सांगली : शासनाने जाहीर केलेल्या कृषी धोरणा अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील २८५ महिला शेतकऱ्यांनी २६ कोटी ८० लाख रुपयांची शेती पंपांची वीजबिल थकबाकी भरली आहे, शिवाय ४ कोटी ७५ लाख रुपयांचे नियमित वीजबिल भरले आहे. महावितरणतर्फे सध्या सुरु असणाऱ्या कृषी पर्वादरम्यान जागतिक महिला दिनी या महिला शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.
कृषी धोरणा अंतर्गत शेती पंपाची ५० टक्के थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. सांगली, कोल्हापुरात २८५ महिला शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात २२७ महिलांनी २० कोटी ११ लाख रुपये थकबाकी भरली. ३ कोटी ५३ लाखांचे नियमित बिल भरले. सांगली जिल्ह्यात ५८ महिलांनी ६ कोटी ६९ लाखांची थकबाकी व १ कोटी २२ लाखांचे नियमित बिल भरले. या महिलांचा सत्कार १४ एप्रिलपर्यंतच्या कृृषी पर्वात केला जाणार असल्याने महावितरणकडून सांगण्यात आले.
सध्या कृषी पर्वाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरात नव्या कृषी जोडण्या, तक्रारींचे निराकरण, वसुली आदी उपक्रम सुरु आहेत. कृषी पंपाच्या वीज पुरवठ्यासाठी कोटेशन देणे, प्रत्यक्ष जोडण्या देणे ही कामेही सुरु आहेत.