शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे आत्तापर्यंत सोळा हजारांहून अधिक पंचनामे : जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 11:21 IST

Flood Sangli Collector : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 113 गावांमधील आतापर्यंत 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. बाधित गावातील कुंटुंबे, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

ठळक मुद्देमहापुरामुळे झालेल्या नुकसानीचे आत्तापर्यंत सोळा हजारांहून अधिक पंचनामे : जिल्हाधिकारी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी यंत्रणा गतिमान

सांगली : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 113 गावांमधील आतापर्यंत 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. बाधित गावातील कुंटुंबे, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे , ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यातील 113 गावे बाधित झाले आहेत. महापालिका क्षेत्र तसेच ग्रामीण क्षेत्रातील एकूण 45 हजार 352 कुटुंबे बाधित झाली आहेत.

शासन निर्देशानुसार बाधित गावातील कुटुंबे , कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत .यामध्ये आज अखेर 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

त्यामध्ये पूर्ण नष्ट झालेली कच्ची घरे 279, पक्की घरे 8, अशंत नष्ट झालेली कच्ची घरे 1 हजार 78, पक्की घरे 320, नुकसान झालेल्या झोपड्या 34 व गोठे 619 आहेत. अजूनही पंचनामे सुरू असून ते गतीने पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.आज अखेर मयत पशुधनापैकी 96 लहान, माठे जनावरे व 49508 पक्षांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तसेच आज अखेर 27 कारागीरांचे सहयंत्राचे, 39 कारागीरांच्यां कच्चा व तयार मालाचे व 2279 छोटे उद्योग, दुकाने, टपरीधारक, हातगाडीधारक इत्यादीचे पंचनामे नुसार नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या बाबींचे पंचनामेदेखील अजूनही सुरू आहेत.जिल्ह्यात महापूरामुळे 274 गावांतील 97 हजार 486 शेतकऱ्यांचे 40 हजार 671 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. आज अखेर 174 गावांतील 24 हजार 781 शेतकऱ्यांचे 8 हजार 508.72 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

  • मिरज तालुक्यातील 26 गावांतील 29 हजार 117 शेतकऱ्यांचे 10 हजार 340 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी 21 गावांतील 3 हजार 712 शेतकऱ्यांचे 1 हजार 728.64 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
  • वाळवा तालुक्यातील 98 गावांतील 31 हजार 245 शेतकऱ्यांचे 13 हजार 495 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी 41गावांतील 7 हजार 701 शेतकऱ्यांचे 2 हजार 697.60 हेक्टर पंचनामे पूर्ण झाले आहेत.
  • शिराळा तालुक्यातील 95 गावांतील 15 हजार 350 शेतकऱ्यांचे 6 हजार 631 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी 87 गावांतील 8 हजार 786 शेतकऱ्यांचे 1 हजार 893.61 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
  • पलूस तालुक्यातील 26 गावांतील 21 हजार 595 शेतकऱ्यांचे 10 हजार 146 हेक्टर बाधित झाले आहे त्यापैकी 23 गावांतील 4 हजार 523 शेतकऱ्यांचे 2 हजार 162.18 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
  • तासगाव तालुक्यातील 2 गावांतील 179 शेतकऱ्यांचे 59 हेक्टर बाधित झाले आहे त्यापैकी 2 गावांतील 59 शेतकऱ्यांचे 26.69 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
टॅग्स :floodपूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली