वी ज्ञानदेव आणि ८७ वर्षांपूर्वी सखुबाई ही अपत्ये जन्माला आली. विठ्ठल पाटील यांनी ज्ञानदेव यांचे लग्न हत्तेगाव येथील पुतळाबाई यांच्याशी लावले तर सखुबाई यांचा विवाह जिंती (ता. कऱ्हाड) येथील खाशाबा खोचरे यांच्याशी झाला होता. मात्र, एक-दीड वर्षात पतीचे निधन झाल्याने सखुबाई माहेरी आल्या. त्याकाळी दुसऱ्या लग्नाची प्रथा नव्हती. सखुबाई वडिलांच्या घरीच राहू लागल्या. घरी आई-वडील, भाऊ, भावाची बायको, तीन मुले होती. मात्र भावजय पुतळाबाई हिने विधवा असलेल्या नणंद सखुबाई हिच्याबरोबर जमवून घेतले. दाेघी केवळ नणंद-भावजय असे नाते न राखता मैत्रिणी म्हणून राहू लागल्या. एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल ७६ वर्ष एकत्र राहत दाेघीही एकमेकींची सुख-दुःखे वाटून घेत राहिल्या. जून महिन्यात पुतळाबाई किरकोळ आजारी पडल्या. यावेळी सखुबाई हादरल्या. ‘हिचे काय झाले तर माझे कसे होणार’ या काळजीने त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. त्याला अडीच महिने हाेत असताना रविवार, १५ ऑगस्टला पुतळाबाई यांचेही निधन झाले. गेली ७६ वर्ष मैत्रिणींप्रमाणे राहिलेल्या या नणंद-भावजयीच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

चाैकट

नात्याचे आदर्श उदाहरण

अनेकदा परिसरातील अनेक घरांत नणंद-भावजयीचे भांडण-तंटे व्हायचे. त्यावेळी नणंद-भावजय यांचे नाते कसे असावे, याचे आदर्श उदाहरण म्हणून पुतळाबाई आणि सखुबाई यांचे नाव वडीलधारी माणसे घेत असत.