शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याच्या हालचाली, मग महाविद्यालये कधी उघडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेले दीड वर्ष सक्तीची कोरोना सुट्टी अनुभवणाऱ्या विद्यार्थी व पालकांतून आता ...

संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेले दीड वर्ष सक्तीची कोरोना सुट्टी अनुभवणाऱ्या विद्यार्थी व पालकांतून आता शाळा सुरू करण्यासाठी दबाव वाढत आहे. दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत, मग महाविद्यालये कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे न भरून येण्यासारखे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ते परिपूर्ण नाही. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता टिकून राहणार काय, याविषयी पालक, शिक्षक शंका व्यक्त करत आहेत. शासनाने दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी पालकांच्या भूमिका जाणून घेतल्या. ८० टक्क्यांहून अधिक पालकांनी शाळा सुरू करण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन शाळा सुरू होणार आहेत. या स्थितीत महाविद्यालये का बंद ठेवली जाताहेत, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

बॉक्स

निकालाचा गोंधळही कायम

दहावी आणि बारावीचा निकालही अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालये सुरू झाली तरी अकरावी आणि प्रथम वर्षाचे वर्ग रिकामेच राहणार आहेत. अभियांत्रिकी, आयटीआयची प्रवेश प्रक्रियादेखील पूर्ण झालेली नाही. या स्थितीत महाविद्यालये सुरू झाली तरी बारावीपासूनचेच वर्ग भरवावे लागतील. पण त्यामुळे शैक्षणिक प्रवाह सुरू होईल, अशी शिक्षक व पालकांना अपेक्षा आहे. लसीकरण झालेल्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल.

कोट

काळजी घेऊन शिक्षण सुरू करा

दीड वर्षांपासून प्रत्यक्ष शिक्षण बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचा पाया कच्चा राहण्याची भीती आहे. या स्थितीत कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन महाविद्यालये सुुरू करणे योग्य ठरेल. कोरोना कधी संपणार, याची कोणतीही निश्चिती नाही. त्याला सोबत घेऊनच जगायचे आहे, हे गृहीत धरावे लागेल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काटेकोर काळजी घेत वर्ग सुरू करण्याविषयी विचार व्हायला हवा.

- प्रा. सुनीता माळी, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.

कोरोनाची लाट ओसरत असली तरी महापालिका क्षेत्रात रुग्ण अद्याप सापडताहेत. त्यामुळे रुग्णसंख्या आणखी कमी होण्यासाठी प्रतीक्षा करावी. लाट ओसरल्याची खात्री होताच टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करावीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ही गंभीर बाब आहेच, पण त्यांची सुरक्षितता त्याहून महत्त्वाची आहे.

- प्रा. ईश्वराप्पा बिराजदार, वालनेसवाडी कनिष्ठ महाविद्यालय, वानलेसवाडी

कोट

बस झाली सुट्टी, आता वर्ग उघडा

दीड वर्षांच्या संघर्षानंतरही कोरोना पूर्णत: संपलेला नाही. या स्थितीत कोरोनाला घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. कोरोनाच्या भीतीने सारेच व्यवहार बंद ठेवणे योग्य नाही. ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षेविना उत्तीर्ण हे सर्वकाळ योग्य नाही. काळजी घेत वर्ग उघडले पाहिजेत.

- जयदीप पाटील, विद्यार्थी

ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्यातून गुणवत्ता वाढत नाही. सध्या १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण सुरू आहे. शासनाने त्यांना प्राधान्याने लस देऊन वर्ग सुरू करावेत. लस घेतलेल्यांना वर्गात प्रवेश द्यावा. दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची मर्यादा कमी करून जास्तीत जास्त लसीकरण करावे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे.

- विशाल जोशी, विद्यार्थी

जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये - ८६

कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी संख्या ६७,९७३