शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

जतचे नगरसेवक कदम गटाकडे

By admin | Updated: November 9, 2016 00:59 IST

विधानपरिषद : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षासह १४ जणांचा पाठिंबा

पत्रपरिषदेत दिली माहिती : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीला पाकिस्तानात समारोपवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीला २ आॅक्टोबर २०१८ रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहे. या १५० व्या जयंतीनिमित्त गांधी विचारांचा प्रचार व्हावा, यासाठी वर्धेतील ज्ञानेश्वर येवतकर व पुणे येथील नितीन सोनवणे हे दोघे ‘विश्व मैत्री सायकल यात्रा’ करणार आहेत. १०९५ दिवसांची ही यात्रा १८ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी १० वाजता सेवाग्राम आश्रम येथून निघून पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरात तिचा समारोप होणार असल्याची माहिती येवतकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती संपूर्ण जगात ‘विश्व महोत्सव’ म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यामुळे त्यांचा अहिंसा, शांती, मैत्री आणि प्रेम हा संदेश जगभर साजरा करण्यात यावा याकरिता ही सायकल यात्रा असल्याचेही ते येवतकर म्हणाले. यात्रेकरिता लागणारी रक्कम लोकसहभागातून उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याकरिता वर्धेच्या जनजागृती मंचाच्यावतीने काही मदत करण्यात आल्याचे यावेळी येवतकर म्हणाले. या प्रयोतून विश्व शांतीसाठी बलिदान देणाऱ्या सर्वच हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रा. अमोल गाढवकर यांची उपस्थिती होती. त्यांनीही आयोजनासंदर्भात माहिती दिली.(प्रतिनिधी) ७५ हजार किलोमीटरचा प्रवास हा सायकल प्रवास ७५ हजार किलोमिटर असून ‘१०९५’ दिवसांचा आहे. हे दोन्ही सायकल यात्री जगभरात २६६ ठिकाणी मुक्काम करणार आहेत. प्रवासादरम्यान शांती, अहिंसेच्या मार्गाने काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गाव, शहर, संघटना तसेच शाळा, विद्यापीठांना भेटी देणार आहेत. विश्व मैत्री यात्रेचा मार्ग ही विश्व मैत्री यात्रा सेवाग्राम आश्रमातून सुरू होऊन मुंबईला जाईल. येथून विमानमार्गाने मणिपूरच्या इम्फालमध्ये दाखल होईल. येथून इम्फाल ते बर्मा लाओस मार्गे व्हियतनाम दाखल. पूढे कंबोडिया, थाइलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बाली, फिलीपेंस, तैवान, चीन, दक्षिण व उत्तर कोरिया मार्गे जपानमध्ये पोहोचणार आहे. जपानहून हवाई मार्गाने अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को या शहरात पोहोचणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा तेथून प्रारंभ होईल. त्यामध्ये मेक्सिको, दक्षिण अमेरिका, वाशिंग्टन, न्यूयॉर्क, कॅनडा, लंडन, आयर्लंड, इंग्लंड, डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, रशिया मार्गे युरोपीयन देशात पोहोचणार आहे. पुढच्या प्रवासात संपूर्ण युरोपीयन देश भ्रमण करून आफ्रिकन देशात प्रवेश करणार आहे. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा टप्पा इजिप्त मार्गाने मध्य आशियाच्या जॉर्डन, इडोल, कुवेत, इराण, इराक, अफगाणिस्तान मार्गे पाकिस्तान मधील इस्लामाबाद शहरात ‘२ आॅक्टोबर २०१९’ रोजी विश्व मैत्री यात्रा समाप्त करण्यात येईल.विविध सामाजिक संघटनांकडे सहकार्य या सायकल यात्रेसाठी एकूण ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी लोकसहभागातून उभा करण्यात येणार आहे. याकरिता अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये गांधी सर्व्हे सुलभ, गांधी स्मारक निधी पुणे, अखिल भारतीय सर्वोदय समाज, भूदान मंडळ, वैद्यकीय जनजागृती मंच या संघटनांचा समावेश आहे. काही विदेशी संस्थांनी त्यांच्या शहरातील यात्रेला येणारा खर्च उचलला आहे.