शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महावितरणद्वारे १ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान राज्यात 'कृषी ऊर्जा पर्व'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 13:50 IST

agriculral pump sangli- शेतकऱ्यांना अधिक चांगल्या वीजपुरवठ्यासाठी शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण जाहीर केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणद्वारे १ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान कृषी ऊर्जा पर्व राबविले जाणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणद्वारे १ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान राज्यात 'कृषी ऊर्जा पर्व'शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण

सांगली : शेतकऱ्यांना अधिक चांगल्या वीजपुरवठ्यासाठी शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण जाहीर केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणद्वारे १ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान कृषी ऊर्जा पर्व राबविले जाणार आहे.शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी, दिवसा ८ तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, थकबाकीत सूट, कृषी वीजपुरवठ्यामध्ये ग्रामपंचायती व साखर कारखान्यांचा सहभाग, पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सोमवारी (दि. १) होईल. या मोहिमेअंतर्गत तालुका स्तरावर व मोठ्या गावांमध्ये कृषी वीज ग्राहक मेळावे आयोजित केले जाणार आहेत. माझे वीजबिल, माझी जबाबदारी मोहिम सुरु केली जाणार आहे.

थकबाकीमुक्त ग्राहकांचा सत्कार, नवीन कृषी ग्राहकांना वीजजोडणी मंजुरीचे कोटेशन, वीजजोडणी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदांच्या समन्वयाने ग्रामसभा घेऊन कृषी वीज धोरणाची माहिती दिली जाणार आहे.महिला दिनाचे औचित्य साधून थकबाकी भरणाऱ्या महिलांचा ८ मार्चला सत्कार, महिलांच्या नावे वीजजोडणीस प्राधान्य, थकबाकी वसुली करणाऱ्या महिला सरपंचांचा तसेच महिला जनमित्रांचा व ऊर्जामित्रांचा सत्कार केला जाणार आहे.

महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागातून अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, महिला बचत गटांचे प्रबोधन केले जाणार आहे. होर्डिंग, पोस्टर, बॅनर, बस थांब्यांवर जिंगल, गावात दवंडीद्वारे मोहिम सामान्यांपर्यंत पोहोचविली जाईल.ग्राहक संपर्क अभियानात थकबाकीदार शेतकर्यांना एसएमएस व सोशल मीडियाद्वारे माहिती दिली जाईल. शेतकर्यांच्या वीजबिलविषयक तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरणजिल्हा, तालुका, गाव पातळीवर सायकल रॅली, शासकीय कर्मचाऱ्यांचे तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण, एक दिवस देश रक्षकांना, थकबाकीमुक्त गावांचा व शेतकऱ्यांचा सन्मान, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, वीज सुरक्षा व कॅपॅसिटरचे महत्त्व, शेतकऱ्यांचा पैसा त्यांच्याच सुविधांसाठी, वासुदेव, पथनाट्ये, दूरचित्रवाणी व रेडिओ मुलाखती आदी उपक्रमांसह दिड महिना मोहिम चालेल. त्याद्वारे शेतकर्यांना बिल भरण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली