शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

‘टेंभू’ला आता नाबार्डचे अर्थसाहाय्य

By admin | Updated: June 8, 2017 23:23 IST

‘टेंभू’ला आता नाबार्डचे अर्थसाहाय्य

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : दुष्काळाने होरपळणाऱ्या वंचित लाभक्षेत्राला टेंभू योजनेच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. नाबार्डकडून अवर्षणप्रवण क्षेत्रामधील टेंभू योजनेला दोन वर्षाकरिता दोनशे कोटीचा निधी आता मिळाला आहे. नाबार्डचे अर्थसाहाय्य घेऊन टेंभू योजना आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करणार आहे.मागीलवर्षी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन कार्यक्रमात ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्या योजनांच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे टेंभू योजनेचाही पंतप्रधान कृषी सिंचन प्रकल्प कार्यक्रमात समावेश झाला असता, तर या योजनेला राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीचा ‘बुस्टर डोस’ मिळाला असता. परंतु तांत्रिक कारणामुळे टेंभू योजनेचा समावेश झाला नाही. आता नाबार्डचे अर्थसाहाय्य हाच योजनेच्या पूर्णत्वाचा एकमेव मार्ग आहे. आता प्राप्त झालेल्या निधीमधून टप्पा क्रमांक ४ व ५ कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे. टेंभूसह ताकारी व म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण असल्यामुळे कृष्णा खोरेच्या वाट्याचे पाणी कर्नाटक व आंध्रमध्ये जात आहे. हे पाणी सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागात आणले पाहिजे. नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याने सिंचनासाठी २५ हजार कोटींची तरतूद केली आहे, पण प्रगत महाराष्ट्रात मात्र सिंचनासाठी निधीची तरतूद तुटपुंजी ठरत आहे. दोन राज्यांमधील हा तुलनात्मक फरक योजनांच्या वास्तवाचेही दर्शन घडविणारा ठरत आहे. अपूर्ण असलेली कामे पूर्ण करून वंचित दुष्काळग्रस्त लाभक्षेत्राची तहान भागविण्याचे मोठे आव्हान राज्यकर्त्यांसमोर आहे. १ फेब्रुवारी १९९६ रोजी मान्यतेवेळी १,४१६ कोटींचा खर्च असलेल्या या योजनेचा २००४ मध्ये २,१०६ कोटी रुपये खर्चाचा पहिला सुधारित प्रशासकीय अहवाल मंजूर झाला. त्यानंतर मागील वर्षी ३,८८० कोटी रुपये खर्चाचा दुसरा सुधारित प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. या अहवालात राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून प्रचलित दरसूचीनुसार अहवाल सादर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. आता या दुरुस्त्या करून ४ हजार ८१५ कोटींचा दुसरा सुधारित प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी शासनाकडे सादर होणार आहे. त्याची छाननी राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून सुरू असून समितीने उपस्थित केलेल्या शेऱ्यांची पूर्तता करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर प्रगतीपथावर आहे.२१० गावांचा प्रश्न कायमचा सुटणार यापुढे कालव्यांऐवजी बंदिस्त जलवाहिन्यांमधून पाणी नेणार, टेंभू प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक वीज निर्मिती सौरऊर्जेवर करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र यासाठी भरीव निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. टेंभू योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सांगली जिल्ह्यात कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील २१० गावांचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. तासगाव तालुक्यातील विसापूर-पुणदी योजनेद्वारे अग्रणी नदीत पाणी नेऊन सोडणे, कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव वितरिका पूर्ण करणे, नागज, आरेवाडी, तसेच नांगोळे तलावातून पाणी पुढे घेऊन जाणे, ही कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी कोकळे हद्दीपर्यंत पुढे जाणार आहे.पोटकालव्यांची कामे पूर्ण होणे गरजेचेसध्याच्या नियोजनानुसार केवळ ओढ्यांनी पाणी येऊन उपयोगाचे नाही. पोटकालव्यांची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. याशिवाय ठिबक सिंचन पद्धती अवलंबावी लागणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल आणि शेतकऱ्यांवरील पाणीपट्टीचा व वीज बिलाचा भुर्दंड कमी होईल.या योजनेअंतर्गत एकूण ३५० किलोमीटरचे कालवे आहेत. त्यापैकी २०८ किलोमीटर कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित लाभक्षेत्र मात्र अद्याप या योजनेच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. ही कामे नाबार्डच्या अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून पूर्ण होण्यास मदत होणार आहेत.