शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

महापालिका आयुक्त म्हणतात... माझी बदली करा !

By admin | Updated: May 27, 2015 00:58 IST

नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी वाद : एलबीटीची वसुली थंडावल्याने पगार, खर्च भागविणे जिकिरीचे

सांगली : महापालिकेचे आयुक्त अजिज कारचे सातत्याने बदलीचा इशारा देत आहेत. नगरसेवक, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी त्यांच्याकडे समस्या, तक्रारी घेऊन गेले की, ‘मला येथून घालवा’, अशी एकच मागणी ते करीत असतात. या प्रकारातून मंगळवारी नगरसेवक गौतम पवार व कारचे यांच्यात जोरदार वादावादी झाली. पालिकेचा आर्थिक गाडा रुतला असून हरित न्यायालयाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा प्रमुख असलेला कर्णधारच गलितगात्र होत असल्याने नगरसेवकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. एलबीटीची वसुली थंडावल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, दैनंदिन खर्च भागविणेही जिकिरीचे झाले आहे. त्यातच नगरसेवकांकडून विकास कामांसाठी प्रशासनावर दबाव वाढला आहे. आयुक्त कारचे यांनी विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. तातडीच्या कामांना प्राधान्य देताना, कमी महत्त्वाच्या कामांच्या फायली त्यांनी थांबविल्या आहेत. यातूनच नगरसेवकांत समज-गैरसमज पसरू लागले आहेत. नगररचना विभागाकडील फायलींचा तत्परतेने होणार निपटारा या साऱ्या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर नगरसेवकांना संशय आहे. या प्रकारातून आयुक्त व नगरसेवकांत वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत. मंगळवारी स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक गौतम पवार, बाळू गोंधळी यांनी आयुक्तांना विकास कामांचा जाब विचारला. गोंधळी यांच्या प्रभागातील दोन कामांच्या फायली आयुक्त कार्यालयाकडे पडून आहेत. त्याला मंजुरी मिळत नाही. इतर नगरसेवकांच्या फायली मात्र निकाली निघत आहेत, असा त्यांचा सूर होता. त्यातून वादावादीला सुरूवात झाली. पवार व कारचे दोघेही एकेरीपर्यंत पोहोचल्याची चर्चा पालिकेत होती. त्यावर वैतागलेल्या आयुक्तांनी ‘आता बदली करून जातो’, असा सूर आळवला. गौतम पवार यांनीही ‘बदलीसाठी शासनाकडे जा, आम्ही आयुक्तांच्या खुर्चीला महत्त्व देतो, तेथे कोण बसले आहे, हे पाहत नाही’, असा संताप व्यक्त केला. आयुक्तांनी ‘माझी बदली करा, केवळ मलाच टार्गेट केले जाते’, असे म्हणताच पवार यांनी, ‘टार्गेट काय असते ते माजी जिल्हाधिकाऱ्यांना विचारा’, असा टोला लगावला. (प्रतिनिधी)चाळीस कोटी भरण्याचे आव्हानहरित न्यायालयाने ४० कोटी रुपये भरण्याचे निर्देश दिले आहेत. पण तिजोरीत खडखडाट असताना निधीच्या उभारणीचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ड्रेनेजच्या ठेकेदाराला अदा केलेली बिले, नगररचना विभागाकडील फायलींचा तत्परतेने होणार निपटारा या साऱ्या प्रकारांमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर नगरसेवकांना संशय आहे.