शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

‘टेंभू’ला आता नाबार्डचे अर्थसाहाय्य

By admin | Updated: June 8, 2017 23:23 IST

‘टेंभू’ला आता नाबार्डचे अर्थसाहाय्य

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : दुष्काळाने होरपळणाऱ्या वंचित लाभक्षेत्राला टेंभू योजनेच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. नाबार्डकडून अवर्षणप्रवण क्षेत्रामधील टेंभू योजनेला दोन वर्षाकरिता दोनशे कोटीचा निधी आता मिळाला आहे. नाबार्डचे अर्थसाहाय्य घेऊन टेंभू योजना आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करणार आहे.मागीलवर्षी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन कार्यक्रमात ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्या योजनांच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे टेंभू योजनेचाही पंतप्रधान कृषी सिंचन प्रकल्प कार्यक्रमात समावेश झाला असता, तर या योजनेला राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीचा ‘बुस्टर डोस’ मिळाला असता. परंतु तांत्रिक कारणामुळे टेंभू योजनेचा समावेश झाला नाही. आता नाबार्डचे अर्थसाहाय्य हाच योजनेच्या पूर्णत्वाचा एकमेव मार्ग आहे. आता प्राप्त झालेल्या निधीमधून टप्पा क्रमांक ४ व ५ कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे. टेंभूसह ताकारी व म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण असल्यामुळे कृष्णा खोरेच्या वाट्याचे पाणी कर्नाटक व आंध्रमध्ये जात आहे. हे पाणी सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागात आणले पाहिजे. नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याने सिंचनासाठी २५ हजार कोटींची तरतूद केली आहे, पण प्रगत महाराष्ट्रात मात्र सिंचनासाठी निधीची तरतूद तुटपुंजी ठरत आहे. दोन राज्यांमधील हा तुलनात्मक फरक योजनांच्या वास्तवाचेही दर्शन घडविणारा ठरत आहे. अपूर्ण असलेली कामे पूर्ण करून वंचित दुष्काळग्रस्त लाभक्षेत्राची तहान भागविण्याचे मोठे आव्हान राज्यकर्त्यांसमोर आहे. १ फेब्रुवारी १९९६ रोजी मान्यतेवेळी १,४१६ कोटींचा खर्च असलेल्या या योजनेचा २००४ मध्ये २,१०६ कोटी रुपये खर्चाचा पहिला सुधारित प्रशासकीय अहवाल मंजूर झाला. त्यानंतर मागील वर्षी ३,८८० कोटी रुपये खर्चाचा दुसरा सुधारित प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. या अहवालात राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून प्रचलित दरसूचीनुसार अहवाल सादर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. आता या दुरुस्त्या करून ४ हजार ८१५ कोटींचा दुसरा सुधारित प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी शासनाकडे सादर होणार आहे. त्याची छाननी राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून सुरू असून समितीने उपस्थित केलेल्या शेऱ्यांची पूर्तता करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर प्रगतीपथावर आहे.२१० गावांचा प्रश्न कायमचा सुटणार यापुढे कालव्यांऐवजी बंदिस्त जलवाहिन्यांमधून पाणी नेणार, टेंभू प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक वीज निर्मिती सौरऊर्जेवर करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र यासाठी भरीव निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. टेंभू योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सांगली जिल्ह्यात कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील २१० गावांचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. तासगाव तालुक्यातील विसापूर-पुणदी योजनेद्वारे अग्रणी नदीत पाणी नेऊन सोडणे, कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव वितरिका पूर्ण करणे, नागज, आरेवाडी, तसेच नांगोळे तलावातून पाणी पुढे घेऊन जाणे, ही कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी कोकळे हद्दीपर्यंत पुढे जाणार आहे.पोटकालव्यांची कामे पूर्ण होणे गरजेचेसध्याच्या नियोजनानुसार केवळ ओढ्यांनी पाणी येऊन उपयोगाचे नाही. पोटकालव्यांची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. याशिवाय ठिबक सिंचन पद्धती अवलंबावी लागणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल आणि शेतकऱ्यांवरील पाणीपट्टीचा व वीज बिलाचा भुर्दंड कमी होईल.या योजनेअंतर्गत एकूण ३५० किलोमीटरचे कालवे आहेत. त्यापैकी २०८ किलोमीटर कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित लाभक्षेत्र मात्र अद्याप या योजनेच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. ही कामे नाबार्डच्या अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून पूर्ण होण्यास मदत होणार आहेत.