सागरेश्वर खिंडीत बिबट्याने प्रवाशांच्या मनात दहशत पसरवली आहे. वन विभाग व वन्यजीव या दोघांच्या हद्दीत बिबटयाचा वावर आहे, हे अनेकदा सिद्ध होऊन सुद्धा प्रशासन कठोर भूमिका घेण्यास विलंब करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. गेला महिनाभर बिबट्याने या परिसरात थैमान घातले असताना, कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.
सागरेश्वर घाटातून संतोष व राहुल हे रात्री साडेनऊ वाजता ताकारीहून देवराष्ट्रेकडे मोटरसायकलवरून येत होते. बिरोबा मंदिराजवळ मोटरसायकलसमोर अचानक बिबट्या आला. यामुळे दोघांचा थरकाप उडाला. बिबट्या तिथेच न थांबता त्यांच्या गाडीकडे चाल करून येऊ लागला. तो गाडीवर झेप घेणार, तोपर्यंत या दोघांनी गाडीचा हाॅर्न मोठ्याने वाजवत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या कालव्याने बिबट्याने अभयारण्याच्या दिशेने पळ काढला व या दोघांनी जिवाच्या आकांताने देवराष्ट्रेकडे गाडी पळवली.
चौकट
सागरेश्वर खिंडीत आता तिसऱ्यांदा बिबट्याने प्रवाशांना दर्शन दिले आहे. रात्री बिबट्याच्या हल्ल्यातून प्रवासी वाचले आहेत. हा रस्ता नेहमी रहदारीचा आहे. अशा परिस्थितीत सागरेश्वर खिंडीत सावधानतेचा सूचना फलक लावणे गरजेचे आहे.
फोटो-
१)११संतोष होनमाने,
२)११ राहुल होनमाने