शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

शाळा सुरू करण्याच्या हालचाली, मग महाविद्यालये कधी उघडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेले दीड वर्ष सक्तीची कोरोना सुट्टी अनुभवणाऱ्या विद्यार्थी व पालकांतून आता ...

संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेले दीड वर्ष सक्तीची कोरोना सुट्टी अनुभवणाऱ्या विद्यार्थी व पालकांतून आता शाळा सुरू करण्यासाठी दबाव वाढत आहे. दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत, मग महाविद्यालये कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे न भरून येण्यासारखे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ते परिपूर्ण नाही. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता टिकून राहणार काय, याविषयी पालक, शिक्षक शंका व्यक्त करत आहेत. शासनाने दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी पालकांच्या भूमिका जाणून घेतल्या. ८० टक्क्यांहून अधिक पालकांनी शाळा सुरू करण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन शाळा सुरू होणार आहेत. या स्थितीत महाविद्यालये का बंद ठेवली जाताहेत, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

बॉक्स

निकालाचा गोंधळही कायम

दहावी आणि बारावीचा निकालही अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालये सुरू झाली तरी अकरावी आणि प्रथम वर्षाचे वर्ग रिकामेच राहणार आहेत. अभियांत्रिकी, आयटीआयची प्रवेश प्रक्रियादेखील पूर्ण झालेली नाही. या स्थितीत महाविद्यालये सुरू झाली तरी बारावीपासूनचेच वर्ग भरवावे लागतील. पण त्यामुळे शैक्षणिक प्रवाह सुरू होईल, अशी शिक्षक व पालकांना अपेक्षा आहे. लसीकरण झालेल्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल.

कोट

काळजी घेऊन शिक्षण सुरू करा

दीड वर्षांपासून प्रत्यक्ष शिक्षण बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचा पाया कच्चा राहण्याची भीती आहे. या स्थितीत कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन महाविद्यालये सुुरू करणे योग्य ठरेल. कोरोना कधी संपणार, याची कोणतीही निश्चिती नाही. त्याला सोबत घेऊनच जगायचे आहे, हे गृहीत धरावे लागेल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काटेकोर काळजी घेत वर्ग सुरू करण्याविषयी विचार व्हायला हवा.

- प्रा. सुनीता माळी, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.

कोरोनाची लाट ओसरत असली तरी महापालिका क्षेत्रात रुग्ण अद्याप सापडताहेत. त्यामुळे रुग्णसंख्या आणखी कमी होण्यासाठी प्रतीक्षा करावी. लाट ओसरल्याची खात्री होताच टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करावीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ही गंभीर बाब आहेच, पण त्यांची सुरक्षितता त्याहून महत्त्वाची आहे.

- प्रा. ईश्वराप्पा बिराजदार, वालनेसवाडी कनिष्ठ महाविद्यालय, वानलेसवाडी

कोट

बस झाली सुट्टी, आता वर्ग उघडा

दीड वर्षांच्या संघर्षानंतरही कोरोना पूर्णत: संपलेला नाही. या स्थितीत कोरोनाला घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. कोरोनाच्या भीतीने सारेच व्यवहार बंद ठेवणे योग्य नाही. ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षेविना उत्तीर्ण हे सर्वकाळ योग्य नाही. काळजी घेत वर्ग उघडले पाहिजेत.

- जयदीप पाटील, विद्यार्थी

ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्यातून गुणवत्ता वाढत नाही. सध्या १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण सुरू आहे. शासनाने त्यांना प्राधान्याने लस देऊन वर्ग सुरू करावेत. लस घेतलेल्यांना वर्गात प्रवेश द्यावा. दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची मर्यादा कमी करून जास्तीत जास्त लसीकरण करावे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे.

- विशाल जोशी, विद्यार्थी

जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये - ८६

कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी संख्या ६७,९७३