शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याच्या हालचाली, मग महाविद्यालये कधी उघडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेले दीड वर्ष सक्तीची कोरोना सुट्टी अनुभवणाऱ्या विद्यार्थी व पालकांतून आता ...

संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेले दीड वर्ष सक्तीची कोरोना सुट्टी अनुभवणाऱ्या विद्यार्थी व पालकांतून आता शाळा सुरू करण्यासाठी दबाव वाढत आहे. दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत, मग महाविद्यालये कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे न भरून येण्यासारखे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ते परिपूर्ण नाही. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता टिकून राहणार काय, याविषयी पालक, शिक्षक शंका व्यक्त करत आहेत. शासनाने दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी पालकांच्या भूमिका जाणून घेतल्या. ८० टक्क्यांहून अधिक पालकांनी शाळा सुरू करण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन शाळा सुरू होणार आहेत. या स्थितीत महाविद्यालये का बंद ठेवली जाताहेत, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

बॉक्स

निकालाचा गोंधळही कायम

दहावी आणि बारावीचा निकालही अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालये सुरू झाली तरी अकरावी आणि प्रथम वर्षाचे वर्ग रिकामेच राहणार आहेत. अभियांत्रिकी, आयटीआयची प्रवेश प्रक्रियादेखील पूर्ण झालेली नाही. या स्थितीत महाविद्यालये सुरू झाली तरी बारावीपासूनचेच वर्ग भरवावे लागतील. पण त्यामुळे शैक्षणिक प्रवाह सुरू होईल, अशी शिक्षक व पालकांना अपेक्षा आहे. लसीकरण झालेल्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल.

कोट

काळजी घेऊन शिक्षण सुरू करा

दीड वर्षांपासून प्रत्यक्ष शिक्षण बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचा पाया कच्चा राहण्याची भीती आहे. या स्थितीत कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन महाविद्यालये सुुरू करणे योग्य ठरेल. कोरोना कधी संपणार, याची कोणतीही निश्चिती नाही. त्याला सोबत घेऊनच जगायचे आहे, हे गृहीत धरावे लागेल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काटेकोर काळजी घेत वर्ग सुरू करण्याविषयी विचार व्हायला हवा.

- प्रा. सुनीता माळी, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.

कोरोनाची लाट ओसरत असली तरी महापालिका क्षेत्रात रुग्ण अद्याप सापडताहेत. त्यामुळे रुग्णसंख्या आणखी कमी होण्यासाठी प्रतीक्षा करावी. लाट ओसरल्याची खात्री होताच टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करावीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ही गंभीर बाब आहेच, पण त्यांची सुरक्षितता त्याहून महत्त्वाची आहे.

- प्रा. ईश्वराप्पा बिराजदार, वालनेसवाडी कनिष्ठ महाविद्यालय, वानलेसवाडी

कोट

बस झाली सुट्टी, आता वर्ग उघडा

दीड वर्षांच्या संघर्षानंतरही कोरोना पूर्णत: संपलेला नाही. या स्थितीत कोरोनाला घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. कोरोनाच्या भीतीने सारेच व्यवहार बंद ठेवणे योग्य नाही. ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षेविना उत्तीर्ण हे सर्वकाळ योग्य नाही. काळजी घेत वर्ग उघडले पाहिजेत.

- जयदीप पाटील, विद्यार्थी

ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्यातून गुणवत्ता वाढत नाही. सध्या १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण सुरू आहे. शासनाने त्यांना प्राधान्याने लस देऊन वर्ग सुरू करावेत. लस घेतलेल्यांना वर्गात प्रवेश द्यावा. दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची मर्यादा कमी करून जास्तीत जास्त लसीकरण करावे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे.

- विशाल जोशी, विद्यार्थी

जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये - ८६

कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी संख्या ६७,९७३